ठाणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे २५ नोव्हेंबर..याच दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या ( Thane ) जलतरणपटूंनी २५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील मालपे ते वाघोटन सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
Read More
(TMC) तलाव आणि खाडीत आत्महत्या करणारे तसेच मान्सून काळात खाडीत बुडणे व अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून शहरातील तलाव, खाडीवर १५ तरणपटू २४ तास ल्रक्ष ठेवणार आहेत. ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्याने पोहणाऱ्यांची भरती करण्यात येणार असून बुडत्यांना आता महापालिकेचा आधार मिळणार आहे.
सलग 24 तास ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा विक्रम ठाण्यातील दोन जलतरणपटूंनी केला आहे. मानव मोरे व आयुष तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांनी केलेल्या या विक्रमाचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे.
१२ वर्षांचा असताना त्याने हात गमावले. पण, तरीही वयाच्या २८व्या वर्षी ‘सर्वोत्तम जलतरणपटू’चा सन्मानही मिळवला. अशा या धाडसी, जिद्दी सुयश जाधवची प्रेरणादायी कहाणी...
आज १४ नोव्हेंबर. हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्यामुळे बालकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा जागतिक कीर्तीचा जलतरणपटू वीरधवल खाडेचा एकूणच जीवनप्रवास...