इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या अवकाश क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १०.४३ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. के. कस्तुरीरंगन इस्रोचे माजी संचालक होते.
Read More
नवी दिल्ली : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो)ने ( ISRO ) स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पेडेक्स)ची यशस्वी चाचणी घेतली. ‘इस्रो’ने रविवार, दि. १२ जानेवारी रोजी दोन अवकाश उपग्रहांमधील अंतर प्रथम १५ मीटर, नंतर तीन मीटर ठेवले. यानंतर दोन्ही उपग्रहांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
‘इस्रो’ अर्थात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने नुकतीच ‘स्पेडेक्स’ ही मोहीम प्रक्षेपित करुन, अंतराळ क्षेत्रात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविला. या मोहिमेमुळे अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना, शास्त्रज्ञांना गरजेच्या सामग्रीचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुलभरित्या पार पाडली जाईल. आजपर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी अंतराळामध्ये दोन अंतराळयान किंवा उपग्रहांचे ‘डॉकिंग’ करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आता त्या पंक्तीत भारतही सामील झाला आहे. तेव्हा, अशा या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेविषयी सविस्तर माह
नवी दिल्ली : भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या ’गगनयान’साठीची ( Gaganyan ) जय्यत तयारी सुरू आहे. या मोहिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला टप्पा नुकताच पार पडल्याची माहिती ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्त्रो) शुक्रवार, दि. २९ ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने इन-स्पेस(IN-SPACE) अंतर्गत अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित १ हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्यास मंजूरी दिली. दरम्यान, मोदी सरकारने अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी IN-SPACE ची स्थापना केली होती. अंतराळ अर्थव्यवस्था सध्या ८.४ अब्ज डॉलर इतकी असून २०३३ पर्यंत ४४ अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
केंद्र सरकारने अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी गगनयानाच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात २००हून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
भारत अंतराळ अर्थव्यवस्थेत निर्णायक भूमिका बजावणार असून 2033 सालापर्यंत जागतिक बाजारपेठेचा सुमारे आठ टक्के हिस्सा भारताने काबीज केला असेल. या क्षेत्रात भारताची उलाढाल 2033 सालापर्यंत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असे मानले जाते. केंद्र सरकारने या उद्योगाला दिलेले बळ त्याला चालना देत आहे, असे म्हणता येते.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ला रामसेतूचा सुधारित समुद्राखालील अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुष्यकोडीपासून श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत या सेतूचा नकाशा ‘इस्रो’ने प्रसिद्ध केला आहे. हा नकाशा तयार करण्यासाठी ‘इस्रो’ने अमेरिकेच्या उपग्रहाचेदेखील सहकार्य घेतले. अमेरिकन उपग्रहाच्या साहाय्याने समुद्रतळावर लेझरच्या माध्यमातून सेतूचे प्रतिबिंब मिळवणे ‘इस्रो’ला सोपे गेले. एकूण 29 किमीचा चुनखडी असणारा सेतू 99.98 टक्के समुद्रात बुडाला असल्याचे शास्त्रज्ञांनी
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने पुन्हा एकदा नवा किर्तीमान रचला आहे. इस्त्रोने तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. इस्रोने सांगितले की यावेळी प्रक्षेपण वाहनाची चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली आणि ती सर्व मानके पूर्ण करते. या चाचणीमध्ये, इस्रोने लँडिंग इंटरफेस आणि विमानाच्या उच्च वेगाने लँडिंगची स्थिती तपासली.
चांद्रयान -१ या पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झाले आहे. ७१ वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी संबंधित आजारावर उपाचार सुरु होते. त्यामध्ये हद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ३० वर्षापेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमध्ये कार्यरत होते. २००८ मध्ये भारताच्या पहिल्या चांद्रयान १ या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भुमिका महत्त्वाची होती. सेवानिवृत्तीनंतर हेगडे हे बेंगलुरुमधील स्टार्टइअप टीमशी जोडले गेले होते. त्यांच्यापश्चात हेगडे यांच
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेईकलचे (आरएलव्ही एलईएक्स - ०२) यशस्वी लँडिंग केले.या स्वदेशी अंतराळयानाला ‘पुष्पक’ असे नाव देण्यात आले आहे. आरएलव्ही एलईएक्स – ०२ लँडिंग प्रयोगाद्वारे रीयुजेबल लॉन्च व्हेईकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड गाठला गेला आहे, असे इस्रोने म्हटले आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) मध्ये सकाळी 7.10 वाजता ही चाचणी घेण्यात आली. ‘पुष्पक’ उंचीवरून प्रक्षेपित केल्यानंतर अचूकतेने धावपट्टीवर यशस्वीरित्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशात विकसित झालेल्या ‘न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाईल’ ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचे ‘मल्टिपल इंडिपेन्डंटली टारगेटेबल रिएंट्री व्हेईकल’ तंत्रज्ञानासह (एमआयआरव्ही) पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या ‘मिशन दिव्यास्त्र’साठी ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांचे नुकतेच कौतुक केले. ‘मिशन दिव्यास्त्र’ची निर्मिती ही संपूर्णपणे स्वदेशात झाली आहे. त्यानिमित्ताने ‘अग्नी-५’ची संरक्षण सज्जता आणि ‘मिशन दिव्यास्त्र’ यांचा आढावा घेणारा हा लेख...
