नवी दिल्ली : गुजरात दंगलप्रकरणी खोटे पुरावे तयार केल्याप्रकरणी आरोपी तीस्ता सेटलवाड हिला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीनास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भुषण गवई, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या विशेष खंडपीठाने याप्रकरणी गुजरात सरकारकडून उत्तर मागितले आहे. अंतिम निकालासाठी पुढील सुनावणी १९ जुलै होणार असल्याचे सांगितले आहे.
Read More
इकडे गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लिन चीट मिळाली आणि दुसरीकडे याच प्रकरणात चुकीच्या माहितीचा प्रचार प्रसार करणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांना अटक झाली. ही अटक नेमकी आत्ताच का झाली? ही कारवाई सुडबुद्धीने झालीयं का?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. तिस्ता सेटलवाड यांचा गुन्हा नेमका काय? जाणून घेऊयात पुढील पाच मुद्द्यांतून
देशात जातीयतावाद पसरविण्याचे मुख्यालय म्हणून काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. त्यांच्या देशभरात अनेक शाखा असून तीस्ता सेटलवाड या त्या अनेक शाखांपैकी एक आहेत,
दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करुन ते स्वतःच्या चैनीसाठी खर्च केल्याचे उघड झाल्यानेच तिस्ता सेटलवाड यांना गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. यात राजकीय सूडबुद्धीने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा कांगावा त्यांच्या समर्थकांनी आणि डाव्यांनी केला. मात्र, त्यांचा हा दावा किती पोकळ आहे हे सर्वोच्च न्यायालयातच उघड झाले. त्यामुळे सेटलवाड यांच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्या सर्व स्वयंघोषित राष्ट्रवाद्यांची कोंडी झाली आहे
कोणताही विचार न करता निर्दोष लोकांना फसवण्यात डावे-उदारमतवादी निपुण आहेत. पण, आपण दगा देऊन, फसवणूक करुनही नामानिराळे राहू, कधीही पकडले जाणार नाही अन् पकडले गेलो तरी माफ केले जाईल, अशा दिवास्वप्नात वावरणे हे डाव्या-उदारवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. तिस्ता सेटलवाड, साकेत गोखले आणि आता राणा अयुब यांच्या कृतींवरुन तेच दिसते.