( Mass wedding ceremony of 125 brides and grooms concluded in Varanasi ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी वाराणसी येथे आयोजित अक्षय्य कन्यादान महोत्सवात सहभागी होऊन सामाजिक समरसता आणि पारंपरिक मूल्यांचे उत्तम उदाहरण सादर केले. उच्चवर्णीय, दलित आणि मागासवर्गीय समाजांतील पार पडलेल्या 125 वर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्यात वडिलांच्या भूमिकेत येऊन एका जनजाती मुलीचे कन्यादान केल्याचे पाहायला मिळाले.
Read More
Narendra Modi यांनी शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ रोजी लोकसभा निवडणूक लढवलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात त्यांनी ५० वा दौरा केला होता. ज्यात त्यांनी काशीकरांना विकास प्रकल्पाची भेट दिली. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहंदीगंज येथे दाखल झाले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.
Kashi Vishwanath वाराणसीमधील काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिराच्या २ किमी अंतरावरील मांस आणि मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसराच्या २ किमीच्या सानिध्यातील परिसरामध्ये एकूण ५५ दुकाने असून संबंधित दुकांनांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यातील १० दुकानांवरील नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ३ एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत.
वाराणसीच्या मदनपूरमध्ये कट्टरपंथींयांच्या वस्तीमध्ये असलेल्या भागात कुलूपबंद असलेले मंदिर ८ जानेवारी २०२५ रोजी उघडण्यात आले. यानंतर महादेवाच्या शिवलिंगाची पहिली प्रतिमा आता समोर आली आहे. बुधवारी प्रशासनाच्या पथकाने मंदिराचे कुलूपबंद असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडत साफसफाई सुरू केली. यानंतर आता मंदिरामध्ये महादेवाचे शिवलिंग त्याठिकाणी दिसू लागले असून संपूर्ण परिसरामध्ये हर हर महादेवाच्या घोषणा दिल्या जात आहेत. यासाठी हिंदू अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते.
Chicken उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये ९ जणांना पनीर असे सांगून चिकन खाऊ घातल्याची धक्कादायक घडली. जेवण करत असताना त्याला जेवणाची चव व्यवस्थित न लागल्याने त्याला जेवणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. अन्न चावत असताना पनीरच्या नावाने चिकन दिल्याचे उघडकीस आले आहे. रेस्टॉरंट हे सपा नेत्याच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणानंतर आता वाराणसीतील ( Varanasi ) मदनपुरा भागात ४० वर्षे जुने मंदिर सापडले आहे. यासंदर्भात सीएम योगींना पत्र लिहून सनातन रक्षक दलाकडून हे मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मंदिर १५० ते २५० वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात या मंदिराचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या मंदिराजवळच्या सिध्दतीर्थ विहीरीचाही उल्लेख यात दिसून येतो.
Waqf Board उत्तर प्रदेशातील एका ५०० एकर जागेत पदवी महाविद्यालय, आंतरमहाविद्यालय, राणी मुरार कन्या शाळा, राजर्षी शिशु विहार, राजर्षी पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या महाविद्यालय आणि शाळेत एकूण २० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. उदय प्रताप महाविद्यालयाची स्थापना सुमारे ११५ वर्षांपूर्वी १९०९ मध्ये भिंगा येथील राजा उदय प्रताप सिंह जुदेव यांनी केली होती.
वक्फ बोर्डाची दावेदारी दिवसेंदिवस वाढत असताना, वाराणासी इथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश वक्फ बोर्डाने वाराणसी येथील प्रसिद्ध उदय प्रताप महाविद्यालयाच्या (यूपी कॉलेज) मालमत्तेवर दावा केला आहे. लखनौ स्थित यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने यूपी कॉलेजच्या जमिनीवर वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शीख समुदायासाठी एक अनोखे पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ५ गुरुद्वारांना भेट दिली जाईल. भारत गौरव ट्रेन चालवून हे दर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा दौरा नऊ रात्री आणि १० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात नांदेड येथील श्री हुजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगर साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि भटिंडा येथील श्री दमदमा साहिबचे दर्शन घेतले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसी दौऱ्यावर असताना, देशभरातील विमानतळ प्रकल्पांसह ६,१०० कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या विकासकामांचे लोकार्पण केले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आणि बिहार या ५ राज्यांमध्ये ७ नवीन विमानतळे उभारली जाणार असून, देशाच्या विकासाला यामुळे हातभार लागणार आहे.