'आदित्य एल १' व 'चांद्रयान ३' यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो आज दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी 'GSLV-F14' या प्रक्षेपकाच्या मदतीने सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो)च्या इस्त्रोच्या हैदराबादस्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. या फोटोच्या माध्यमातून राम मंदिरानजीकचा परिसर शरयू नदी, दशरथ महालदेखील चित्रांमध्ये दिसत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एक नवा इतिहास रचणार आहे. भारताचे पहिले सौर मिशन लवकरच यशस्वीरित्या एल १ पॉइंटवर पोहोचणार आहे. गतवर्षी २ सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आता ते ध्येय गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
इस्रोने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. दि. १ जानेवारी २०२४ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेत क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला आहे. हा उपग्रह पीएसएलव्ही-सी५८ या रॉकेटच्या मदतीने अवकाशात झेपावला.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इस्रो नवा इतिहास रचणार आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही-सी ५८ मोहिमेअंतर्गत दि. १ जानेवारी २०२४ सोमवारी चार भारतीय अंतराळ स्टार्टअप्सचे उपग्रह अंतराळात पाठवेल. यामध्ये सूक्ष्म उपग्रह उपप्रणाली, थ्रस्टर्स किंवा लहान इंजिने असतील.
निसार हे नासा आणि इस्रोमधील एक संयुक्त अंतराळ मोहीम आहे. जे 2024 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. भारताच्या चांद्रयान-3 च्या जबरदस्त यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यूएस स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या सहकार्याने एक नवीन अंतराळ मोहीम निसार (NISAR) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे.
'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथापासून रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असाच आहे. भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' गगययान मोहिमेतंर्गत अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोने चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करत पुन्हा एकदा गगनझेप घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत २०२५ पर्यंत महिलांना अंतराळात पाठविणार आहे.
भारताने २०४० पर्यंत अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला केली. तसेच २१ ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण पार पडणार आहे. भारतही गगनभरारी घेऊ शकतो, या पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचेच हे यश म्हणावे लागेल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केल्यानंतर विविध मोहीमा हाती घेतल्या आहेत. त्यातील गगनयान मोहीम अंतिम टप्प्यात आली असून येत्या काळात मानवयुक्त आणि मानवरहीत मोहीम राबविण्यासाठी इस्त्रोत लगबग सुरु आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या सूर्य मोहिमेबाबत ३० सप्टेंबर रोजी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. भारताच्या आदित्य एल १ मोहिमे अतंर्गत पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानाने पृथ्वीपासून ९.२ लाख किलोमीटरचे अंतर पार करून पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून यशस्वीरित्या बाहेर पडले आहे. ते आता लॅग्रेंज पॉइंट १ (L1) च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
महाराष्ट्रात एक विश्वगुरू पंडित आहेत, त्यांनी भविष्यवाणी केली की, २०२४ साली मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. ‘इंडिया’ गटबंधनातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची हीच भविष्यवाणी आहे. आपल्या सारखी सामान्य माणसे भविष्यवेत्ती नसतात. आपण वर्तमानात जगतो म्हणून वर्तमान काय आहे, याचा जरा विचार करूया.
इस्रो आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या भारताचे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणार नाही. ISRO चे अहमदाबाद स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (SAC) संचालक नीलेश देसाई म्हणाले की, संपर्क प्रस्थापिक करण्याचं काम उद्या म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी केले जाईल.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, चांद्रयान ३ सारख्या मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने देशाचा गौरव केला आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन कायदा ही महिला शास्त्रज्ञांसाठी भेट आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या सौर मोहिमेला अपेक्षित यश मिळत असून, ‘आदित्य एल-१’नेशुक्रवारी पृथ्वी प्रदक्षिणेचे चार टप्पे अर्थात ’अर्थ बाऊंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती ‘इस्रो’ने ट्विटद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला लॅग्रेंज पॉईंटपर्यंत पोहोचण्याकरिता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, मोहिमेच्या १४व्
भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य एल १ उपग्रहाने १५ सप्टेंबर, २०२३ रोजी पृथ्वी प्रदक्षिणेचा चौथा टप्पा म्हणजे 'अर्थ बाउंड मॅन्युव्हर' यशस्वीपणे पूर्ण केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
सामाजिक क्षेत्रात गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ने १४ वर्षं पूर्ण होऊन १५व्या वर्षांत पदार्पण केले. राज्यातील विविध ठिकाणी ‘सेवा सहयोग फाऊंडेशनचा १५वा वर्धापन दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या या वर्धापन दिन कार्यक्रमांचा घेतलेला हा धावता आढावा...
