(UNESCO) श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना यूनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे. या दोन्ही ग्रंथांना हा मान मिळणे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे वैश्विक मान्यतेचे प्रतिक आहे.
Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी पॅरिसला रवाना झाले आहेत.
एका वैज्ञानिक शोधाने आपल्याला झालेले आश्चर्य कमी व्हायच्या आधीच दुसरा एखादा वैज्ञानिक शोध लागलेला असतो, इतक्या वेगाने विज्ञान सध्या प्रगती करत आहे. मानवी जीवनाचे तर प्रत्येक अंगच विज्ञानाने व्यापले आहे. विज्ञानाच्या आपल्या जीवनावरील याच प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, काल जगभरात ‘जागतिक विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.
पंढरपूरच्या वारीला युनेस्को जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा नामांकन प्राप्त व्हावे, याचे संशोधन करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई येथील ‘मे. आभा नारायण लांबा असोसिएट्स’ या आस्थापनाची नियुक्ती केली होती. या आस्थापनाने याविषयीचे संशोधन आणि व्हिडिओ चित्रीकरण पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे सादर केले आहे. पुरातत्त्व विभाग याविषयीचा प्रस्ताव तयार करणार आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून पुरातत्त्व विभागाला 8 लाख 85 हजार रुपये निधी देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
२६\११ च्या स्मृतिदिनी पाकिस्तानने शारदा पीठ तोडल्याबद्दल अलिगढ, उत्तर प्रदेशच्या 'दारा शिकोह फाउंडेशन'ने युनेस्कोला पत्र लिहिले आहे. यामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद आमिर रशीद यांनी लिहिले आहे की, काश्मीरमधील पाकिस्तान सरकारने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाशिवाय वारसास्थळ हिंदू मंदिर 'शारदा पीठ'ची भिंत पाडली आहे. पाकिस्तान सरकार सांस्कृतिक वारसा असलेल्या हिंदू मंदिर 'शारदा पीठ'ला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. पाकिस्तानच्या नीलम खोऱ्यातील शारदा पीठ हे हिंदू मंदिराचे अवशेष आ
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित असलेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. रविवारी सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन आश्रम आहे.
नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आणखी एका भारतातील स्थळाची भर पडली. या यादीत आता शांतीनिकेतनचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अँटिओक, एडिसा, मालात्या, अलेप्पो इत्यादी या क्षेत्रातल्या शहरांना आणि त्यातील वास्तूंना दोन-तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. यापैकी अनेक वास्तू या भूकंपात उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कस्तानाला गझियन टेप इथला किल्ला दोन हजार वर्षांपूर्वी रोमन सम्राटांनी बांधला होता. तो कोसळला आहे. जगभरचे पुरातत्व शास्त्रज्ञ ’युनेस्को’च्या मदतीने या वास्तूंची शक्य तितकी डागडुजी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आज दि. २१ फेब्रुवारी. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. ‘युनेस्को’ने दि. १७ नोव्हेंबर, १९९९ पासून मातृभाषांच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने भाषा आणि मातृभाषा यांच्याविषयी जाणून घेऊया...
कोकणातील विस्तीर्ण अशा कातळांवर कोरण्यात आलेल्या अश्मयुगीन शिल्पांचा शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान प्राप्त झाले. भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातील आणखी तीन स्थळांचा समावेश झाला आहे. येत्या काही दिवसांत या कातळशिल्पाचे तीन स्तरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाकडून सर्वेक्षण करण्यात येईल, त्यानंतर केंद्रीय पुरातत्वीय सर्वेक्षण होईल आणि शेवटी युनेस्कोच्
नुकताच ‘जागतिक साक्षरता दिन’ साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे पारंपरिक शिक्षण पद्धतीला कोरोनाच्या संसर्गाने खीळ बसली आहे. शाळा सुरू नसल्याने जगभरातील बहुसंख्य देशातील विद्यार्थीसंख्येपैकी ६२.३ टक्के विद्यार्थी आज ‘ऑनलाईन’ पद्धतीने शिक्षण घेत असल्याचेही एका सर्वेक्षण अहवालातून नुकतेच समोर आले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीत तेलंगणाच्या पालमपेट येथील रामप्पा मंदिराला १७ देशांनी पाठिंबा दर्शविला आहे. चीनच्या फुझहू येथे जागतिक वारसा समितीच्या (डब्ल्यूएचसी) चालू असलेल्या ऑनलाइन बैठकीत एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,नॉर्वेने या शिलालेखाला विरोध दर्शवीला तर रशियाने यास पाठिंबा दर्शविला.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री रामचंद्राने सीतामाईची लंकेतून सुटका करण्यासाठी वानरसेनेने रामसेतू निर्माण केला. हा रामसेतू हिंदू धर्मीयांच्या श्रधास्थानाचा विषय आहे. याच रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी आता भारतातर्फे केली जात आहे. रामसेतूची महती वेगळी सांगण्याची गरज नाही.देशातील लिबरल विचारसरणीने कायमच या सेतूचा इतिहास मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामाला विरोध केला त्यांनीही या रामसेतूला पौराणिक मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामसेतू काल्पनिक आहे असं म्हटलं, मुळात रामायणाच काल्पनिक आहे, अस
‘ग्रीनहाऊस’मधील गॅस उत्सर्जनामुळे पूर्व-औद्योगिक काळापासून जागतिक तापमानामध्ये अंदाजे एक अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाळांच्या (कोरल) आम्लीकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘प्रवाळ रीफ’ ही जगातील एक संकटग्रस्त परिसंस्था म्हणून तयार होत आहे.
आपल्या इकडे काही ठराविक टाळक्यांनी सातत्याने समाजमनावर ठासवले आहे की, भारतात महिलांना बिल्कूल हक्क नाही, सन्मान नाही, धर्माने तिला गुलाम बनवले आहे वगैरे वगैरे. नुकताच ‘युनेस्को’तर्फे ‘वैश्विक शिक्षा परीक्षण’ (ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट (जीईएम रिपोर्ट)) प्रकाशित झाला. तो अभ्यासला तर वाटते की, भारताला महिलांच्या स्थितीबाबत उगीचच बदनाम केले आहे. उलट, जगभराच्या तुलनेत आपल्या इथे महिलांना चांगले प्रतिनिधित्व आहे.
जे जीवाची बाजी लावून अन्याय अत्याचार दहशतवाद, भ्रष्टाचाराविरोधात लिहितात, बोलतात. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मौल्यवान आहे. त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ३ मे या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’चे महत्त्व मोठेच आहे.
अयोद्ध्या निकालाचा मुद्दा यूनेस्कोमध्ये नेणाऱ्या 'पाक'ला खडसावले
मुंबईतील फ्लोरा फाऊंटन, अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि नेसेट एलियाहू सिनेगॉग या तीन पुरातन वास्तूंची नुकतीच 'युनेस्को'नेही दखल घेतली आहे. 'युनेस्को'चा एशिया-पॅसिफिक पुरस्कार या मुंबईतील तीन स्थळांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबईची सद्यस्थिती आणि इतरही ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या प्रमुख स्थळांचा घेतलेला हा आढावा.
मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.
महान संत व्यासतीर्थ यांचे ५०० वर्ष जुने वृदांवन समाजकंटकांनी १७ जुलै ला पूर्णतः नष्ट केले.
हिंदूंच्या तीर्थाटनामध्ये चारधाम यात्रा आणि कैलास-मानससरोवर यात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोट्यवधी हिंदूंना आयुष्यात एकदा तरी इथे जाऊन भगवंताचे दर्शन घ्यावेसे वाटते. हजारो वर्षांपासून, आपल्या पूर्वजांकडून चालत आलेला हा वारसा आपणही पुढे नेत आहोत, अशी भावनाही कित्येकांच्या मनात दाटून येते. चारधाम यात्रा वा कैलास-मानससरोवराची यात्रा केल्यानंतर पुण्य मिळते, मानसिक समाधात लाभते, अशी धारणा प्रत्येकच हिंदूच्या मनात विलसत असते. भगवंताचे निवासस्थान 'याचि देही-याचि डोळा' पाहायला मिळाल्याचा आनंदही सर्वांच्याच चेहर
अमेरिकेने ‘युनेस्को’कडे आपण पर्यवेक्षक देश म्हणून काम पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याबाबतीत एप्रिलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत या बाबतीत चर्चा ही होणार होती.
चीनमधील लाखो वर्षांपूर्वीच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतातील बुद्ध प्रतिमा ही जगातील सर्वात उंच प्रतिमा मानली जाते. बुद्धांच्या विचाराने आजवर अनेक विद्वानांनी स्वत:ला स्वत:च्या नजरकैदेत ठेवले, मात्र आता गौतम बुद्ध स्वतः नजरकैदेत राहणार आहेत.
आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन! या दिवसामागे नेमके काय आहे? भारत आणि या जागतिक दिनाचा खरच काही संबंध आहे का? मुळात हा दिवस कोणी, का व कशासाठी सुरू केला, का साजरा होऊ लागला? त्याविषयी...
महापालिकेला एक नवीनच स्वप्न पडू लागले आहे ते म्हणजे, कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले, आमची महापालिका ‘खाजगी दूत’ नेमतेय, ही नसती उठाठेव कशासाठी?
नुकताच मुंबईतील अनेक इमारतींचा ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा स्थळां‘च्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे मुंबई महानगरीला जागतिक वारसा स्थळांच्या नकाशावर मानाचे स्थान मिळाले आहे.
बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.