मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत अनुराग कश्यप यांनी ‘फुले’ या चित्रपटाविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदीत म्हटलं, “कमाई कमी असेल तर खर्च रोखा, आणि माहिती कमी असेल तर शब्द रोखा अनुराग कश्यप, तुमचं ना ज्ञान आहे ना कमाई. ब्राह्मणांच्या परंपरेला तुम्ही एक इंचही गालबोट लावू शकत नाही.”
Read More
क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रस्तावावर काय म्हणाले आमदार हेमंत रासने?
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशक
( Resolution to confer Bharat Ratna on Mahatma Phule and Krantijyoti Savitribai maharashtra assembly ) क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
( Savitribai Phule Memorial Award Ceremony held with enthusiasm at SNDT Women University ) महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना गौरवण्यासाठी आयोजित सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या ( Savitrimai Phule ) विचारकार्यापासून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणार्या, पुण्याच्या रागिणी विजयकुमार लडकत यांच्या विचार आणि कार्याचा घेतलेला हा मागोवा...
(Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावित्रीबाई फुलेंचेच काम पुढे नेत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे तोंडभरून कौतूक केले. बुधवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्याकडे आपण वाटचाल करत आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. बुधवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, अतुल सावे, शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मधील शाहीर योगेश रंगमंच या नूतन प्रेक्षागृहात, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक अन् संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सां
सावित्रीची लेक आपल्या आयुष्यातील चढउतार पचवत, शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या वनिता उगले यांच्याविषयी...
मराठी नाट्य, चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ गाजवणारे ज्येष्ठ विनोदवीर विजय पाटकर यांचया सोबत महाएमटीबीच्या रंगल्या Unfiltered गप्पा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात आयोजित २५ हजार शिबिराच्या माध्यमातून सुमारे ४० लाख नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय या शिबिरांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.गावातील वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्टया, आर्थिक दुर्बल घटक अशा आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या भागात होणार शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. शुक्रवारी विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लोकप्रिय वेब सीरीज ‘पंचायत’चा (Panchayat 3) तिसरा सीझन लवकरच भेटीला येणार असून आता फुलेरा गावच्या सरपंचजीची बदली कोणत्या गावात झाली असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पंचायत ३’ (Panchayat 3) कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ती प्रतिक्षा संपली असून प्राईम व्हिडीओने प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.
डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर स्थित महात्मा जोतिबा फुले मंडईचा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. याठिकाणी मासळी विक्रेत्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.
समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त 'फुले' (Phule Movie) चित्रपटाचे नवीन पोस्टर भेटीला आले आहे. फुले चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा सावित्रिबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. स्त्री शिक्षणाचा पायंडा रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे आज समाजात महिलांना मुक्तपणे शिक्षण घेता येते. या चित्रपटात फुले दाम्पत्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. ‘फुले’ (Phule Movie) चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्री
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकार म्हणजे अभिनेते निळू फुले (Nilu Phule). दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या निळकंठ कृष्णाजी फुले अर्थात निळू फुले यांची आज ४ एप्रिल जयंती. निळू फुलेंनी साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या मनात इतका खोलवर रुतत होता की त्यांच्याविषयी लोकांना तिटकारा येत होता. अर्थात ही निळू फुलेंना (Nilu Phule) त्यांच्या कामाची मिळालेली पोचपावतीच होती. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांची लेक गार्गी फुले हिने एक खास पोस्ट केली आहे.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ याच भावनेने छत्रपती संभाजीनगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’चे सेवाजागृती कार्य चालते. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्रात विजय उकलगावकरांची भेट झाली आणि त्यांनी ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेच्या शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले आहे. अशातच 'सत्यशोधक' सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या तुषार प्रल्हाद काळभोर यांच्या आजवरच्या प्रयोगशील प्रवासाची ही कहाणी...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.
स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न झाला.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय') विद्यार्थी आता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौशल्य विचार शिकणार आहेत. त्यासाठी एक विशेष पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना आहे.
आपल्या ठसकेबाज अभिनयाची प्रेक्षकांसह इतर भाषिक दिग्दर्शकांवर अशी छाप सोडायची की आपल्यासाठी छोटेखानी का होईना पण ताकदीचा एक मोठ्या चित्रपटातला भाग साकारण्याची संधी समोरुन चालून आली पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी अशीच काहीशी कामगिरी केली असून थेट दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनाही उपेंद्रच्या कामाची भूरळ पडली आणि त्यांनी आग्रह करत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात उपेंद्रसाठी विशेष उल्लेखनीय भूमिका लिहिली. ‘ॲनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातला आहेच,
ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी दिली. आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शनिवारी ९ डिसेंबरला झारखंडमधील गोड्डा भागातील पाथरगामा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी कार्यक्रमातील लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित मुलींना सायकल घेण्यासाठी पैसे मिळतात का, असा सवाल केला
पुणे महापालिकेने जेथे मुलींची पहिली शाळा बांधण्यात आली होती त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचे जीर्ण बांधकाम मंगळवारी पहाटे पाडले. महत्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.
