मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती, महाराष्ट्र आयोजित रौप्यमहोत्सव पालखी सोहळा दि. ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. कॉटनग्रीन येथील राम मंदिरातून सकाळी ८ वा. ही दिंडी ( Warkari Dindi ) सुरु करण्यात आली. मुंबईतील कॉटनग्रीन, परळ गाव, भोईवाडा, नायगाव असे पायी चालत वारकरींनी प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आपल्या दिंडीची सांगता केली. तीन हजार पेक्षा जास्त वारकरी या दिंडीत, व पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
Read More
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ( Mahayuti ) विजयामागे अनेकांचे सुप्त हात होते, तर काही संघटना, संप्रदाय प्रत्यक्ष मैदानात उतरून धर्मजागरणासाठी प्रचार करत होते. त्यांपैकी वारकरी संप्रदायाने महायुतीच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. साधी राहणी, मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाव कोणाच्या आल्यात नाही की गेल्यात नाही, ही वारकरी संप्रदायाची ओळख. मात्र, या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.
राज्यभरात सध्या आषाढी एकादशीनिमित्ताने विठूनामाचा गाजर सुरु आहे. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठू चरणी लिन होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांना मराठीत शुभेच्छा देत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, लवकरच पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन हे मार्ग वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आधी वारकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या आहेत. आषाढी वारी २०२३ साठी वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखींचे आज १२ जून रोजी पुणे शहरात आगमन झाले. यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिली.
येत्या काळामध्ये वारीला जाण्याचे जे जे टप्पे आहेत त्या त्या टप्प्यामध्ये सरकारने मुक्कामाच्या ठिकाणी निर्मल वारी म्हणून स्वच्छेतेची व्यवस्था केलीली आहे. पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वारी पुढे गेल्यानंतर त्या गावामध्ये झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. हे सगळे टप्पे व्यवस्थित व्हावे, असे मनोगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.
संसार, नोकरी आणि परमार्थाची सांगड घालत त्याने घरातील वारकरी संप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. जाणून घेऊया युवा कीर्तनकार उत्कृष्ट मृदुंगवादक ह.भ.प. विठ्ठल गणपत म्हस्के यांच्याविषयी...
"वारकरी संप्रदायाची परंपकर जोपासण्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व मी करेन" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भल्या पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली आणि राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रार्थना केली
देवशयनी आषाढी एकादशीचा उत्सव देशभरात आनंदात साजरा होत असताना पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्ताचा महापूर आला आहे.
आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर यंदा पायी दिंडीला परवानगी मिळाली.
"काळजी करू नका, लवकर बरे व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत" अशा शब्दांत स्वतः मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांशी व्हिडिओ द्वारे बोलून त्यांना दिलासा दिला. आषाढी वारीसाठी निघालेलूया वारकऱ्यांच्या दिंडीत कोल्हापूर जिल्ह्यात टेम्पो शिरल्याने १७ वारकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. या बद्दल आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
पुण्यातील वातावरणात आज निसर्गाच्या शीत लहरी, वारकऱ्यांचा भक्तिभाव आणि संस्था, संघटना आणि नागरिकांचा सेवाभाव अशा सकारात्मक कृतीने दिवसभर भारावून गेले.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे असलेले निर्बंध वारकऱ्यांना वारीत सहभागी होण्यासाठी आडकाठी ठरत होते. यंदा मात्र परंपरेनुसार या 'आषाढ वारी'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ जून रोजी देहू दौर्यावर येत आहे. देहूतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्याहस्ते पार पडणार आहे.
“भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वात आदरणीय असून यामध्ये महाराष्ट्रातील भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. जगाच्या कल्याणासाठी पथदर्शक ‘पसायदान’ हे आपल्या सर्वाकरिता संप्रदायाने दिलेला ठेवा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘चित्रमय समता वारी’ या पुस्तिकेचे अनावरण राजभवन, मुंबई येथे रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
वैशाखाच्या उन्हाने व ज्येष्ठातील उकाड्याने त्रस्त होत असताना आपण मराठी जन ज्या सोहळ्याची वाट पाहत असतो, तो सोहळा म्हणजे विठ्ठल-रखुमाईच्या नामाचे संकीर्तन करीत व ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ यांचा गजर करीत वारकर्यांच्या जयघोषाने, वातावरणाने, आल्हादायक गारव्याने मन प्रफुल्लित करणारा वारीचा सोहळा. मात्र, हा सामूहिक नामघोषाचा आल्हाददायकपणा गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बंधनांमुळे आपण कोणीही अनुभवू शकलो नाही, शेवटी विठूरायाची इच्छा!
