‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे.
Read More
भारताच्या इतिहासाची, स्वातंत्र्यलढ्याची अनेक सोनेरी पाने लिहिली गेली. यातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे. सावरकर आणि डॉ. मुंजे यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करत, हिंदुत्वासाठी भरीव कामगिरी केली. त्यानिमित्ताने वि. दा. सावरकर आणि डॉ. मुंजे या हिंदुत्वाच्या विचारांच्या सहप्रवासींचे ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भव्य तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर्षी महाशिवरात्र स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी साजरी होत आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्ती यांच्या संगमाचा क्षण! शिव म्हणजे उपशम आणि शक्ती म्हणजे व्युत्थान! अशा या दोन अनादी तत्त्वांचा विवेक जे आयुष्यभर वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवनात करीत राहिले आणि आपले कार्य झाल्यावर, त्या परब्रह्माशी ऐक्य पावून जे कृतार्थ झाले, ते तीर्थरूप, शिवस्वरूप म्हणजे विनायक दामोदर सावरकर!
आज, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रणदीपने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सावरकरांच्या विचारधारेचे स्मरण केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आज लोकसभेत चर्चेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्र सरकारवर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.
Swatantryaveer Savarkar कर्नाटकात काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणार असल्याचे ट्विट महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेअर केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अहवेलना करण्याचा डाव काँग्रेसचा असल्याचे ते म्हणाले.
"हिंदुत्ववादी शब्दाला कट्टर शब्द जोडण्याची गरज नाही. हिंदू हा आपल्या हिंदुत्वाशी एकनिष्ठ असतोच. परंतु भूमातेशी एकनिष्ठ राहण्याची खरी गरज आहे.", असे प्रतिपादन स्वा. सावरकर अभ्यासक डॉ. धनश्री लेले यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि.२८ मे रोजी ब्राह्मण सभा, ठाणे तर्फे डॉ.धनश्री लेले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातल
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटात सावरकरांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचा संघर्ष भव्य पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले असून सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा देखील त्यानेच साकारली आहे. देशभरातून या चरित्रपटाला उत्तम प्रतिसाद येत असून मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची या (Swatantryaveer Savarkar) चित्रपटासाठीची पोस्ट सध्या
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दोन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात रणदीप स्वत: वीर (Swatantryaveer Savarkar) सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर या चित्रपटातील आणखी महत्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची झलक समोर आली आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांचा लूक समोर आला आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर (Swatantryaveer Savarkar) आता सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अखंड भारत’ ही विचारधारा भारतीय नागरिकांना देणारे देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून तो या चरित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहे. एखाद्या थोर व्यक्तिमत्वाचा चरित्रपट करणे म्हणजे त्या व्यक्तिची नक्कल न करता त्यांचे विचार आपल्यात सामावून घेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे ही महत्वाची बाब रणदीपच्या अंगी दिसून येते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रप
जालनामध्ये श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी या ८२ वर्षाच्या सावरकर प्रेमीने आपल्या घराची जागा 'स्वातंत्र्यवीर सावरकर भवन' उभारण्यासाठी दिल्याचे समोर आले आहे. स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणासाठी एखादी वास्तू निर्माण व्हावी या हेतूने राहत्या घराच्या जागेवर वास्तू उभारण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. भाग्यनगर येथे वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगड, लोणीचे ह.भ.प.सखाराम महाराज, वे.शा.सं.रामदास महाराज आचार्य,
प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करुन कालजयी ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील हाती घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय प्रवास देखील सुरु करत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट पाहता येणार असून २२ मार्च
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यादरम्यान त्यांनी, स्वा. सावरकर पळपुटे असून आम्ही त्यांना महापुरूष मानत नाही आणि मानणारदेखील नसल्याचे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले. खा. जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, इम्तियाज जलील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही सावरप्रेमींकडून केली जात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप करणारे एकेकाळी अधिक होते पण ही परिस्थिती आता बदललेली आहे. अशा कार्यशाळांमुळे सावरकर विरोधाला छेद देण्याचं काम घडेल, असे विधान पुण्यात आयोजित कार्यशाळेत सात्यकी सावरकर यांनी केले.तसेच अभ्यासपूर्ण वक्ते तयार करण्यासाठी आणि गावोगावी सावरकर विचार पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे ही सात्यकी सावरकर यांनी प्रतिपादन केले.
