( minister pratap sarnaik on Fuel ban for polluting vehicles ) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
Read More
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२५ ला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध ११ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Electric vehicles देशातील ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ अर्थात ‘ईव्ही’ उत्पादनवाढीला व वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. त्यानुसार धोरणेही आखली. परिणामी, आज भारताकडे ‘ईव्ही’चे जागतिक ‘हब’ म्हणून विकसित होण्याची निश्चितच क्षमता आहे.त्याविषयी सविस्तर...
केंद्रीय मोटार वाहन कायदा व व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
'अटल सेतूवरील मासिक सरासरी संख्या वाहनसंख्या ७,४२,१६६ इतकी असून अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. त्यामुळे पथकराच्या दरामुळे अटल सेतूवरून प्रवास करण्यास प्रवाशांकडून टाळाटाळ होत नसल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर इंटिग्रेटेड ट्रॅक मॉनिटरिंग सिस्टम (ITMS) आणि रोड कम रेल इन्स्पेक्शन व्हेईकल (RCRIV)ची पाहणी केली. ही अत्याधुनिक प्रणाली भारतीय रेल्वेच्या ट्रॅक सुरक्षा आणि कामकाजाची गुणवत्ता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मुंबई : “पुढच्या काही वर्षांत मुलुंडमध्ये पाच मोठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल,” असा विश्वास स्थानिक आमदार आणि महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा ( Mihir Kotecha ) यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये ‘रेल्वे टर्मिनस’, ‘क्रिडा पार्क’, ‘पक्षी उद्यान’, ‘तीन डीपी रोड आणि रोपवे’ (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हलक्या मोटार वाहनांच्या (LMV) ड्रायव्हिंग परवानासंदर्भातील सुनावणीनंतर बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी महत्त्वाचा निकाल दिला आहे. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपला २०१७ चा निर्णय कायम ठेवत, हलक्या मोटार वाहनांचा (LMV) ड्रायव्हिंग परवानाधारक व्यक्तीला ७,५०० किलोपेक्षा कमी वजनाची वाहतूक वाहने चालविण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
Jammu and Kashmir खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराने दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोन लष्कर जवान जखमी झाले आहेत. तसेच लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाल्याची घटना आहे. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या झालेल्या हल्ल्यात जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करांच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा नाहीनाट करण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पुण्यामधील पूजा खेडकर प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील दिवे काढण्यास सुरुवात केली आहे. गाडीवरील दिवे काढून त्या संबधित आधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावण्यात येणार आहे. गाडीवर दिवा लावण्याची परवांगी नसेल, आणि तरीही गाडीवर दिवा असेल तर त्या आधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे शहरात गेले काही दिवस लपंडाव खेळणाऱ्या पर्जन्यराजाने शुक्रवारी रात्रीपासुन संततधार धरली. मात्र, मध्ये मध्ये विराम घेत धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने सखल भाग वगळता कुठेही पाणी तुंबण्याच्या घटना झाल्या नसल्या तरी घोडबंदर रोड तसेच मुंबई - नाशिक महामार्गावर वाहनांची वाट अडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शुक्रवार सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३० पर्यंत ५० मि.मीटर पावसाची नोंद झाली.तर शनिवारी दिवसभरात सायंकाळी साडेपाच पर्यंत सुमारे ८० मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन घेतेवेळी दि.०३ जुलै २०२४ ते दि.२१ जुलै २०२४ या कालावधीत पथकारातून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असेल अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, डिसेंबर,२०२३ अखेरीस राज्यात ३ लाख ९४ हजार ३३७ बॅटरी इलेक्ट्रोनिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
भारतीय जनता पक्षाने १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या ' संकल्प पत्र ' या जाहीरनाम्याद्वारे भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक व्यापक दृष्टीकोन मांडला आहे. यावेळी मागील दहा वर्षात भाजपने पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्ता, प्रमाण आणि गती वाढविण्याच्या दृष्टीने परिवर्तन केल्याचा दावा केला आहे. या प्रयत्नांचा लाभ देशातील प्रत्येक क्षेत्राला मिळत आहे. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल आणि गती याचसोबत उपजीविकेची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देण्यावर या संकल्प पात्रात भर देण्यात आला आहे.
जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भेटीत मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, भारतात ‘टेस्ला’तर्फे गुंतवणुकीचीही घोषणा होऊ शकते. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय वाहन निर्मिती उद्योगक्षेत्राचा घेतलेला हा आढावा...
तरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली होत आहेत. सरकार भारतात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन माहिती वृत्तसंस्थेनी दिली आहे. नव्या माहितीनुसार टेस्ला कंपनीचे मुख्य एलोन मस्क (Elon Musk) या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा होऊ शकते.