वाराणसी स्थित ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशाना धमकी येते आहे. ज्यानंतर एनआयएने त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी २०२२ मध्ये ज्ञानपावी संकुलाच्या सर्वेक्षणासाठी एएसआयद्वारा वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यास मंजूरी दिली होती. मुस्लिम या संकुलाला मशिद असल्याचे सांगतात. पंरतु औरंगजेबाने त्या जागेवरील मंदिर उद्धवस्त करत तिथे मशिद बांधली होती. या संकुलात त्रिशूल, कलश आणि देवी-देवातांच्या मूर्त्या ही सापडल्या आहेत.
प्रवासाच्या वेळेत कपात करण्याव्यतिरिक्त हा रोपवे प्रकल्प शहराचे विहंगम दृश्य प्रदान करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर असून पुन्हा एकदा जिंकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान होते. त्यांनी अजय राय यांच्याविरुध्द १ लाख ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन वाराणसीतील नागरिकांना केले आहे. ते सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केदार घाटावर पूज्य संत आणि समाजसेवकांच्या उपस्थितीत श्री करपात्री धाम येथे आयोजित 'एक भारत-श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाला संबोधित केले.
भाजपने सहाव्या टप्प्यामध्येच हवे ते साध्य केले आहे. त्यामुळे आता सातव्या टप्प्यानंतर जे जे सांगितले, ते ते सर्व साध्य होणारच; असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसी येथे व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये प्रचार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी मोदींनी वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर जाऊन पूजा केली. उमेदवारी अर्ज भरताना मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १४ मे २०२४ तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीए आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला चार प्रस्तावकांची आवश्यकता असते. दरवेळी प्रमाणे उमेदवारी अर्ज भरताना मोदींच्या प्रस्तावकांची चर्चा झाली.
राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाने संदेशखाली येथे नुकत्याच झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला आहे. समितीने राज्यातील महिलांच्या दुर्दशेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करणारा ठराव संमत केला असून केंद्र सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. (Sandeshkhali Samiti Baithak)
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक मुस्लिम जोडप्याने घरवापसी केली आहे. आता अब्दुल्ला शिवप्रसाद बनले आहेत, तर त्यांची पत्नी फातिमा आता कविता या नावाने ओळखली जाणार आहे. दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी विधीनुसार सुंदरकांड पठण आणि हवन करून कुटुंब घरीने हिंदू धर्मात घरवापसी केली. २५ वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या या जोडप्याने सनातनी लोक म्हणून आपले जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येऊन दरदिवशी रामललाचे दर्शन घेत आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई ते अयोध्या रेल्वे सेवा असली तरी भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना अयोध्या प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्याहून थेट अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पहिली बस धुळ्याहून अय
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. मी इंडी आघाडीचा भाग असूनही पश्चिम बंगालमध्ये राहूल गांधींच्या नेतृत्वात आलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी मला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला आपल्या जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात विराजमान झाले. त्यानंतर लगोलग वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील तळघरात हिंदूना पूजेचा अधिकार असल्याचे सांगत मोठा निर्णय दिला. त्यानंतर गुरुवार, दि. १ फ्रेब्रुवारी रोजी ३० वर्षांनंतर व्यास तळघरात विधिवत पूजा करण्यात आली. हिंदू समाजासाठी निश्चितच या वर्षातील दोन महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटना आहेत. त्याचबरोबर मथुरा येथील कृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशीद हटवण्याच्या मागणीसंदर्
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी ३१ जानेवारीला एतिहासिक निर्णय देत ज्ञानवापी परिसरातील व्यासजी का तेहखाना ( तळघर ) या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवसांत तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे तळघर ज्ञानवापी परीसरात असलेल्या मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तेथे नियमित पुजा विधी होणार आहेत
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. २४ जानेवारी २०२४ ला महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. आपल्या निर्णयामध्ये न्यायालयाने 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (एएसआय) ने ज्ञानवापी परिसरात केलेले पुरातत्वीय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूच्या लोकांना हा अहवाल पाहता येणार आहे.