महावितरण कडून वीज बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मुलुंड पूर्व येथील साईनाथ नगर , महात्मा फुले रोड येथे राहणाऱ्या दोघा भावांवर शासकीय कामकाजात अडथला निर्माण करण्यासाठी तसेच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील भाषेचा उपयोग करून जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३, ५०९, ५०६(२) व कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोघे भाऊ सचिन मनोहर बोराडे व योगेश मनोहर बोराडे यांना नवघर मुलुंड पोलिसांनी अटक केले असून पोलीस कोठडीत ठेवले आहे. याबाबत, पुढील कारवाई करण्यात येथ आहे.
मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून यासाठी दि. २० सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा १५ ते १६ टक्के आणखीन वाढवा,’ असे शरद पवार म्हणतात. समजा, मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्याने तरतूद केली आणि जर आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढवले, तर संविधानामध्ये बदल करणारे मोदी, भाजप आणि फडणवीस कोण? ते काय संविधानापेक्षा मोठे झाले का? असे म्हणत समाजाला उकसवण्यामध्ये आणि ‘संविधान बचाव‘ म्हणत आंदोलन पेटवायला पुढे कोण असेल, हे सांगायला हवे का? पवार इतक्या तडफेने आरक्षणाबद्दल का बोलत होते, याचे उत्तर स्पष्ट आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेला चित्रपट म्हणजे ‘सत्यशोधक’. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांचे जीवन मोठ्या पडद्यावर उलगडले जाणार आहे. नुकतेच या पोस्टरचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर छगन भुजबळ यांना दाखविण्यात आला व लवकरच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. यावेळी छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांत मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार सीमा भागातील नागरिकांसाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आले आहे. या योजनेंर्तग प्रति कुटुंब किंवा प्रति वर्ष १ लाख ५० हजार रकमेचे विमा सरंक्षण आणि मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष २ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम व ९९६ उपचारांचा लाभ मिळणार आहे. . यासाठीच्या खर्चाची रक्कम विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सर्
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mpkv.ac.in/ ला भेट द्या.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ‘रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.मुख्यमंत्री स
विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ साली भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना विकसित देश झालेला असेल, त्यावेळी त्या विकसित देशामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवारनगर येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात काढणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
राज्यातील जनतेला आरोग्य सुविधेचा लाभ व्हावा याकरिता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही अधिक व्यापक करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना व अधिवास प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दरम्यान, राज्यातील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून आता ५ लाखापर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणे यात वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि आजाराचे वेळेच निदान होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी गोळे यांनी व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्याच्या निगडित असलेल्या ‘आयुष्मान भारत योजना’, ‘महात्मा फुले योजना’ व ‘मुख्यमंत्री साहाय्यक निधी’ आदी योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली.
“बाई वाड्यावर या”, हे संवाद आजही कानावर पडले तरी डोळ्यांसमोर उभे राहतात ज्येष्ठ अभिनेते आणि मराठीतील उत्तम खलनायक निळू फुले. निळू फुलेंच्या आवाजातील तो भरभक्कमपणा प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवत राहिला. निळू फुलेंनी ताकदीने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका इतक्या खऱ्या वाटायच्या की प्रेक्षक ज्यावेळी प्रत्यक्षात निळू भाऊंना भेटायचे त्यावेळी त्यांचा राग, द्वेष करायचे. परंतु हीच खरी आपल्या कामाची पावती असल्याचे निळू फुलेंनी अनेकदा म्हटले. आज निळू फुलेंचा स्मृतिदिन. १३ जुलै २००९ रोजी मराठीतला अस्सल खलनायक निघून
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जानिर्मितीसाठी मागील वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने मागील काही महिन्यात विविध सामंजस्य करारांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीसाठी मोहीम हाती घेतली असून विजेच्या तुटवड्याचा संभाव्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सुरु केले आहे. नवीकरणीय तथा पवन आणि जलविद्युत ऊर्जा निर्मितीसाठी अधिक जोर दिला जात असून 'ऊर्जादायी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फडणवीसांचे विशेष प्रयत्न सातत्याने अधोरेखित होत आहेत. बुधवारी राज्य सरकारच्या वतीने
मुंबई : मरीन ड्राईव्हजवळील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कडक कारवाई करावी त्याचबरोबर भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्याकरिता दर महिन्याला मुंबईतील महिला वसतिगृहांचे सिक्युरिटी ऑडिट करावे, अशी मागणी आ. मनिषाताई चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले आहे.
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ य
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणार्या तसेच स्वतःला पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रातील राजकारण अतिशय खालच्या स्तराला पोहोचले आहे. विचारांचा लढा विचाराने करा म्हणणारे गुद्दे लगावतात, हे तर महाराष्ट्राने अनुभवले आहेच. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ऑन कॅमेेरा केलेले निंदनीय कृत्य समर्थनीय नक्कीच नाही. दुर्दैवाने त्याचेही समर्थन होताना दिसून येते आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नेहमीप्रमाणेच राऊत यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत, तर शरद पवार हाताची घडी घालून बसले