मुंबई सागरी किनारी मार्गामुळे निर्माण झालेला ७.५ किलोमीटर आणि २० मीटर रुंद समुद्राभिमुखी मार्ग (प्रॉमीनॉड) आता उदघाटनाची सज्ज झाला आहे. मुंबई कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्हच्या पुढे प्रियदर्शिनी पार्क आणि वरळी टोकादरम्यान मुंबईकरांना मनोरंजन आणि फिरण्यासाठी एक नवीन सागरी मार्ग मिळाला आहे. हा मार्ग मुंबईच्या सौंदर्यात भर घालत आहे.
Read More
( Elphinstone Bridge closed ) शहराच्या मध्यवर्ती भागातील 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर गुरुवार, दि. 24 रोजी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मुंबई मेट्रो ३ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने शुक्रवार, दि.२८ रोजी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. २५जुलैपर्यंत संपूर्ण मार्गिका आणि आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने हा महत्वाचा दिवस आ
मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाला हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये आणि छायाचित्रे सोशलमिडीयावर प्रसारित झाली. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोपही झाले. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत.
शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या पुलाच्या कमला गती देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर दि.२७ जानेवारीपासून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाला.
वरळीत आदित्य ठाकरेंचा ( Aditya Thackeray ) निसटता विजय!
वरळीत आदित्य ठाकरेंसमोर तगडं आव्हान! l Aditya Thackeray l Milind Deora l Worli Vidhansabha Maha MTB
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लीम मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. सर्व मुस्लीमांनी एकत्र यावे आणि मतदान करावे, अशी मागणी करत तुमच्या नाकावर टीच्चून व्हिडिओ काढत आहेत. जर मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत ना तर आज राज ठाकरे फतवे काढतो आहे.
भारतातील आघाडीची खाजगी आरोग्य सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या अपोलो हॉस्पिटलने नवीन विस्तार योजनेचे अनावरण केले. मुंबई आणि लखनऊ येथे १ हजार ६२५ कोटींच्या नवीन प्रकल्प बिल्ड, ऑपरेट आणि मॅनेजमेंट कराराद्वारे कार्यान्वित केले जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत देशभरातील ११ ठिकाणी ३,५०० बेड्स जोडून हॉस्पिटल्सची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
Aditya Thackeray वऱळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरले आहे. वरळी मतदारसंघात काही काम झाले नाही. यामुळेच आम्हाला संदीप देशपांडे यांना उमेदवारी द्यावी लागल्याचा मिश्कील टोला लगावला आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यां
बुधवारी उबाठा गटाची पहिली यादी जाहीर झाली. यात आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा वरळीतून संधी देण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचं आता काय झालं? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
मनसेने मंगळवारी रात्री विधानसभा निवडणूकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा वरळीत पुतण्याच्या विरोधात काकांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात म्हाडाला २५०० घरे म्हाडा बांधेल. या २५०० घरांच्या उभारणीसाठी नुकत्याच निविदा अंतिम करून राज्य सरकाराला पाठविण्यात आल्या. या निविदांना राज्य सरकारने मंजुरी दिली अजून येत्या २ दिवसात पत्रा चाळीतील घरांचे काम सुरु होईल. या इमारती उंच असल्याने या बांधण्यासाठी साधारण अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. २०२४मध्ये हे काम सुरु होऊन २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांचे चुलते राज ठाकरे यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळीत उमेदवार देईल, अशी घोषणा करीत राज यांनी आदित्यसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटाने राखली असली, तरी बालेकिल्ला असलेल्या वरळीत त्यांना मताधिक्य टिकवता आले नाही.
वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँचने अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाचे वडील आणि शिवसेनेचे नेते राजेश शाह यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी कारवाई केली आहे. राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. बुधवारी याबद्दलचा पक्षादेश जारी करण्यात आला.
वरळी हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहाला ताब्यात घेण्यात मंगळवारी पोलिसांना यश आलं. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला
वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाच्या संरचनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचीही बचत होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाने ओलांडला आव्हानात्मक टप्पा!
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली.
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघात वरळीकरांकडून पोस्टबाजी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बदल घडवणार अशा आशयाचे पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहेत.
“वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. जो काम करेल त्याचा तो बालेकिल्ला होईल. येथील लोकप्रतिनिधींनी कामे केली असती, तर आम्हाला यायची वेळ आली नसती", अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला ठणकावले आहे. शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि वरळीतून पुन्हा निवडणुक लढवा, असे थेट आव्हानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी ठाण्यात सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचे आव्हान दिले होते. यावर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वरळीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्तावित असलेल्या अत्याधुनिक, बहुमजली व रोबो ऍण्ड शटल या तंत्रज्ञानासह उभारण्यात येणाऱया वाहनतळाच्या किंमतीमध्ये फुगवून वाढ करण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमधून या वाहनतळाच्या निविदांबाबत करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीशी विसंगत आहेत.
अडीच वर्षात जी घाण झाली आहे ती आम्ही साफ करत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. तसेच क्लिन स्वीप होऊ या भीतीने विरोधकांची भंबेरी उडाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वरळी येथे स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता या मुद्द्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मौन सोडले आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे असा सवाल उपस्थित करत एका प्रकारे आव्हान दिले आहे.
वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चित्रकला, फोटोग्राफी अशा विविध कला छंद अगदी डॉक्टर मंडळीही जोपासत असतात. अशाच चित्रकलेचा छंद जोपासणार्या डॉक्टरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘डॉक्टर्स आर्ट शो’ वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.
मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस सेंटर तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारू, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चाळीचं काम सुरू असलेल्या ठिकाणची राज ठाकरेंनी पाहणी केली. चाळीतील स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
घाटकोपर परिसरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या गुजराती भाषेच्या पोस्टर्स फाडण्याचे कृत्य उबाठा गटाने केले आहे. पण आता या कृत्यामुळे उबाठा गट चांगलाच अडचणीत आला आहे. लोकांनी उबाठा गटाची गुजराती लोकांबद्दल आणि भाषेबद्दल असणाऱ्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये चाळीत वास्तव्यास असलेल्या पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या ११३३ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली.
मुंबईतील राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावावरून भाजप आणि उबाठा गटात वाद पेटला असून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे वरळीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय नुराकुस्तीचा डाव रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
14 सप्टेंबरला बोर्ड ऑफ डायरेक्टर बैठकीत 22 एकर जागा विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.वरळी येथील जागा तब्बल 5200 कोटींना विकली जाणार आहे.गोईसु रिअल्टीला ही जापनीज कंपनी ही जागा विकत घेणार आहे.सुमिटोमो रिअल्टी कंपनीची गोईसु ही उपकंपनी (Subsidiary) आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने उबाठा गटाला धोबीपछाड दिली आहे. वरळीतील प्रतिष्ठित अशा जांबोरी मैदानावर सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचे यशस्वी आयोजन करून भाजपने सरशी केली आहे.
भाजप विरुद्ध उबाठा गटात रंगलेल्या राजकीय संघर्षात आणखी एकदा हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय हंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असून वरळीची हंडी कोण फोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून राज्यातील ५० हजार गोविंदांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. अशी माहिती आ.प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, गोकुळाष्टमीच्या सुट्टी संदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन ३१ ऑगस्ट, रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये ’प्रो-गोविंदा“ स्पर्धेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी एका बैठकीचे आयोजन क
मुंबई : तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेला बीडीडी चाळीतील स्टॉलधारकांचा प्रश्न फडणवीस-शिंदे सरकारने मार्गी लावल्याने येथील रहिवाशांनी शासनाचे आभार मानले आहेत, तसेच या प्रश्नाची ठळकपणे दखल घेणारे वृत्त शुक्रवार, दि. ३० जून रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानिमित्त स्टॉलधाकरकांनी आभार मानत वरळीतील अनेक चौकात त्या आशयाचे भव्य फलक लावले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेला कारभार आणि त्यात मुंबईकरांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मुंबईकरांचा ठाकरेंवर असलेला रोष कायम आहे. मुंबईतील २०७ बीडीडी चाळींमधीलस्टॉल धारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्यात ठाकरे सरकारने टाळाटाळ केलेल्या टाळाटाळीमुळे बीडीडीवासियांमध्ये सरकारप्रती मोठी नाराजी होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळात बीडीडी चाळीतील स्टॉल धारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरेंना फडणवीसांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर दिले आहे. बीडीडी चाळी
मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये 665.50 रद्द करुन जुन्या दराने 250/- रुपयेच आकारण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांचे पुर्नविकास योजना ही लवकरच लागू करण्यात येईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, "हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो." असे थेट आव्हानचं दिले होते. आदित्य यांचं हे आव्हान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्वीकारलं आहे. त्या म्हणाल्या, "पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही." असं आव्हानच शीतल म्हात्रे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे नायगांव व वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या ४६० पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीची विंग, इमारतीतील सदनिकेचा मजला आज निश्चित करण्यात आ
वरळीचे स्थानिक आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे पुन्हा एकदा मुंबईत राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. आदित्य यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वरळीतील नागरिकांना पत्र लिहिले असून आमदारकीची तीन वर्षे पूर्ण होत असताना आपण वरळीकरांसाठी काय केले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एसआरएने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसाठी हा पहिला मोठा दणका आहे.
तेजस्वी सूर्या : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खरी शिवसेना नसून ती वसुली सेना आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबत आहे हे वास्तव आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेची वाटचाल फक्त तुष्टीकरणाच्या दिशेने असून बाळासाहेब आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे,' अशी घणाघाती टीका भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर केली आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास व इतर विषयांबाबत मंगळवारी सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे : माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अनधिकृत प्रकार समोर आला आहे. वरळीच्या लोअर परेल भागातील एक मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अनधिकृतपणे दारुसाची सरेआम विक्री होत झाल्याचा दावा स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी केला आहे. तसेच याबाबतचा एक व्हिडीओ देखील भाजपचे पदाधिकारी दीपक सावंत यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. यापूर्वीही मुंबईत अनधिकृत दारू विक्री, कोरोनाकाळात आयोजित करण्यात आलेला बांद्रा ख्रिसमस फेस्टिवल आणि वरळीतील पबम