आज ऑटोमोबाईल डिलर कंपनी पॉप्युलर व्हेईकल व सर्विसेस कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी दाखल झाला होता. मात्र आयपीओ झाल्यावर ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या आयपीओला ठीकठाक प्रतिसाद मिळाला होता. लिस्टिंग (नोंदणीकृत) होताना कंपनीच्या समभागांची (शेअर) चे २ टक्के सवलतीने विक्री होत असल्याचा दावा शेअर बाजारात केला गेला आहे.
तीनचाकी वाहनांच्या व्हॉल्युममध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या क्रिसिल रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. देशांतर्गत तीनचाकी वाहनांच्या या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४० ते ४२ टक्क्याने तीनचाकी वाहनांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. २०१९ या आर्थिक वर्षी ही वाढ १२ टक्क्याने होत ७ लाख युनिट्सपर्यंत वाढला झाली होती. क्रिसिल अहवालानुसार यंदा ती वाढ ७ लाखांवरून ७.८ लाख युनिट्स पर्यंत वाढ होऊ शकते.
ऑटोमोबाईल सेक्टरमधील कंपनी पॉप्युलर व्हेईकलचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ (IPO) हा १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहे.१२ मार्च ते १४ मार्च या काळात आयपीओची मुदत आहे.कंपनीतर्फे या आयपीओ मार्फत ६०२ कोटी रूपयांचा निधी जमा केला जाणार आहे. कंपनीकडून गुंतवणूकीसाठी प्राईज बँड(Price Band) किंमत २८० ते २९५ रूपये प्रति इक्विटी समभाग(शेअर) इतका ठरवण्यात आलेल्या आहे.
उरण तालुक्यातील खोपटे-जेएनपीटी रस्त्यावर बुधवार रात्री कोल्हा ( jackal ) जखमी अवस्थेत आढळून आला. ( jackal ) वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या या कोल्ह्याचा बचाव करुन त्याला पुढील उपचाराकरिता मुंबईत दाखल करण्यात आले. ( jackal )
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या संपूर्ण श्रेणीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा केली आहे. ग्राहक त्वरित प्रत्येक मॉडेलवर बचतींचा लाभ घेऊ शकतात, जेथे किमती जवळपास १०,००० रूपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या धोरणात्मक पुढाकाराचा इलेक्ट्रिक परिवहनाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सच्या अवलंबतेला गती देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी अधिक लक्षव
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने तिच्या मॉडेल्समधील बॅटऱ्यांकरिता एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम लाँच करत ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. १ मार्च २०२४ पासून ओडीसी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास ५ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटीमधून फायदा मिळू शकतो.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स शोरूमच्या उद्घाटनासह शाश्वत गतीशीलतेप्रती आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे. मालाड मुंबई येथे स्थित हे अत्याधुनिक केंद्र कंपनीच्या रिटेल विस्तारीकरण धोरणामधील मोठा टप्पा आहे.
इंधनाच्या वाढत्या किमतीवर मात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असताना, राज्य सरकारनेही आता राज्यपाल, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सनदी अधिकाऱ्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरणही निश्चित करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक पथकर प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पथकर नाक्यांवर विनाअडथळा वाहतूक प्रदान करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम सुरु केला आहे.
जागतिक तापमान वाढीचे वसुंधरेच्या पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम हा वैश्विक चिंतेचा विषय. या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी केल्या जाणार्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर. त्यामुळे भारतातही अलीकडच्या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी वाढलेली दिसते. त्यासंबंधीचा आढावा घेणारा हा लेख...
संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा आयातदार अशी कोणे एकेकाळी ओळख असलेल्या भारताने, आज जागतिक पातळीवर संरक्षण सामग्रीचा एक प्रमुख निर्यातदार म्हणून नावलौकिक सिद्ध केले आहे. २०२३ मध्ये भारताने ८५ देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात केली. देशांतर्गत उत्पादनसुद्धा एक लाख कोटींच्यावर पोहोचले. एकूणच या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील वाटचाल ‘आत्मनिर्भरते’कडे सुरू झाली आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...
घोडबंदर येथील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी गर्डर उभारले जात आहेत. यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने कापूरबावडी येथून भिवंडी मार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने वाहतुक करू शकतील.त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांची अधिक नोंद झाल्यामुळे नवी मुंबईकरांचा कल ई-वाहनांकडे वाढल्याचे दिसून येत आहे.
ऑटो स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना केले आहे. स्वयंचलित पद्धतीने चालणारी टेस्टिंग सेंटर व वाहन स्क्रॅप सुविधेसाठी ही गुंतवणूक आवश्यक असून यात वाहन स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनमालकाला किंमतीत सूट द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
Fifth Auto Retail Conclave मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना ऑटोमोबाइल क्षेत्रावर बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.सरकार या क्षेत्रातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात वाहनांच्या विक्रेत्या एजन्सी डीलर्सला जुनी वाहने स्क्रॅप करण्याची परवानगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. '
डिझेल वाहनांवर कर लावण्याचा भारत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला होता, ज्याबद्दल त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. नितीन गडकरी यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, मीडिया रिपोर्ट्सवर तात्काळ स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ज्यामध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% कर लावण्याची चर्चा आहे.
अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मंगळवारी २२ ऑगस्टला बहुप्रतिक्षित ‘भारत न्यू कार असेसमेंट पॉलिसी’ (भारत एनसीएपी) सुरू करणार आहेत. यामुळे भारतात ३.५ टनांपर्यंतच्या मोटर वाहनांचे सुरक्षा मानक वाढवून रस्ता सुरक्षेत वाढ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेपैकी एक मंगळ ग्रहावरील मोहिम आहे. या मोहिमच्या माध्यमातून नासा मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून तेथील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेत आहे. दरम्यान, यासाठी नासाने नवी मोहिम आखली असून मंगळावरून रॉकेट प्रक्षेपित करणार असून ते मंगळाचे नमुने पृथ्वीवर आणणार आहे. यामुळे नासाला मंगळ ग्रहावरील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेणार आहे.
पावसाळ्यात वाहनांची विशेषत्वाने चारचाकींची जरा अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निश्चितच विमा संरक्षण हा एक उत्तम पर्याय. त्यानिमित्ताने आजच्या लेखात वाहनांसाठीच्या विमासंरक्षणाची सविस्तर माहिती करुन घेऊया...
देशात २०१७ पर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालून देशाने इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात करावी, अशी शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने स्थापन केलेल्या माजी तेल सचिव तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने आपल्या स्थापनेपासूनच नवनवीन विक्रम रचले आहेत. एकेकाळी अंतराळ क्षेत्रातील प्रगत देशांकडून तंत्रज्ञान नाकारल्या गेलेल्या भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बड्या राष्ट्रांचे उपग्रह अतिशय कमी किमतीत प्रक्षेपित करण्यास प्रारंभ केला आहे. ‘चांद्रयान’ असो की ‘मंगळयान’, प्रत्येकवेळी ‘इस्रो’ने जगाला चकीत करणारी कामगिरी केली आहे. त्याचे आकलन...
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी सकाळी म्हणजे २ एप्रिल रोजी मोठे यश मिळवले. इस्त्रोने री-युजेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन यशस्वीपणे लाँच केले. इस्त्रोसाठी ही एक फार मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. या मोहिमेत आरएलव्ही एलईएक्स रॉकेटच्या सेल्फ लँडिंगची चाचणी घेण्यात आली. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हे रॉकेट हवाई पट्टीवर सेल्फ लँडिंग करेल. त्याच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा अत्यंत कमी खर्चात केल्या जातील.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून दिल्लीपेक्षाही अधिक मुंबईच्या हवेतील प्रदूषण वाढले आहे. यामुळे आजारांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यावर अखेर महापालिकेने लक्ष घातले असून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी बुधवार, दि. ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएस) यशस्वी चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान ‘एमआरएसएएम’ने अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा भेद केला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरच्या ‘मॉनिटरी पॉलिसी कमिटी’च्या बैठकीत ‘रेपो रेट’मध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी ‘रेपो रेट’ वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजूने मतदान केले. या नव्या वाढीसह आता ‘रेपो रेट’ 6.50 टक्के इतका झाला आहे. ‘रेपो रेट’मध्ये आता वाढ केली आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात ईलेक्ट्रोनिक वाहन क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदींना भरीव फायदा मिळणार आहे. देशात ईलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. लिथियम बॅटरीजवर लागू केल्या जाणाऱ्या आयात शुल्कातही घट करण्यात आली आहे. याबद्दल सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स सोहिंदर गिल यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या दर्जाच्या 'मेड इन इंडिया' ईव्ही घटकांच्या कमतरतेच्या कठीण काळातून गेल्यानंतर, स्थानिक पुरवठा साखळी आकार घेऊ लागल्या आहेत.", असेही ते म्हणाले.
दि. 9 सप्टेंबर हा दिवस ‘इलेक्ट्रिक वाहन दिवस’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन संबंधी धोरणाचा विचार करता, आपल्या देशाचेही इलेक्ट्रिक वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर भरीव प्रयत्न करावे लागतील. तसेच कर्जासाठीच्या प्राधान्य क्षेत्रात या उद्योगाचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर...
हरित उपक्रमांचा पाठपुरावा करणाऱ्या मध्य रेल्वेने महत्त्वाच्या स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दि. ४ सप्टेंबर मुंबईजवळील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कार चालकासह त्याच्यासोबत प्रवास करणारे अन्य दोन जण जखमी झाले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सध्या देशभर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्र यांसारख्या तुलनेने नवीन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि त्यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीतील योगदान यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरावे. या अनुषंगाने नुकताच जाहीर झालेला ‘मॅकिन्से अॅण्ड कंपनी’चा अहवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उद्योगक्षेत्रांविषयी व्यक्त केलेले विचार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एकूणच सकारात्मक चित्र यांचा आढावा घेणारा हा लेख...