रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना २,०२५ रुपयात ग्राहकांना ४,३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या दरवर्षीच्या न्यू ईयर प्लानची परंपरा कायम ठेवत यंदाही जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे.
Read More
देशातील बड्या दूरसंचार कंपन्यांवर मोठी कर्जे असल्याचे समोर आले आहे. ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज देशभरातील बड्या दूरसंचार कंपन्यांवर असल्याचे केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितले. यात सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(भारत संचार निगम लिमिटेड)वर सर्वात कमी कर्ज असल्याचे दिसून आले आहे. बीएसएनएलचे कर्ज २३,२९७ कोटी रुपये इतके आहे.
देशभरात स्पॅम कॉलच्या संख्येत लक्षणीय वाढ लक्षात घेता केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ला प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करत ५० बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स(युटीएम)ना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. निर्देशांचे पालन करून अधिक कार्यक्षम टेलिकॉम परिसंस्थेत योगदान द्यावे, असे आवाहन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केले आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल सध्या कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय बनली आहे. एमटीएनएल कंपनीत टाटा उद्योगसमूह मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
केंद सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह(पीएलआय) योजने अंतर्गत दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनविक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. दरम्यान, दूरसंचार उपकरणे निर्मितीची विक्री एकूण ५० हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
एमएसएमई (सूक्ष्म,लघू,मध्यम)उद्योग व स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलंस इंडिया (TCoE)कडून या उद्योगांना पाठिंबा देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तंत्रज्ञानात आव्हाने, गरजा ओळखून या कंपन्यांना मार्गदर्शन करण्याचे टीसीओई या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) अंतर्गत येणाऱ्या विभागाने ठरवले आहे.
सरकारने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे त्याच प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. अशीच मोठी कारवाई करत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सायबर क्राईममध्ये वापरले गेलेले मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.याशिवाय कुठल्याही सायबर क्राईम अथवा यांच्याशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबरवर बंदी घालण्यास सरकारने सांगितले आहे .
इकॉनॉमिक टाईम्सने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. टेलिकॉम जायंट कंपन्यांनी आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ करायचे ठरवलेले आहे. एकत्रित डेटा,ओटीटी,कॉलिंग अशा एकत्रितपणे आकर्षक सुविधा पुरवत Postpaid योजना खरेदी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या भर देणार आहेत. अधूनमधून दरवाढ करता ऐवजी ग्राहकांना पोस्टपेड सुविधा पुरविण्यासाठी कंपन्यांचा कल आहे. कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे कंपन्यांचे नव प्रयोजन आहे.
आता सरकारच्या पुढाकाराने ' गोलमाल' नंबरचा त्रास टळणार आहे. बेनावी नंबवरून फोन अथवा विविध फसव्या जाहिराती या सगळ्यावर नियंत्रण येणार आहे. कारणही तसेच आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारच्या 'चक्षू ' या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावर टेलिकॉम ग्राहकांना अशा प्रकारे गोलमाल घोटाळेबाज नंबर अथवा जाहिरातींची तक्रार करता येणार आहे.आपला वैयक्तिक नंबर कुठल्याही संस्थेने पसरवल्यास ग्राहकांना त्या घटनेची तक्रार या पोर्टलवर नोंदवता येणार आहे.
देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित होतील. यानिमित्ताने भारतातील मोबाईल निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठेचा घेतलेला हा आढावा... देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित हो
सरकारी टेलिकॉम कंपनी ४ जी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून नंतर व्यापक स्वरूपात सेवा ग्राहकांना देणार असल्याचे बीएसएनएलने संचालक पी के पुरवर यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीचा ४ जी वरून ५ जी सेवेत परिवर्तित करण्याचा मानस आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) 'टेलिकॉम, ब्रॉडकास्टिंग आणि आयटीमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे' या विषयावर एक सल्लामसलत पत्र २२ सप्टेंबर २०२३ ला प्रसिद्ध केले होते. भागधारकांकडून अभिप्राय प्राप्त करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आणि प्रति अभिप्राय 6 नोव्हेंबर 2023 निश्चित करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. महापारेषणद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे सहाय्यक अभियंता(ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) पदांच्या एकूण ३९६ जागा भरल्या जाणार आहेत.
बुधवारी नीरज मित्तल यांची Department of Telecommunications ( DOT) च्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याचे वृत्त मिडियाने दिले आहे. नीरज मित्तल १९९२ बॅचचे ( Indian Administrative Officer) आहेत. यापूर्वी के. राजारामन हे DOT चे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. मित्तल यांच्यापुढे OTT नियमन, टेलिकॉमचे नवीन बीलचे धोरण, Satellite, व टेलिकम्युनिकेशनची नवीन धोरणे अशी नवीन आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.
राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात राईट्स लिमिटेड मार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता / सहायक प्रबंधक / प्रबंधक (सिगनल एवं टेलीकम्यूनिकेशनच्या एसएसई / जे.ई. या अधिकारी पदांसाठी ०७ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
'टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड' (टीसीआयएल) मधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आपण जर मोबाईल खरेदी करण्यासाठी मोबाईल शॉपमध्ये गेलो तर सर्वात आधी आपण मोबाईलचा कॅमेरा, डिस्प्ले स्क्रिन, बॅकअप चेक करतो. मोबाईल घेताना त्यांची 'SAR Value' चेक करत नाही. त्यामुळे तुम्ही जर कधी मोबाईल घेण्याकरिता गेलात तर सर्वात आधी 'SAR Value' एकदा चेक करून घ्या.
अनेकांच्या मोबाईलवर दि. २० जुलै रोजी एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला आहे. त्यानंतर काही वेळातच पुन्हा दुसरा मेसेज आला. त्यामुळे एकाच वेळी अनेकांच्या मोबाईलवर सारखा मेसेज आल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कोणता स्कॅम तर नाही ना? आपला मोबाईल हॅक तर झाला नाही ना? मेजेसवर क्लिक केलं तर मोबाईलचा स्फोट तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले. मात्र जर तुमच्याही मोबाईलला असा मेसेज आला असेल तर घाबरुन जाऊ नका.
जगभरात आता ६जी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भारतानेही आता कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी भारताचे ६जी व्हिजन जारी केले आहे. त्यामुळे आत स्वदेशी ६जी तंत्रज्ञानादवारे भारताचे या क्षेत्रातील स्थान महत्वाचे ठरणार आहे.
जीसॅट ३० या उपग्रहामुळे कम्युनिकेशन, इंटरनेट सेवेला होणार फायदा
ट्राय व दूरसंचार मंत्रालयाने यावर अनेक निर्बंध घालून देखील दूरसंचार कंपन्यांना कॉल ड्रॉपवर लगाम लावू शकल्या नाहीत. यामुळे दूरसंचार कंपन्यांना तब्बल ५८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जानेवारी २०१८ ते जून २०१८ या कालावधीतील हा दंड ठोठावल्याची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत दिली.