प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करून 'कालजयी' ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित 'निवडक कालजयी सावरकर' या दै. 'मुंबई तरुण भारत' प्रकाशित पुस्तकाचे दि. २३ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे प्रकाशन होणार आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'ने सावरकर जयंतीनिमित्त आजवर प्रसिद्ध केलेल्या 'कालजयी सावरकर' विशेषांकामधील निवडक लेखांचे संकलन असलेले हे पुस्तक लवकरच सावरकरप्रेमींच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मृत्यूंजय दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’, पतित पावन मंदिर संस्था, रत्नागि
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्री पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल आता श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. दम असेल तर सावरकरांचा फोटो काढून दाखवा, असे आव्हान प्रमोद मुतालिक यांनी दिले आहे.तसेच सावरकरांची प्रतिमा हटवल्यास संपुर्ण राज्यात आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हे विधान त्यांनी दि.८ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्रीपुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी यांच्या नेतृत्वात प्रियांक खर्गे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या पुतळ्याला चपला हाणुन लाथाडण्यात आले.यावेळी स्वा.सावरकरांचे योगदान काँग्रेसला लक्षात येणार नसल्याची टिका आंदोलकांनी केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपच्या वतीने दि. ८ डिसेंबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपचे सर्व कार्यकर्ते उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून काढण्याच्या वक्तव्यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
'अभिनव भारत संस्थे’चे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणजे सखाराम दादाजी गोर्हे. क्रांतिकार्याशी संबंध असल्याच्या आरोपाखाली इंग्रजांनी त्यांना गजाआड केले. त्यांच्या इतर क्रांतिकारी मित्रांची नावे त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी, त्यांचा खूप छळ झाला. पण, ते बधले नाहीत. १९१० मध्ये त्यांना पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगात चक्की पिसण्याचे काम त्यांना देण्यात आले. हे सगळे काबाडकष्ट सहन करावे लागल्याने, ते खूप आजारी झाले. त्यांना क्षयरोग झाला. साबरमतीच्या तुरुंगात दि. १२ फेब्रुवारी १९१३ या दिवशी त्
१८९७ मध्ये सावरकर पुढील शिक्षण घेण्यासाठी भगूरहून नाशिकला आले. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याभोवती जे विद्यार्थी जमा झाले होते, त्यात प्रमुख होते-विष्णू महादेव भट. साहजिकच ते क्रांतिकार्यात सहभागी झाले. जॅक्सनच्या वधानंतर नाशिकमध्ये मोठी धरपकड झाली. त्यात वि. म. भट देखील गजाआड झाले.
कृष्णाजी बळवंत महाबळ यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८८६चा. म्हणजे तात्याराव सावरकर यांचे ते समकालीन. महाबळ यांचा जन्म बडोद्याला झालेला असला तरी शिक्षण नाशिकला चालू होते. सावरकरांच्या सहवासात आलेले आणि त्यामुळे देशप्रेमाने झपाटून गेलेले जे तरूण होते, त्यात महाबळ यांचा समावेश होता.
"महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्याकरिता समर्थ असले पाहिजे आणि त्यांनी स्व:संरक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे" हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १०० वर्षा पुर्वी मांडलेले विचार आजही किती लागु होत आहे ह्याची प्रचीती आपल्याला रोज वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांमधून येईलच. सावरकरांच्या याच विचारावर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू केला आहे. महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात दि. ३० सप्टेंबर रोजी डोंबिवली शहरात झाली.
हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या दाटणीचे चित्रपट जरी येताना दिसत असले तरी प्रेक्षकांना फारसे ते पसंत पडत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रेक्षकांपर्यंत काही घटना किंवा काही व्यक्तींबद्दल सत्य गोष्टी मांडणेही तितकेच गरजेचे असल्याचा काही दिग्दर्शक आणि कलाकारांचा अट्टहास दिसून येतो. सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटामुळे तो अधिक चर्चेत असून काही दिवसांपूर्वी रणदीपचा सावरकरांच्या वेशभूषेतील लूक व्हायरल झाला होता. त्याला
मुंबई : सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांनी ७ जुलै २०२३ रोजी निकाल देताना सांगितले की, शिक्षेला स्थगिती न दिल्याने राहुल गांधींवर अन्याय होणार नाही. दरम्यान, कोर्टात सुरू असलेल्या अन्य गुन्हेगारी खटल्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, राजकारणात शुद्धता आवश्यक आहे.
विसंगतीपूर्ण जाहिराती छापून मोठेपण सिद्ध करता आले असते, तर निवडणुका लढविण्याची गरजच पडली नसती. मूळ मुद्दा निराळा आहे आणि समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.
निद्रा अर्थात झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले असल्याचं आपण जाणतो. निद्रेचा हक्क सगळ्यांनाच असतो, तसा तो बिरसालाही होता. पण, नको तो फितुरीचा जास्तीचा हक्क काहींनी मिळवत फिरंग्यांकडून पलंगही मिळवले. बिरसा कालखंडानंतर लोकमान्य टिळक तसेच सावरकरांसारख्या कालखंडात जो बदल होत गेला, त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं पुढच्यांना सोप होत गेलं असावे. आज दि. ९ जून या भगवान बिरसा मुंडांच्या स्मृतिदिनानिमित्त या लेखाचा हा दुसरा आणि शेवटचा भाग देत आहोत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या राहुल गांधी यांना भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मार्मिक टोला लगावला आहे. सुनील देवधर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले. त्याचवेळी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त उपस्थिती लावली.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या पवित्र मंदिराबद्दल आणि लोकशाहीबद्दल कोणाला विरोध असता कामा नये.मुळात एका व्यक्तिला विरोध समजू शकतो पंरतू १४० कोटी जनतेला न्याय देणाऱ्या संसद भवनावर बहिष्कार घालणाऱ्यांना कावीळ झालेल्यानं सगळं पिवळं दिसतंय , असा टोल
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सावरकरांची आज १४० वी जयंती आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून ‘वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स…’ ही वेबसिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारी ठरेल असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शौर्य, बलिदान आणि त्यांच्या अमर्याद धैर्याची कहाणी असलेली भव्य हिंदी वेबसिरीज 'वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स...'लवकरच छोट्या पडद्यावर
राष्ट्रासाठी आपल्या प्राणांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणार्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक ओजस्वी आणि बाणेदार चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रांतिवीर बाबाराव सावरकर. त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाविषयी...
प्रा. नौरे यांनी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांच्या चरित्रातील त्यांची प्रत्येक कृती ही अद्वितीय आणि असामान्य आहे. सावरकर क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्त तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक प्रगल्भ लेखक, कवी, नाटककार आणि इतिहासकारही होते. त्यांच्या नाशिकमधील वास्तव्यातील लेखनाविष्काराचा या लेखात घेतलेला हा आढावा...
