स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याप्रमाणेही अवस्था आरशासारखी वा एखाद्या शुद्ध व शांत तळ्याच्या पाण्याप्रमाणे असते. मनाद्वारे बाहेरून प्राप्त झालेले संस्कार नसण्याइतके शांत झाल्यास त्या मूळ अवस्थेला ‘चित्त’ असे म्हणतात. एखादी ‘स्प्रिंग’ ताणून धरल्यास व नंतर सोडल्यास जशी ती मूळ अवस्थेत परत येते, तद्वत चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत राहू दिल्यास ते आपणहून उत्क्रांतीच्या उच्च अवस्था प्राप्त करीत असते.
Read More
चैत्र मासात येणार्या ‘मत्स्यजयंती’च्या दिवशी भगवंतांनी समुद्रात लोप पावणार्या वेदांचे रक्षण करून मानवी सृष्टीच्या पैलतीराला ते नेऊन पोहोचविले. भगवान वेदव्यासांचा ‘पैल’ नावाचा शिष्य होता. व्यासांची माता मत्स्योदरी हीसुद्धा मत्स्याचाच अवतार. याच मत्स्योदरीच्या पोटी वेदव्यासांनी जन्म घेतला. त्यांचे पिता पराशर-परासृष्टीला शर मारून वेध घेणारे ते पराशर. सात वर्षांच्या लहानशा मत्स्योदरीवर ते भाळले होते. सप्तचक्रांकित मानवी देहपिंडावरच तर साधकाची सारी मदार असते.
मोक्षदा एकादशी अर्थात मोक्ष देणारी एकादशी! याच शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ऐन समरांगणावर गीता सांगितली म्हणतात. पुष्कळांच्या मनात एक शंका येते की, ऐन समरांगणाच्या धुमश्चक्रीत भगवंताला संपूर्ण गीता सांगून अर्जुनाला उपदेश करायला वेळ कसा सापडला? ज्ञान देण्याकरिता वेळ लागत नाही. अर्जुनाला संदेह झाल्यावर भगवंतांनी त्याच्याकडे दृष्टीमात्र फिरविली आणि दृष्टादृष्ट होताच अर्जुनाचा मोह नाहीसा झाला व त्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली.
वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत. त्यात व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही की भौगोलिक अवस्थांचा बडेजाव नाही. वैदिक धर्म, परंपरा आणि संस्कृती कोणा एका प्रेषिताची मिरासदारी नसल्याने वैदिक सण, उत्सवात व्यक्तीचे जन्म दिवस वा त्यांच्या पराक्रमाला धरुन केलेल्या जल्लोषाला मुळीच स्थान नाही. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही की व्यक्तिद्वेष नाही, पंथाभिमानाने पेटून केलेल्या युद्धसंचाराचा जल्लोष नाही की काल्पनिक विजय