ज्ञानवापी संकुलाच्या सीलबंद सर्वेक्षण अहवालाबाबत जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) यापूर्वीच न्यायालयात अहवाल दाखल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची धार्मिक-आध्यात्मिक राजधानी वाराणसी येथे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र असलेल्या 'स्वरवेद महामंदिर'चे उद्घाटन केले. अंदाजे 3 लाख स्क्वेअर फुटात बांधलेल्या स्वरवेद महामंदिरात २० हजार लोक एकाच वेळी योगा करू शकतात. तर या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी २५ हजार कुंड्या स्वरवेद ज्ञान महायज्ञही पार पडला.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या अक्षता श्री राम मंदिरातून लोकांच्या घरी पोहोचवल्या जात आहेत. यासाठी अक्षता अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरापासून देशातील विविध शहरांमध्ये पोहोचवल्या जात आहेत
अभिनेते नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाराणसीत सध्या ते एका चित्रपटाचे चित्रिकरण करत असून यावेळी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅनला नाना पाटेकरांनी रागात डोक्यात टपली मारली होती. घडलेल्या या घटनेनंतर नानांना नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतु, लोकांचा राग लक्षात घेता नानांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकरणाचे स्पष्टीकरण देत माफी देखील मागितली होती. मात्र, आता नानांनी ज्या मुलाला मारलं त्या मुलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून यात नानांनी मागितलेल्य
अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर धुमाकुळ घालत आहे. नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला डोक्यात चापट मारल्याबद्दल ट्रोल केले जात आहे. मात्र, आता नाना पाटेकरांनी या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. घडलेल्या संपुर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण नानांनी दिले आहे. मी असे कृत्य कधीच करत नाही. कोणालाच मी फोटो काढण्यासाठी मनाई करत नसल्याचे नानांनी म्हटले आहे. दिग्द्रशक अनिल शर्मा यांच्या आगामी 'जर्नी' चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सध्या नाना पाटेकर वाराणसी येथे असून यावेळी ही घटना
अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. गेली अनेक वर्ष मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका नाना पाटेकर यांनी साकारत आहेत. सध्या नाना वाराणसीत त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. या चित्रिकरणादरम्यानचा नानांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक फॅन नाना पाटकेर यांच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आला असता नानांनी त्यांचा डोक्यात मारलेले दिसत आहे.
जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असताना आता एका महिलेने त्यांच्यावर पीएचडी केली आहे. नजमा परवीन असे या महिलेचे नाव आहे. वाराणसीमध्ये राहत असलेल्या नजमा परवीन या पंतप्रधान मोदींवर पीएचडी करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
https://sangraha.net/s90/NBImages/12021/2023/10/25/kashi_202310251414334366.jpg
वंदे भारत एक्सप्रेस ,नरेंद्र मोदी ,नवी दिल्ली ,वाराणसी Vande Bharat Express, Narendra Modi, New Delhi, Varanasi Vande Bharat Express update देशात सुरू झालेल्या ३४ वंदे भारत एक्सप्रेस नेमक्या कुठे धावतात? देशभरातील एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संपूर्ण म
उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाली. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट म्हणून दिली. या जर्सीच्या मागे 'नमो' असे लिहिले होते.
उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पायाभरणी पार पडली. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मोदींना भारतीय संघाची जर्सी भेट दिली. यामध्ये जर्सीवर 'नमो' नाव असून त्याला एक नंबर देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.
अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या तिच्या आगामी ततलुबाज चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र, या चित्रिकरणादरम्यान तिने पहिल्यांदाच वाराणसीला भेट दिली आहे. यावेळी तेथील संस्कृती आणि इतिहासाची तिला भूरळ पडली असून वाराणसीची ही पहिली भेट रोमांचकारी असल्याच्या भावना नर्गिसने व्यक्त केल्या आहेत.
वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये भारतीय पुरातत्व विभागाची टीम गेल्या ३७ दिवसांपासून सर्वेक्षण करत आहे. न्यायालयाकडून चार आठवड्यांचा अवधी मिळाल्यानंतर जिल्हा एएसआयचे पथक तयारीनिशी काम करत आहेत. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी विविध पैलूंवर तपास करण्यात येत आहे. पथकाने सर्वेक्षणाचा वेग वाढवला असून या महिन्याच्या अखेरीस संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तळघरातील पुरावे तज्ञ तपासतील. तसेच जिल्हा न्यायाधीशांनी सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल ६ ऑक्टोबरपर्यंत मागवला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी (एनआयए) माकप – माओवादी या नक्षलवादी गटाविषयी उत्तर प्रदेशातील प्रयागराज, वाराणसी, चंदौली, आझमगड आणि देवरिया जिल्ह्यात छापेमारी केली.
