वनवासी पाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जीवन आधार संस्था’ कार्यरत आहे. या संस्थेने दोन वनवासी पाडे दत्तक घेतले आहेत. तसेच, डोंबिवली शहरातील एक शाळा दत्तक घेतली आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
Read More
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेणार्या नाशिकच्या युवा कीर्तनकार अश्विनी हिरामण चौधरी यांच्याविषयी...
’जनजाती सुरक्षा मंचा’चे जे राष्ट्रव्यापी अभियान सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून रांचीमधील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ज्या मागास जाती-जमातीच्या नागरिकांनी धर्मांतर करून, अन्य धर्मांमध्ये प्रवेश केला आहे, त्यांची नावे मागास जाती-जमातींच्या सूचीमधून वगळण्यात यावीत, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
भारताच्या लोकसंख्येमध्ये वनवासी समुदायाचा वाटा सुमारे नऊ टक्के आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल ५२ वर्षांनंतर १९९९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये ही वस्तुस्थिती सांगितली आहे. याद्वारे वनवासी समुदायाच्या उत्थानासाठी भाजप प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा प्रचार भाजपतर्फे केला जात आहे.
१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच हिंदू धर्माचे अभिन्न घटक असलेल्या वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास म्हटला, तर थक्क करणारा तर आहेच. पण, या देशाच्या एका समाज घटकाला त्याचे आत्मभान आणि गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी चालू असलेला, हा प्रवास त
वनवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वनवासी बांधवांनीदेखील आपल्या परंपरा जपून आधुनिकतेचा अंगिकार करावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे.
महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या जीवन सहचारिणी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रमामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. कौटुंबिक जबाबदार्यांसह त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांच्या अशा या कार्यमग्न जीवनाचा परिचय करुन देणारा हा श्रद्धाजंलीपर लेख...
पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले.
‘वन हक्क, वनपट्टे मिळालेच पाहिजेत,’ अशा घोषणा देत हाती फलक घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शेकडो वनवासी बांधव सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. वनवासींची जमीन लाटण्यासाठी बिल्डरांना पुढे करून येथे ‘क्लस्टर योजना’ राबवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
वनवासी कल्याण आश्रमाच्या हुशार, मेहनती कार्यकर्त्या वैशाली दिनकर देशपांडे यांची ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार ‘मालतीदेवी माधवराव पटवर्धन स्मृतिप्रीत्यर्थ’ दिला जातो. नुकताच पुण्यामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सध्या वैशालीताईंकडे प. महाराष्ट्र प्रांत महिला कार्य सहप्रमुख म्हणून दायित्व आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात वनवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून दिसणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद ने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. या उपक्रमात धसई, मुरबाड जवळील वनवासी पाड्यात २३० वनवासी भगिनींना साडी व मिठाई भेट देण्यात आली.
प्रशासकीय सेवेत अमूल्य कार्यठसा उमटवणाऱ्या अधिकारी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, वनवासी कल्याण आश्रम (कोकण प्रांत) उपाध्यक्षा वर्षा अनिल कोल्हटकर यांच्या कर्तृत्वाला वंदन करणारा लेखमालेतील दुसरा लेख...
वनवासी समाजबांधवांच्या उत्थानासाठी भारतीय राज्यघटनेने कितीतरी कायदे केले. कितीतरी व्यवस्था निर्माण करण्याचे सूचित केले. पण, आधीच प्रदीर्घ काळात मुख्य समाजप्रवाहापासून दूर असणार्या या समाजबांधवांचा प्रश्न कोरोनाकाळात आणखीन जटील बनला. त्यातही महाराष्ट्रातील १,२००च्या आसपास असणार्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा प्रश्न तेथील विद्यार्थ्यांच्या जगण्याचा प्रश्न अनुत्तरित करून जातो.
