संत भगवान बाबा व वामन भाऊ पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार (दि. 7)पासून करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विणापूजन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासोबत पनवेलच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील याही उपस्थित होत्या.
Read More
कलियुग आणि विज्ञानयुग हातात हात घालून वावरत आहे. ‘भौतिकाचे शोध’ आणि ‘दूर जाणाराबोध’ यांची सांगड घालण अवघड! कलि बुद्धीमध्ये शिरलेला असल्यावर सत्याचा बोध कसा होणार? शोधामधून शाश्वत सुखाची प्राप्ती करणे म्हणजे मृगजळामागे धावणं! देहालायंत्रामुळे आराम मिळाला तरी, मनाचा आराम हरवला आहे. मनाला विश्रांती मिळाली की, ते ताजेतवाने, टवटवीत होते. मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी काय करावे, हे फार कमी लोकांना ज्ञात असते.