आज भारत चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ उतरवणार आहे. सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाला पहायला मिळणार आहे. या क्षणाची सर्वांनाच आतुरता लागली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय विक्रम लँडरचे चंद्रावर प्रक्षेपण व्हावे आणि चांद्रयान-३ हे मिशन यशस्वीपणे पार पडावे यासाठी संपुर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना ही मोहिम यशस्वी होण्याकरिता आता देशातील जनतेकडून यज्ञ तसेच पुजा-अर्चना करण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी होऊ दे, असे मागणेही मागण्यात येत आहे. आज वाराणसी येथील मंदिरात लोकांकडून ही पुजा करण्यात येत आहे.
प्रियांका गांधी – वाड्रा यांनी वाराणसीहून लोकसभा निवडणूक लढविल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये परत जातील, अशी आपली ‘भविष्यवाणी’ असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी व्यक्त केले आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी म्हणाले, प्रियांका गांधी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये परत जावे लागणार आहे. प्रियांका यांच्याविरोधात मोदी हे लोकसभा निवडणूक लढविणारच नाहीत, अशी आपली भविष्यवाणी असल्याचे अल्वी यांनी म्हटले आहे.
वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणात दि. ६ ऑगस्टपासून सुरू आहे.त्याचवेळी ज्ञानवापीत हिंदू पक्षकारांनी खंडित मूर्ती, तुटलेले खांब, खंडित कलाकृती, त्रिशूल आणि कलशाची अनेक चिन्हे इत्यादी आढळल्याचा दावा केला आहे. मात्र, एका इमामने हा दावा फेटाळून लावला आहे.
स्वातंत्र्य दिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्ड देखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकच्या फ्लाइट सर्च डेटामधून पाहायला मिळाले आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, यात त्रिशूलसह हिंदू धर्माची इतर चिन्हे आहेत. त्यामुळे या संकुलाला मशीद म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “ज्ञानवापीमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मुर्ती आहेत. ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे २४ सदस्यीय पथक ज्ञानवापीचे आज सर्वेक्षणाचे करणार आहे. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून शहरात प्रशासन हाय अलर्टवर असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोमवारपासून (२४ जुलै २०२३) होणार्या या सर्वेक्षणात हिंदू पक्षाने सहकार्याचे आश्वासन दिले असले तरी मुस्लिम पक्षाने सर्वेक्षणाची तारीख वाढवण्याची मागणी केली होती.
ज्ञानवापीमध्ये एएसआयकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२४ जुलै २०२३) आदेश दिला की, वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने २१ जुलै रोजी दिलेल्या आदेशाला २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती दिली जात आहे. तोपर्यंत 'मशिद समिती' या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे (एएसआय) करण्यात येत असलेल्या ज्ञानवापी मशीद परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बुधवारपर्यंत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश वारणसी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणास (एएसआय) दिला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे.
"जागतिक मंदिर परिषदेच्या माध्यमातून देशातील मंदिरे परस्परांशी जोडण्याचा आणि त्यांच्यातून हिंदू संस्कृतीचे संवर्धन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्या मंदिरांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातून धर्माचे रक्षण करणे हा आमचा मानस आहे. धर्मो रक्षित रक्षितः हेच आमचे ब्रीद असून हाच जागतिक मंदिर परिषदेच्या आयोजनामगिल हेतू आहे," असे प्रतिपादन जागतिक मंदिर संमेलन समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले आहे.
भारताचे अध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या वाराणसीमधील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जगातील पहिले 'आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. २२-२४ जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चासत्रे, सादरीकरणे, कार्यशाळा व मास्टर क्लासेसच्या माध्यमातून, मंदिर व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा व मार्गदर्शन सत्र होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन प पु. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. ते उपस्थितांना पाथेय देतील. या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये ४५०हून अधिक प्र