रोजच्या जगण्यात अनेक माणसांसोबत आपण संवाद साधतो. काही काळानंतर ती माणसं विस्मृतीतदेखील जातात. पण, काही माणसं अशी असतात, जी आपल्यामधल्या core अस्तित्वाला स्पर्शन जातात. माझ्यातल्या शुद्ध ‘असण्याला’, ‘मी’पणाच्या कोणत्याही अवरणाशिवाय ती साद घालू शकतात आणि आजच्या व्यावहारिक कोलाहल जगातसुद्धा अशी निर्भेळता सहजपणे जपणारी व्यक्ती म्हणजे जयंतराव! असामान्य असूनही सामान्य राहण्याची कला साधलेला कर्मयोगी! ‘मृत्यू हीच विश्रांती’ हे वाक्य कधीही केवळ शब्द म्हणून न सांगता, ते प्रत्यक्ष जगलेला माणूस!
Read More