रा. स्व. संघाचे प्रचारक, विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते भालचंद्र वासुदेव बर्वे ऊर्फ बापू (आप्पा) बर्वे यांचे दि. १० एप्रिल रोजी निधन झाले. बर्वे यांना गुरुतुल्य मानणार्या गिरीश जोशी यांनी आप्पांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे वनवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. शुक्रवारी भोसरी येथे आयोजित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रशांत भालचंद्र पाटील (वनवासी कल्याण आश्रम, नाशिक जिल्हा कार्यकर्ते व रा. स्व. संघ माजी नाशिक शहर सहकार्यवाह) यांचे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
सेवा क्षेत्रातील महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे नवे अध्यक्ष म्हणून रामचंद्र खराडी यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरात वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा निलीमा पट्टे, कृपाप्रसाद सिंह, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट प्रामुख्याने उपस्थित होते.
आज ९ ऑगस्ट. हा दिवस ‘जागतिक मूलदिवासी दिन’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. परंतु, भारत आणि या जागतिक दिनाचा काही संबंध आहे का? मुळात हा दिवस कोणी? का? कशासाठी सुरू केला? साजरा होऊ लागला? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांच्या आकस्मिक निधनाने वनवासी, जनजाती समाजाची तसेच ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची कधीही भरुन न येणारी क्षती झाली आहे. त्यांचे जीवनकार्य आणि आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
कल्याण आश्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला
पारधी कुटुंबातील दोन मुलांची त्यांच्या वडिलांसाहित हत्या; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कुटुंबाचा आरोप
कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया कारणीभूत ठरल्याचा आरोप
नुकतेच दि. २५ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे माझे वडील बंधू गजानन यशवंत उर्फ बाळासाहेब दीक्षित यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. ते आजन्म रा. स्व. संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते व गेली काही वर्षे 'वनवासी कल्याण आश्रमा'चे संघटनमंत्री होते. परंतु, गेली काही वर्षे अपंगत्वामुळे कंबरेचे फ्रॅक्चर व नंतर उद्भवलेला स्मृतिभ्रंश व इतर आजरांमुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या काही आठवणींना दिलेला हा उजाळा...
६६पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक म्हणून कार्यरत
तलासरी हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर एका प्रदीर्घ संघर्षाचा जीवनपट उभा राहतो. १९६४ साली विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर सेवाकार्य सुरू करण्याचा निर्णय होतो आणि तलासरी येथे प्रकल्प सुरू करण्याचे ठरते. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला, लाल बावट्याचा रक्तरंजित दहशतवाद, ख्रिश्चन मिशनर्यांचे जुने काम अशा प्रतिकूल परिस्थितीत अयोध्येच्या रामरायाप्रमाणे स्वतःचे राजकीय पद सोडून माधवराव काणे तलासरीत दाखल होतात. सात मुलांना घेऊन एका झोपडीवजा घरात वसतिगृहाची सुरुवात होते. अनंत अडचणी, स्थानिक विरोध, प्रकल्पावर झालेले हल्ले, कार
जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या वनवासी बांधवांच्या मोर्चाने अवघी मुंबई दणाणून सोडली.
वनवासी कल्याण आश्रमाच्या मोर्चाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा सामोरे गेले व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी स्वीकारले. यानंतर मोर्चामधील मागण्या व राज्य सरकारने त्यावर केलेली कार्यवाही, याबाबत दै. मुंबई तरूण भारतचे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी विष्णू सवरा यांची घेतलेली ही विशेष मुलाखत…
ज्यांच्याकडे हिंमत आणि साहस असते, तेच वेगळ्या उंचीवरील यशाला गवसणी घालू शकतात, हे आपण जाणतोच आणि फूलबासन यादवने आपल्या कार्यातून ते सिद्ध करूनही दाखवले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव लोहाणा सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा सचिव रवींद्र पाटील बोलत होते.
ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले व त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’च्या वतीने लोकसेवेसाठी विविध उपक्रम राबविले जातात