विशेष प्रतिनिधी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांबा सेक्टरमधील एका चौकीचे नाव "सिंदूर" असे ठेवण्याचा आणि १० मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावावर दोन चौक्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती बीएसएफचे पोलिस महानिरिक्षक (आयजी) शशांक आनंद यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.
Read More
(Mohammed Yunus) सध्या बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांना विरोधी पक्ष आणि लष्कराच्या वाढत्या दबावाचा सामना करावा लागत असल्याने बांगलादेश राजकीय गोंधळात आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी मोहम्मद युनूस यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी घोषणाबाजीचा सूर आळवला आहे. एका बैठकीत बोलताना बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय संकटाला त्यांनी 'भारताने रचलेले षड्यंत्र' म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीची बैठक घेतली.
"ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी अभियान नाही, तर बदलत्या भारताचे उदाहरण आहे. आपल्या सैनिकांनी दहशतवादी तळांचा अचूक नाश केला. हा त्यांच्या धैर्याचा आणि 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दि. २५ मे रोजी मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते.
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
(Suicide Car Bomb hits school bus in Pakistan) पाकिस्तानच्या नैऋत्येला असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात बुधवारी २१ मे रोजी शाळेच्या बसवर आत्मघातकी कार बॉम्बरकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल ३८ जण जखमी झाले, असे असोसिएटेड प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून भारतीय सैन्याचा अवमान करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले असून यामुळे उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड झाल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक सामान्य लोक जखमी झाले किंवा त्यांचं नुकसान झालं. याच लोकांसाठी भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारा संभाव्य हल्ला परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ८ मे रोजी रात्री, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन्स पाठवले गेले होते. त्याचा मुख्य उद्देश अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा होता. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या ड्रोन्सना आधीच वर्तवले होते. त्यामुळे नाश करणे सोपे झाले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन्सना कसे पाडले हे दाखवले आहे.
विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकार येत्या काही दिवसांत विविध देशांमध्ये बहुपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची शक्यता आहे. तथापि, या संदर्भात सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचवेळी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने या उपक्रमात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे.
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याच ट्रम्प यांनी आपण केवळ तणाव निवळण्यासाठी मदत केली, असे म्हटल्याने, भारताची कूटनीतिक शक्ती अधोरेखित होण्याबरोबरच विरोधकही तोंडावर आपटले आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील नादिर गावात १५ मे २०२५ रोजी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नादिर गावात शोधमोहीम सुरू केली.
अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भारताने लष्करी आणि राजनैतिक दोन्ही स्तरांवर अतिशय यशस्वी कामगिरी केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “भारताने फक्त शस्त्रानेच नव्हे, तर डिप्लोमसीच्या जोरावरही पाकिस्तानला पराभूत केले.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, हेच भारताच्या ताकदीचे लक्षण आहे.
ties between Pakistan Army and terrorists proven again गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आणि दहशतवाद हे वेगळे नसल्याचे वेळोवेळी समोर आलेल्या पुराव्यांतून सपशेल सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या संबोधनात पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. पण, मुद्दा हाच की, दहशतवादाच्या नावाने कंठशोष करणारा अमेरिकेसह संपूर्ण जागतिक समुदाय पाकिस्तानला याचा जाब आता तरी विचारणार का?
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेमके काय झाले, कसे झाले, किती प्रमाणात झाले याचे सप्रमाण सादरीकरण भारतीय सैन्यदलाने केल्याने पाकिस्तानची बनवाबनवी संपुष्टात आली. कालपर्यंत थापा मारत विजयाची शेखी मिरवणार्या पाकी पंतप्रधानांचा बुरखा अखेर फाटला. भारताच्या बेधडक कारवाईने पाकिस्तानलाही धडकी भरली असेल, हे नक्की!
विशेष प्रतिनिधी मंगळवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुक्रू वनक्षेत्रात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) शी संबंधित तीन दहशतवादी मारले गेले आहेत.
