आपले जडशरीर मरणसमयी जरी नष्ट झाले, तरी त्यात वसत असलेला जीवात्मा उर्वरित देह, मन, बुद्धी पंचज्ञानेंद्रिये घेऊन बाहेर निघून जातो आणि कर्मगतीला जेव्हा वाट मोकळी होते, तेव्हा पुनः सुयोग्य जडशरीराद्वारे जीवात्मा मातृगर्भात आपोआप ओढला जातो. गीतेचा श्लोक हेच सांगतो.
Read More
जागतिक परिस्थितीत भारताला परमवैभवाप्रती नेण्याची शपथ घेतलेला एक नेता वेदांत व प्राचीन संस्कृतीचे आधुनिक काळाला अनुसरून पुनरुत्थान करण्यासाठी कटिबद्ध झाला असल्याने जग आज भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे.
वेद-उपनिषदाच्या अभ्यासक आणि तत्वज्ञ पिंपरी-चिंचवडच्या कल्पना प्रकाश क्षीरसागर. ‘एकोहं बहुस्याम’ म्हणत जीवन जगणार्या कल्पना क्षीरसागर यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
पश्चिमी जगाची आज जी वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती आपल्याला दिसते आहे आणि त्या भौतिक प्रगतीतून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे आपण दिपून गेलो आहोत, ती एका रात्रीत झालेली नसून गेली किमान ५००-७०० वर्षं हळूहळू होत गेलेलीआहे आणि प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असा प्रश्न करा असं आम्हाला पाश्चिमात्यांनी कशाला सांगायला हवं? उपनिषदांमधलं सर्वश्रेष्ठ मानवी तत्वज्ञान हे शिष्याने गुरूला केलेल्या प्रश्नांमधूनच तर निर्माण झालंय - ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा.’