महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरण्याआधीच उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. उबाठा गटाची यादी जाहीर होताच, महाविकास आघाडीत फुट पडली आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुखणे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही.
इंडी आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला पत्र दिलं होतं पण उत्तर आलं नाही, असा दावा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याआधी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटासोबत युती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यजमान असलेल्या इंडी आघाडीच्या मुंबई बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना बोलवतील, असा अंदाज होता. पण उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना बोलावलं नाही.
विरोधकांच्या आघाडीची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीचे यजमानपद उबाठा गटाकडे आहे. या बैठकीच्या प्रचारासाठी उबाठा गटाने एक व्हीडिओ जाहीर केला होता. या व्हीडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उल्लेख करत भाजपा सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या या प्रयत्नात ते स्वत:च फसलेले दिसत आहेत.
विरोधकांच्या आघाडीची बैठक मुंबईमध्ये सुरु झाली आहे. या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांचे आदरातिथ्य करण्याची जबाबदारी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देखील सहभागी झाले आहेत. त्यांचे जंगी स्वागत उबाठा गटाकडून करण्यात आले. राहुल गांधींच्या स्वागतावर नेटकऱ्यांनी उबाठा गटाला चांगलेच निशाण्यावर घेतले आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २
लडाखच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (२० ऑगस्ट) लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा केला. राहुल गांधींच्या विधानाला उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी देशातील प्रमुख नेते, ते चीनच्या घुसखोरीबद्दल जे बोलत आहेत ते खरं आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि उबाठा गट वेगळा फॉर्म्युला तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, या केवळ चर्चा आहेत. ही वस्तूस्थिती नाही. राऊत यांचं निवेदन पाहिलं असेल. त्यात त्यांनीही सांगितलं की, या सगळ्या बाबी असत्यावर आधारित आहेत. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
उबाठा गटाकडून 'आवाज कोणाचा' हा पॉडकास्ट चालवला जातो. या पॉडकास्टमध्ये काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी उबाठा गटाचे गटप्रमुख उध्दव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आता 'आवाज कोणाचा' या पॉडकास्टचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.