``ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे वीज ही अत्यावश्यक व मूलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे``, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.
Read More
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत गेल्या वर्षभरात सरकारी वीज कंपन्यांनी भरीव कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतीपथावर आले आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत केले.
सौर ऊर्जेद्वारे 7000 मेगावॅट वीज निर्माण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची शिंदे फडणवीस सरकारची ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ शेतकऱ्यांना बळ देण्यासोबतच संपूर्ण राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देणारी गेमचेंजर योजना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आणि महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी मुंबईत केले.
फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सततची नापिकी आणि अस्मानी संकटाने नाडलेल्या शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना दिवसा आणि रात्री वीज कशी उपलब्ध करून देता येईल यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. शेती पंपांना अखंडित आणि कायमस्वरूपी विजेचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार अस
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या अभियानाची संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केली. या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे . संयोजन समितीच्या सदस्यपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर , प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीन्द्र अनासपुरे , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक , प्रदेश सचिव श्वेता शालिनी , अरविंद
ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झाली आहे
महाराष्ट्रात ऊर्जा विभागाशी संबंधित संकट आहे. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, राज्यात निर्माण झालेले हे संकट नैसर्गिक अथवा इतर कुठल्याही कारणांमुळे निर्माण झाले नसून ते मानवनिर्मित आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे या संकटाला कारणीभूत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये असलेला बेबनावच महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या ऊर्जासंकटाला जबाबदार आहे
भाजप नेते विश्वास पाठक यांनी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोअड शेगिंगच्या समस्येवर भाष्य करत असताना, विजेची मागणी वाढत असल्याची कारण दिली. यावर टीपण्णी करताना विश्वास पाठक यांनी ट्विट करत 'ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य म्हणजेच त्यांचे अपयश लपविण्याचे प्रयत्न आहेत' असा घणाघात केला आहे.
रविवारी मुंबई मध्ये सुमारे दीड तासासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवासुद्धा या वीज झटक्याने थांबली. राज्य सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता या प्रकरणी उशिरा जाग येऊन उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे
रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी एकाचवेळी दक्षिण मुंबईतला अनेक ठिकाणचा विजपुरवठा पुन्हा एकदा खंडीत झाला होता. यासंदर्भात भाजप नेते विश्वास पाठक यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. "राज्याची यंत्रणा पुन्हा एकदा निष्कामी!", असे म्हणत त्यांनी ऊर्जामंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
भाजप माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांचा राष्ट्रवादीला टोला
भाजप प्रदेशतर्फे विश्वास पाठक यांची आर्थिक, उद्योग आणि व्यापार या प्रकोष्ठांचे प्रभारी आणि प्रदेश प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकार संविधानिक व्यवस्था न मानणारी आणि लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असून भाजपचा हा चेहरा समोर आला आहे असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले
भाजप मध्यम प्रमुख विश्वास पाठक यांचा राज्य सरकारला सवाल
देशाची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे मार्च मधील जीएसटी संकलनावरून दिसून येत आहे. महाराष्ट्रात मात्र आघाडी सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे राज्याच्या जीएसटी संकलनात लक्षणीय घट झाली आहे. राज्य सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे, खंडणीखोरीमुळे उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्र सरकारवरील विश्वास उडत चालला आहे, अशी टीका भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) ‘सर्व्हर हॅक’ झाल्याची खळबळजनक माहिती सोमवार, दि. २९ मार्च रोजी समोर आली. ‘हॅकर्स’नी तब्बल ५०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास ‘हॅक’ करण्यात आलेल्या ‘सर्व्हर’वरील सर्व महत्त्वाचा डाटा नष्ट करण्याची धमकीही ‘हॅकर्स’नी दिल्याचे समजते.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीर पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने मागवली आहे. राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून ही माहिती मागवली गेली आहे.
'महाजनकोच्या’ निर्मिती संचालकपदावर चंद्रकांत थोटवे यांची फेरनियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी राबविलेली प्रक्रिया संशयास्पद असून या प्रक्रियेत 'अर्थपूर्ण ' व्यवहार झाले असल्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रक्रियेला स्थगिती देऊन प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी करत, न्यायालयात जाण्याचा ईशाराही दिला आहे.
महाराष्ट्र भाजपचे मीडिया प्रमुख आणि ‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी या सरकारच्या ऊर्जा विभागाच्या निर्णयावर म्हटले की, “पैसे भरले नाहीत तर वीज पुरवठा खंडित करू हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. याचा आम्ही निषेध करतो.