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इस्रोने इतिहास रचला. आता आपला देश लवकरच अंतराळ महासत्ता म्हणून ओळखला जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनच्या तियांगॉंग अंतराळ स्थानकानंतर भारत जगातील तिसरे अंतराळ स्थानक ( स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. आयएसएस आणि चीनच्या स्पेस स्टेशनच्या तुलनेत ते अनेक अर्थांनी खास असेल.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने चांद्रयान ३ बद्दल ९ सप्टेंबर, २०२३ रोजी इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान २ ऑर्बिटरवरच्या ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने ६ सप्टेंबर, २०२३ रोजी चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरचे छायाचित्र टिपले आहे.
२ सप्टेंबर रोजी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या आदित्य एल-१ ने पृथ्वीवर आपला पहिला फोटो पाठवला आहे. आदित्य एल-१ ने अवकाशात पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतला आहे. आदित्य एल-१ सेल्फी घेत असतानाचा व्हीडिओ इस्त्रोने शेअर केला आहे.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण शनिवारी, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले. सूर्याभ्यासासाठी निघालेले हे यान १५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून एल १ पॉइंट पर्यंत पोहचणार आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेच्या प्रत्येक रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी काउंटडाउनसाठी जो आवाज आपण ऐकत होतो. तो आवाज एन वलारमथी यांचा होता. दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दि. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळीही संपूर्ण देशाने काउंटडाउन ऐकले होते, ते ही एन वलारमथी यांनीच केले होते. वलारमथी यांचा आवाज यापुढे श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांची काउंटडाउन करणार नाही. त्यामुळे सर्व शास्
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आदित्य L१ अंतराळयानाची कक्षा आज म्हणजेच रविवार, ३ सप्टेंबर रोजी वाढवली. आता ते २४५ किमी ते २२४५९ किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच त्याचे पृथ्वीपासून सर्वात किमान अंतर २४५ किमी आहे आणि कमाल अंतर २२४५९ किमी आहे.इस्रोने सांगितले की आता ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास आदित्यची कक्षा पुन्हा एकदा वाढवली जाईल. त्यासाठी इंजिन काही काळासाठी चालू करण्यात येईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो'ने चांद्रयान ३ या मोहिमेतंर्गत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर आतापर्यंत विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाविषयी नवनवीन माहिती पाठवत होता. त्यासंदर्भातील तपशील ' इस्त्रो'ने अधिकृतरित्या जाहीर केला.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. त्यामुळे आजपासून भारत सूर्य वारीला निघाला आहे असे म्हणावे लागेल.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे.
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आदित्य हा उपग्रह, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर ठेवण्यात येईल. सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोने आदित्य एल १ या यानात सात वेगवेगळी उपकरणे बसवली आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या यान उतरविल्याने भारताचे सर्वदूर कौतुक होत आहे. यामुळे भारत चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला. भारताच्या कमी खर्चिक परंतु महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेपैकी ही एक मोहीम आहे. या यशापाठोपाठ दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य-एल १’ ही मोहीम प्रक्षेपित झाली. भारताची अंतराळ मोहिमांमधील प्रगती आणि यश पाहता, ही मोहीमदेखील यशस्वी कार्य करेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने या सूर्यमोहिमेचा आढावा घे
भारताच्या पहिल्या सौर मोहिमेला म्हणजेच 'आदित्य एल १' ला आता काहीच तास उरले आहेत. रॉकेटची लॉन्च रिहर्सल आणि इतर तपासणीसुद्धा बुधवारीच पूर्ण होऊन इस्रो प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहे.
चांद्रयान-३ मोहिमेत अलौकिक यश मिळवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने सुर्य मोहिमेकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. सुर्याचा अभ्यास करणारे भारताचे हे पहिलेवहिले मिशन असल्याने ते खास असणार आहे.
चांद्रमोहीमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सूर्यमोहीम हाती घेतली आहे. आदित्य L1 असे या मोहीमेचे नाव असून २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी पीएसएलव्हीच्या माध्यमातून हे यान श्रीहरीकोटा येथुन पाठविण्यात येणार आहे.
पाटणा, बंगळुरूनंतर आता दि. ३१ ऑगस्टला ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आगामी लोकसभेच्या रणनीतीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यावरच बैठकीत मंथन तथा कुंथन होईल, हे कुणी सांगण्याची गरज नाही. देशातील २६ विरोधी पक्ष या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु, बैठकीआधीच राहुल गांधींवर त्यांच्या नेतेमंडळींकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव सुरू झाला.
भाजप सरकारने केलेली कोणतीही कामगिरी काँग्रेसच्या नेत्यांना खरी वाटत नाही, याला काय म्हणावे! पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्याचे पुरावे द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेबद्दल असे काही तारे तोडण्यात येत असतील, तर आश्चर्य वाटायला नको!