(Patna High Court on PM Modi's Mother Al video by Bihar Congress) पाटणा उच्च न्यायालयाने बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाने राहुल गांधी, भारतीय निवडणूक आयोग, मेटा, गुगल, एक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
Read More
(PM Narendra Modi hits out at RJD-Congress) बिहारमध्ये काँग्रेसने नुकत्याच संपवलेल्या 'मतदार अधिकार यात्रे'दरम्यान माझ्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आले. या घटनेमुळे मी व्यथित झालो. या प्रकाराबाबत मी राजद-काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारचे लोक माझ्या आईचा अपमान केल्याबद्दल त्यांना माफ करणार नाहीत", असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले.
(PM Narendra Modi Receives The First Made In India Chip) भारताने आपली पहिली सेमीकंडक्टर चिप लाँच केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली सेमिकॉन इंडिया २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी देशातील पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप स्वीकारली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबने विकसित केलेला विक्रम ३२-बिट प्रोसेसर, चार मंजूर प्रकल्पांमधील चाचणी चिप्ससह प्रोसेसर स
(Independence Day 2025) भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सलग १२ व्यांदा ध्वजारोहण केले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. 'नवा भारत' ही यंदाची थीम असून, २०४७ पर्यंत समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे ध्येय आहे.
(PM Modi warns Pakistan over Nuclear Blackmail) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीत झालेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी "स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचे' पर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.
(PM Modi on Operation Sindoor) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'विषयी बोलताना पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे.
(PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्क
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी निमंत्रणाला नकार दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. ह्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे.
(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे म
(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत
(Dawoodi Bohra Delegation meets PM Modi) सध्या देशात वक्फ सुधारणा कायद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना या कायद्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दुसरीकडे दाऊदी बोहरा समुदायाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वक्फ दुरुस्ती कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी त्यांनीही हेही सांगितले की, ही त्यांच्या समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
(Rekha Gupta) राजधानी दिल्लीतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत.
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
(Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होत
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण, गेल्या काही दशकांत शेतकर्यांना फक्त आश्वासनांची भुलथापच मिळाली. कधी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांना फसवले गेले, तर कधी दलालांच्या जाळ्यात अडकवून शेतकर्यांना कर्जबाजारी केले गेले. मोदी सरकारने मात्र हे चित्र बदलण्याचा निर्धार केला असून, ‘ई-नाम’ या कृषी डिजिटल मंडईची निर्मिती एप्रिल २०१६ साली झाली. आता या मंडईच्या विस्तारासह दहा नवीन कृषी वस्तूंचा समावेश करून सरकारने शेतकर्यांना भेट दिली आहे.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. नुकतेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर आता ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. तिथे पोहोचताच भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे तिथे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्समधील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला संबोधित करताना, या क्षेत्रातील भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेखही मांडला. पण, केवळ भारतापुरता संकुचित विचार न करता, विश्वकल्याणासाठी ‘एआय’ची उपयोगिता, सुरक्षितता आणि जागतिक सहकार्य याबाबतही पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन उद्बोधक ठरावे.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असून, ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीची सखोल चर्चा होऊ शकते. तसेच भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर’वरही मुक्त चर्चाही या दौर्यात अपेक्षित आहे.
(Union Budget 2025) यंदाच्या अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारे खुली झाली आहेत आणि विकसित भारत हे अभियान आता सामान्य नागरिक पुढे नेतील. हा अर्थसंकल्प देशाचे सामर्थ्य कित्येक पटींनी वाढवणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विदेशात ‘न्यू ईयर’ साजरे करण्यासाठी रवाना झालेले राहुल गांधी नुकतेच मायदेशी परतले. मग कुणी तरी त्यांना दिल्लीची निवडणूक तोंडावर आहे, आपण जागे व्हायला पाहिजे बरे, असे हलवलेले दिसते. विदेश दौर्याचा सगळा शीण अद्याप गेलेला नसतानाही, मग रडतखडत राहुल गांधींनी राजकीय तोफ डागायला घेतली. निवडणुका दिल्ली विधानसभेच्या म्हटल्यावर, सत्ताधार्यांवर तुटून पडण्याचा चंगच त्यांनी बांधला. मग काय, एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी राहुल गांधी चक्क मोदी आणि केजरीवाल यांची तुलनाच करुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घोडदौड करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नाग मार्क-२ ची चाचणी यशस्वी करून दाखवली. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पोखरण येथे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
कलम ३७० रद्द केल्यानंतर, काश्मीरमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. अशातच आता सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान यावेळी काश्मीरच्या जनतेला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरचे पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. झेड-मोर बोगदा हा काश्मीरसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे लष्करी सार्म्यथ्य कैक पटीने वाढले आहे. आत्मनिर्भर भारतची योजना अंमलात आणत, भारतीय सैन्याला बलशाली करण्याचे काम आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी केले आहे. अशातच आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच १५ जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दर्शकांना भारतीय सैन्य दलातील रोबो डॉग्सची म्हणजेच ARCV-MULE यांची परे़ड बघायला मिळणार आहे.
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
(Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
(Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. श
(PM Narendra Modi) भारत आणि श्रीलंका लवकरच संरक्षण सहकार्य करार करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी केले आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या सर्वच क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे ‘द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर’. १४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची जन्मशताब्दी असून याच निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबाने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, आलिया भट्ट उपस्थित होते. या भेटीनंतर, आपल्या आजोबांचे असामान्य जीवन आणि कलेच्या समृद्ध वारशाचे स्मरण करण्यासाठी आमंत्रित अभिनेत्री करिना कपूर हिने पंतप्रधान मोदींचे
भारताच्या PRAGATI चा जगभरात डंका!
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच, कलाकारांनीही आवर्जून या सोहळ्याल
विक्रांत मेस्सी याची प्रमुख भूमिका असणारा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट आज दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळीसंसद भवनाच्या बालयोगी सभागृहात पाहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अनेक कॅबिनेट मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.