स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
Read More
महात्मा गांधींवरील आरोप किंवा मतभेद गृहीत धरूनही स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. प्रामुख्याने त्यांनी चळवळीला जे भारतीय अधिष्ठान दिले, त्यामुळे त्या योगदानाला झळाळी प्राप्त होते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या या योगदानाचा मागोवा घेणे औचित्याचे ठरावे.
रा. स्व. संघ नेताजी सुभाषचंद्र बोस नगर माधव संस्कार केंद्र यांच्यामार्फत ‘अखंड भारत संकल्प दिना’निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. गेली 20 वर्षे ही परंपरा सुरू आहे. सोमवार, दि. 14 ऑगस्ट रोजी अंधेरी येथील यंदाच्या कार्यक्रमात वक्ते म्हणून पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सहार भागचे भाग संघचालक श्री रवीजी नथानी उपस्थित होते.
नुकतेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य प्रतिमेचे दिल्लीतील ‘इंडिया गेट’च्या ‘कर्तव्यपथा’वर पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पण, आजही नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कारण, नेताजींच्या मृत्यूनंतर पुढे सुमारे दोन दशकं आपल्या देशाचे राजकारण या मुद्द्याभोवती फिरत होते आणि आजही फिरत आहे. नेताजींच्या मृत्यूच्या वादातील बारकावे समजून घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यलढ्यातील परिस्थिती समोर ठेवावी लागेल.
म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांचा ३० फूट उंच पुतळा तयार करणार आहेत. नेताजींचा हा पुतळा इंडिया गेट येथे अमर जवान ज्योतीच्या मागे भव्य छत्राखाली बसवला जाईल.
मणिपूर... डोक्यावर म्हणजे उत्तरेला नागालॅण्ड, दक्षिणेला मिझोराम, पश्चिमेला आसाम आणि पूर्व सीमा म्यानमारला सामायिक असणारे हे राज्य. मणिपूर म्हणजे आश्चर्यकारक गमतीजमतींचा पेटाराच. विस्तारवादाच्या हव्यासापायी ब्रिटिशांनी अनेक युद्धे करून भारतावर सत्ता मिळवली. यातले शेवटचे युद्ध 1891 साली मणिपूरच्या भूमीवर लढले गेले. म्हणजे मणिपूर तोपर्यंत स्वतंत्र राज्य होते आणि नंतर १९४४ साली एप्रिलमध्ये नेताजींच्या ‘आझाद हिंद फौज’ आणि ‘जपानी आर्मी’ने इंफाळचे युद्ध लढून मोइरांग येथे स्वतंत्र भारताचा ध्वज प्रथम फडकावला. त्यामु
‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा!!!’ १९४३-४४च्या काळात नेताजी सुभाषचंद्रांचा आवाज देशाच्याच नाही, तर आशियाई देशांतील भारतीय मुलाच्या, प्रत्येक भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवत होता. हजारो भारतीय आपली घरेदारे विकून नेताजींना स्वातंत्र्यलढ्यासाठी पैसा उभा करून देत होते. महिला आपलं स्त्रीधन (सोनं, दागिने) अत्यंत विश्वासाने ‘आझाद हिंद फौजे’साठी देऊन टाकत होत्या. असेच एक स्वातंत्र्याच्या क्रांतीने भारलेले कुटुंब म्हणजे मणिपूरच्या मोइरांग येथील सिंग घराणे. हेमाम नीलमणी सिंग हे सेवा समिती,
रोज्झोहो आणि आसपासच्या चेसेझू, चेथेबा, चेखाबा, किसामा, किग्वेमा इ. गावात फिरून, लोकांशी बोलून मी, जी माहिती गोळा केली आहे, ती स्वैर शब्दांत या लेखाद्वारे मांडली आहे. या सगळ्या कथेचा कसलाही ऐतिहासिक पुरावा आजतागायत मला किंवा स्थानिक अभ्यासकांना मिळालेला नाही. गावात आलेली ती व्यक्ती खरच नेताजी होती की अजून कोणी होती? अशी काही घटना खरंच घडली होती का? नेताजी खरच तिथे असतील, तर त्यांनी या जागा नऊ दिवस वस्तीसाठी का निवडल्या? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे खरेतर मला मिळाली नाहीत. परंतु, तरीही या लोकांचे मत,
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रावर खरंतर विपुल आणि विस्तृत लेखन ‘सुभाष बावनी’ या पुस्तकातून नव्या दमाचे तरुण लेखक अंबरीष पुंडलीक यांनी मांडले आहे. या पुस्तकाच्या रूपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिगाथा वाचकांच्या भेटीला आली असून दि. २३ जानेवारी या दिवशी नवीन अध्यायाची सुरुवात झाली.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी संशोधन करण्यासाठी तैवान सरकारने भारतीय संशोधक आणि इतिहासकारांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. खास यासाठी तैवान सरकारने आपले राष्ट्रीय अभिलेखागार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या तैवान दूतावासाचे उपप्रतिनिधी मुमिन चेन हे शनिवारी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एफआयसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.
दिल्लीतील अमर जवान ज्योतीचा ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’त विलय म्हणजे मोदी सरकारतर्फे हुतात्म्यांचा अवमान आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न, असा कितीही कंठशोष करत काँग्रेसने देशभक्तीचा दिखावा उभा केला, तरी काँग्रेसच्या आजवरच्या देशविरोधी कृत्यांना भारतीय जनता कदापि भुलणारी नाही, हे मात्र निश्चित!
आझाद हिंद सैन्याला माघारी यावं लागलं. त्यातच हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रकार घडल्यामुळे जपान शरण आला आणि ‘आझाद हिंद सेने’नेही शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’च्यावरचा राजद्रोहाचा खटला हा लाल किल्ल्यावर सुरू झाला. हे वाचून वाचकाला वाटतं ‘आझाद हिंद सेना’ हरली; पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध सुरू होतं. तेव्हा, आज याच ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त या शौर्यभास्कराचे केलेले हे वीरस्मरण...
श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.