पावसाळा सुरू होताच भाविक-भक्तांना आषाढ महिन्यातील एकादशीचे वेध लागतात. भागवत धर्माचा पाया माऊलींनी घातला असे म्हणतात. वारी हा वैष्णवांचा प्राण. या वारीची परंपरा खूप जुनी, अगदी ज्ञानदेवादी भावंडांच्या आधीपासूनची. हजारो वर्षांचा इतिहास वारीला आहे. या वारीला शिस्तबद्ध चौकट जी मांडली गेली, ती ज्ञानदेवांच्या काळातच. तो काळ खर्या अर्थाने संतांच्या लोकशाहीचा होता. अठरापगड स्तरातील सारे संत एक दिलाने, एक मनाने एकाच विठ्ठल पांडुरंगाचे भक्त होते. शुद्ध भक्ती, शुद्ध ज्ञानाने फार मोठे समाजसंघटन यानिमित्ताने सुरू झाले
ठाण्यात दिंडी यात्रा रोखुन पोलिसांचे अटकसत्र
कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. असे असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
यंदा पायी वारी रद्द करत, वारीला मोजक्याच संख्येत एसटीद्वारे वारकर्यांना वारीला जाण्याची सोय सरकारने केली आहे.तसेच दहा मनाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे.त्याच्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे.राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांचा सभाना व आंदोलनाला गर्दी चालते मात्र वारकऱ्यांना वारी साठी परवानगी नाही दिली,त्यामुळे वारकरी आणि भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाकी आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीने ३ दिवसात निर्णय घ्या अन्यथा परिणामांना सामोरं जा म्हणत सरकारला ईशारा दिला आहे.
पंढपुरातील व परिसरातील आसपासच्या ५ गावांमध्ये संचारबंदी होणार लागू
दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे. देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला विचारला आहे.
पंढरीत कडेकोट बंदोबस्त
विशेष बसच्या नावाखाली राज्यसरकारने २० वारकऱ्यांना आकारले ७० हजार रुपये
इतिहासातील पहिल्यांदाच भाविकांविना पंढरीत चैत्री एकादशी
पूर्वीचे राज्यकर्ते देवनिष्ठ, धर्मनिष्ठ होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असे फर्मान राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले
समर्थांनी पारमार्थिक हेतूने आपल्या संप्रदायाची उभारणी केली. धर्मरक्षण हा त्यांचा मुख्य हेतू होता. त्यासाठी धर्मउच्छेदक दुष्ट दुर्जनांचा नाश आणि त्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना, ही त्यांची उद्दिष्टे होती. रामदास मूलत: भक्तिमार्गी संत होते. त्यासाठी महाराष्ट्रातील एकंदर भक्तिमार्गाचा आढावा घेणे उपयुक्त ठरेल.
‘सह्याद्री मानव सेवा मंच,’ ठाणे ही संस्था गेली ३५ वर्षे मोफत वैद्यकीय सेवा, विविध प्रकारचे समाज सेवा कार्य, सातत्याने करीत आहे. ही सामाजिक संस्था समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करते. सेवाभावी कार्य करण्याची तळमळ असलेले डॉक्टर्स व त्यांना साहाय्य करणारे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले. दु:खी, पीडित, कुपोषित व सामान्य वैद्यकीय सेवांपासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना सक्रिय साहाय्य करण्याचा वसा त्यांनी उचलला.
सचिन यांचे अफाट समाजकार्य पाहून लोकांनी त्यांना दिलेली ‘माऊली’ ही पदवी योग्य वाटते. त्यांच्या कार्यामुळे ‘माऊली’ हे विशेषण त्यांच्यासाठी कसे आणि किती योग्य आहे, याचा प्रत्यय येतो.
या क्षेत्रदेवतांचा उगम हिंदू धर्माच्या मूळ रचनेचा परिणाम आहे. आर्यांनी हिंदुस्थानात येताना आपली दैवते बरोबर आणली. येथील स्थानिकांना त्यांच्या देव-दैवतांसकट हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आले.