(Al Jazeera's fake news exposed) भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सोशल मीडियावर सातत्याने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यात भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही खोटी बातमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Pakistan LeT Terrorist Hafiz Abdul Rauf) पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारातील फोटोविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस आला आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात असलेला व्यक्ती हा लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी असल्याचा भारताने दावा केला होता. यावर पाकिस्तानकडून फोटोतील व्यक्ती हा एक साधा कुटुंबवत्सल आणि धर्मप्रचारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांच्या मृतदेहांवर फातिहा पठण करणारा दुसरा तिसरा कुण
"पाकिस्तानचे शांततेचे आणि युद्धविरामाचे वचन फसवणूकीचे आहे. पाकिस्तानच्या वचनांवर विश्वास ठेवण्याचा काळ संपलाय. जर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली, तर बलुच लिबरेशन आर्मी पूर्व आणि पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध निर्णायक कारवाई करतील. पाकिस्तानचा नायनाट झाल्याशिवाय या भागात कधीही कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.", बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने भारत-पाकिस्तान संघर्षावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सीमावर्ती भागात सुरु असलेल्या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे. भारताकडून पाकिस्तानातील एअर बेसकॅम्पवर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानने दि. १० मे रोजी आपले इतर हवाई तळ अनिश्चित काळासाठी बंद केल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याचे दिसतेय.
(Wing Commander Vyomika Singh) भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले असून त्यांनी आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली असल्याची माहिती शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हल्ले केले असून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा
Baloch Army आणि Indiaने एकत्र हल्ले केल्याने बिथरला Pakistan? काय घडलं? | Chandrashekhar Nene
८ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पठाणकोट, उधमपूर इ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या AWACS विमानासह त्यांच्या तीन लढाऊ विमानांना पाडले. या कारवाईत भारताने पाकिस्तानची लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निकामी केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
(Pakistan Firing Across LOC) पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गेले १२ दिवस सुरु ठेवलेले शस्त्रसंधी उल्लंघन बुधवारी अधिक तीव्र केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
(Rajnath Singh on Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या लष्करी कारवाईनंतर गुरुवार दि. ८ मे रोजी सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहिमेची माहिती देताना ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती दिली.
कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
(India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारांना पुन्हा एकदा भारतीय सायबर सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात अपयश आले आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकचा नापाक इरादा धुळीस मिळवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलओसी) पाकच्या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
(India Slams Pakistan Army Chief General Asim Munir) पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीर आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर भारताने मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देत चांगलेच खडेबोल सुनावले आहे. काश्मीर ही इस्लामाबादच्या गळ्याची नस असल्याचे जनरल मुनीर यांनी म्हटले होते.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
(Pakistan Train Hijack)पाकिस्तानमध्ये एक प्रवासी रेल्वे हायजॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात येथे बलुच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर हल्ला करत बीलएने जाफर एक्सप्रेस थांबवून ६ पाकिस्तानी सैनिकांची बीलएच्या सैनिकांकडून हत्या करण्यात आली आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्
पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान मौलाना फज्ल रेहमान या खासदाराने धक्कादायक विधान केले असून, त्याने बलुचिस्तानही बांगलादेशप्रमाणे स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही राजकीय वदंता नाही, तर पाकिस्तानच्या डळमळीत अस्तित्वाचे प्रतिबिंबच आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा र्हास, दुसरीकडे कट्टरतावादाचा वाढता प्रभाव आणि तिसरीकडे स्वायत्ततेच्या लढ्याने पेटलेले प्रांत, या सर्व घटकांनी पाकिस्तानचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या ४४ टक्के एवढा मोठा भूभाग. मा
Pakistan bomb blast पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये किमान ११ कामगार ठार झाले आहेत. तसेच ६ जण जखमी झाल्याचे गंभीर वृत्त समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती शुक्रवारी दिली. अधिकारी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. या प्रकरणात चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून सातत्याने सैन्याच्या आधुनिकिकरणाला गती मिळाली आहे. सैन्याचे आधुनिकीकरण हा विषय सरकारच्या केंद्रस्थानी असून, त्यासाठी विविध प्रकल्पांना सरकारकडून मान्यता दिली जात आहे. महत्वाचे म्हणजे, प्रकल्प मान्यता देऊन थांबत नसून, ते पूर्णत्वासही जात आहेत. याच आधुनिकीकरणाच्या प्रवासामधील दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, सरकारच्या कार्याची सीमा फक्त दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता ती देशभर पसरावी म्हणूनच आर्मी डे सारख्या दिवसांचे आयोजनही आता दिल्लीच न होता, प
काश्मीरमधील हिंसाचार ( Kashmir Violence ) हा पाकपुरस्कृत असल्याचा उच्चार लष्करप्रमुखांनी केला आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी घटनांनी वेळोवेळी ही बाब ठळकपणे मांडली आहे. भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ठोस उपाययोजना, तसेच काश्मीरच्या विकासासाठी राबविलेले धोरणात्मक निर्णय भारताला बळ देणारे ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घोडदौड करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नाग मार्क-२ ची चाचणी यशस्वी करून दाखवली. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पोखरण येथे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.