(Suvarna Karanje)“आमदार म्हणून सुनील राऊत यांनी कामे केली नाहीत, हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. ज्यावेळी या मतदारसंघाचे मतदार बदल घडवतील आणि आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवतील, त्याच वेळेला भोंगा, दादागिरी संपणार आहे,” असा घणाघात विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
Read More
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
'आप’चे खासदार संजय सिंह मद्यघोटाळा प्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी म्हणे संजय राऊत त्यांच्या घरी गेले. आता राऊतांचा म्हणा काय संबंध? संजय सिंह काय मोठी देशसेवा करून समाजहित साधले म्हणून तुरुंगात गेले का? तर नाही मद्य घोटाळ्यात ‘ईडी’च्या चौकशीत संजय सिंह यांचे चारवेळा नाव आले. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर कारवाई झाली. दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणाले की, ”जे खरे बोलतात, त्यांना शिक्षा दिली जाते.
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरु झाला असून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झाला आहे. गणेशचतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी १०.२३ वा. प्राणप्रतिष्ठेला सुरूवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याआधी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून काढण्यात येईल.
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबीथू गावातून 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे, या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने ४८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, यापैकी २५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. 'व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम' या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब येथील माजी नगराध्यक्ष,नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथजी शिंदे व धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत कळंब शहरातील नगर परिषद चे माजी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी असे एकूण 89 लोकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. प्रवेश करणाऱ्यात माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर यांच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी येथील नवीन सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते आज झाले.
गुढीपाडवा नववर्षदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. 22 मार्च रोजी राज्यात सर्वत्र स्वागतयात्रांचा जल्लोष दिसून आला. त्यातून संस्कृतीची गुढी उभारण्यात आली.मुंबई उपनगरातील स्वागयात्रांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी गिरगाव, पार्ले तसेच ठाणे, डोंबिवली यासह राज्यातील अन्य भागांतही जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात आल्या. ढोल-ताशा, लेझीम पथक, नऊवारी साडीतील महिला, सांस्कृतिक वेशभूषा केलेली मंडळी आदींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
डोंबिवलीतील पीएनटी कॉलनीतील होली एजंल्स या शाळेतील दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या विद्यार्थिनीने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ती सीबीएसई बोर्डाची देखील टॉपर ठरली असल्याची माहिती शाळेचे संचालक ओमन डेव्हीड यांनी दिली आहे.
‘सुवर्णकांचन योगा’प्रमाणे औरंगाबादच्या एका मायलेकाच्या जोडीने जलतरणामध्ये ‘सागरकांचन योग’ साधला. राष्ट्रीय जलतरणपटू राहिलेल्या कांचन म्हसकर-बडवे आणि त्यांचा दिव्यांग मुलगा सागर बडवे यांनी जलतरण क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवला आहे. अशी ही कर्तृत्वाची कहाणी म्हणूनच केवळ जलतरणात यशस्वी ठरलेल्या एकट्या सागरची नव्हे, तर कर्णबधीर-अंशत: दृष्टिदोष असलेल्या सागरला जलतरणपटू म्हणून घडवणार्या मायमाऊलीचीही...
सुवर्णभूमी अफगाणिस्तानात बघता बघता महिनाभरात केवळ ६०-७० हजार तालिबानी सैन्याने साडेतीन लाखांच्या प्रशिक्षित (?), शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या राष्ट्रीय (?) सैन्यावर विजय मिळविला. ही बाब संरक्षण आणि युद्धतज्ज्ञांसाठी अभ्यासण्याचा विषय राहील. चर्चिलने दुसर्या महायुद्धादरम्यान डंकर्कच्या खाडीतून शस्त्रास्त्रे घेतल्याविना सैन्य काढले. त्यावेळी त्याने सांगितले होते की, “मनोबल असलेली मनगटे लढतात, शस्त्रे नाही.” त्याचे पुरेपूर प्रत्यंतर गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात दिसले. अफगाणिस्तानात यापुढे काय घडण्याची श
सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या आपत्तीप्रसंगी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देते, कार्याची परिसीमा गाठते, तेव्हा निश्चितच एक सकारात्मक सामाजिक चित्र उभे राहते. याचीच अनुभूती ठायी ठायी आपल्याला येते ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी कोरोनाकाळात केलेल्या व्यापक मदतकार्यातून. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाकार्याचा हा परिचय...
‘गृहकर्तव्यदक्षता’ हा तर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य गुण. अशी सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचा कारभार हाती घेते, तेव्हा घडणारे बदल हे निश्चितच नेत्रदीपक असेच असतात. याचीच अनुभूती येते, ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत. कारण, येथील कारभार आहे अशाच एका कर्तव्यदक्ष महिला सभापतीच्या हाती.सुवर्णा जगताप त्यांचे नाव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
सुवर्ण आणि विदेशी चलन तस्करीच्या या व्यवहारामध्ये स्वप्ना सुरेशचा सक्रिय सहभाग असल्याने तिला या सर्व व्यवहारांची आणि त्यात गुंतलेल्या बड्या धेंडांची माहिती असल्याचे आढळून आले आहे. सुवर्ण तस्करीचे हे प्रकरण केरळमधील डाव्या आघाडीच्या नेत्यांना महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.
‘खेलरत्न’ या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारासाठी टेबल टेनिस सुवर्णस्टार मनिका बत्राची शिफारस करण्यात आली. तेव्हा, जाणून घेऊया तिचा हा रंजक प्रवास...
‘इफ्फी’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट माईघाट आणि मल्याळम चित्रपट जलीकट्टू हे दोन चित्रपट भारतातर्फे 'सुवर्ण मयुर पुरस्कार' स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत. २० देशांचे १५ चित्रपट ईफ्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
श्री माता वैष्णोदेवी धाम मधील पवित्र नैसर्गिक गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ एक भव्य सुवर्णद्वाराची रचना पूर्ण झाली आहे. लवकरच भाविकांना सोन्याचा हा भव्य दरवाजा पाहता येणार आहे.
चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार
जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता