अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून, कोट्यवधी भारतीयांची इच्छापूर्ती केल्यामुळे, मोदी सरकारवर मतांचा पाऊस पडण्याची सारी चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने विरोधक बिथरले आहेत. पण, ज्या विरोधकांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अव्हेरले, नंतरही दर्शनाला जाण्यास नकार दिला, त्यांना जनमानस समजलेच नाही. पण, ही चूक आपल्याला चांगलीच भोवणार आहे, हे लक्षात आल्याने, आता ते रामालाच दूषणे देत आहेत. अशाने जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्यांना कसे मिळतील?
Read More
‘कोण भारतमाता? तिचा शोध घ्यावा लागेल’ यांसारखी बेजबाबदार आणि उद्दाम विधाने पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान करणार्या राहुल गांधींना मतदारांनी या निकालातून सणसणीत चपराक लगावली. मात्र, या निकालातून कोणताही धडा न घेता, द्रमुकच्या खासदाराने ‘गोमूत्रवाल्या राज्यांत भाजपचा विजय झाला,’ असे म्हणत हिंदू धर्म, सनातन संस्कृतीला अपमानित करण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न केला. तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी अशा सनातनविरोधी नेत्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवून दिल
सनातन धर्म हा एचआयव्ही आणि कुष्ठरोगाप्रमाणे सामाजिक कलंक असून त्याचे उच्चाटन केलेच पाहिजे, अशी मुक्ताफळे द्रमुक खासदार ए. राजा यांनी उधळली आहेत. त्याचवेळी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.