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकनगरी यांचे एक दृढ नाते आहे. नाशिक नगरी हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी परिसर त्याचप्रमाणे अनेक मंदिरांनी हे शहर गजबजलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे नाशिकमध्येच खर्या अर्थाने सुरू झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करुन त्याचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ही दोन्ही व्यक्तीमत्व देशाचे आदर्श आहेत. आपल्या येणार्या पिढ्यांवर हिंदुत्वाचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
अटल ,स्वातंत्र्यवीर सावरकर, बाल शिवाजी आणि पीएम नरेंद्र मोदी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे चित्रपट निर्माते संदीप सिंह आता रश्मी शर्मासोबत म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. दि. ४ मे रोजी त्यांनी 'टिपू' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.मात्र या चित्रपटाच्या पोस्टरवरून नवा वाद सुरू झाला आहे. कारण या पोस्टरमध्ये निर्मात्यांने टीपू सुलतानच्या चेहऱ्यावर काळं फासलेलं असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटातून म्हैसूरच्या राजाचं वास्तव समोर येईल असा दावा ही पोस्टच्या माध्यमातून निर्मात्यांकडून
राष्ट्रीय विचारांची जोपासना व्हावी, या विचाराने प्रेरित होऊन २०१० साली सिंहगड रोड भागात काही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व्याखानमालेचे आयोजन केले आणि आजवर ही वाटचाल यशस्वीपणे अव्याहत चालू आहे. यातून संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ची स्थापना केली. नुसते एवढ्यावर न थांबता विविध आयामांत संस्थेचा विस्तार केला. आरोग्य शिबिरे, दवाखाना, नैपुण्य वर्ग, किशोरी दर्पण वर्ग, अभ्यासिका असे अनेक उपक्रम सुरू केले.‘कोविड’सारख्या कठीण काळात न थांबता संस्थेचे उपक्रम चालू ठ
''सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपकडून काढण्यात येत असलेल्या सावरकर गौरव यात्रेला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील बारा कोटी जनतेच्या मनात सावरकरांच्या विषयी सन्मानाची भावना असून त्यांच्या मनात सावकारांविषयी झालेल्या टिकेवरून रोष आहे. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही हे जनतेने सूचित केले असून सावरकरांच्या अपमानाची आम्ही व्याजासकट परतफेड केल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे बनू शकत नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांचा भाजपच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात येत आहे.
राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सुरू झालेला वाद आता काहीसा शमलेला असताना राज्य सरकारच्यावतीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी ‘थीम पार्क’ आणि संग्रहालय सुरु करण्यासह दि. 21 मे ते 28 मे दरम्यान राज्याचा पर्यटन विभाग आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सप्ताह’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमे’ची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.शुक्रवार, दि. 31 मार्च रोजी मंत्राल
राजकीय सोयीसाठी आम्ही आमच्या एकसंध समाजाचे किती तुकडे करणार आहोत? सत्तेच्या साठमारीत आमच्या देशाच्या महापुरुषांचे सातत्याने चरित्र हनन करताना, येणार्या पिढ्या पुढे कोणतेही आदर्श शिल्लकच राहणार नाहीत, याची जाणीव, आजच्या समाजमाध्यमांना, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या राजकीय नेत्यांना राहिलेली नाही, असेच खेदाने म्हणावे लागते.
ही गोष्ट आहे २००४ ची. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर अंदमान निकोबारला गेले. तेव्हा सेल्युलर जेलमध्ये दिव्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून ते इतके चिडले की त्यांनी लगेचच ती नेमप्लेट काढण्याची सूचना केली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याला तिथल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला, पण तरीही तिथे सावरकरांचे नाव कोरता आले नाही.त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनीही अशीच भूमिका घेतली. महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सावरकरांच्या अपमानाचा बदला घेण्यास स
मालेगावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी जाहीर सभा पार पडली. सभेची चर्चा तशी जोरदार झाली. कारण, मालेगावात मुस्लीमबहुल भागात सभेला आवताण देणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत होते. बॅनर्सही मराठी किंवा हिंदीत नाही, तर चक्क उर्दू भाषेत. त्यावर संजय राऊतांनी उर्दू भाषेचे समर्थन करत, देशात उर्दूला बंदी आहे का, असा प्रश्न केला. तसेच, अनेक लेखक, साहित्यिकांनीही उर्दूत लिखाण केल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत रमेश पतंगे यांना नुकताच भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल शुक्रवार, दि. १० मार्च रोजी आकाशवाणीवर त्यांची सविस्तर मुलाखतही प्रसारित झाली. त्या मुलाखतीच्या अनुषंगानेच रमेश पतंगे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यातूनच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी एक स्वतंत्र मुलाखत आकारास आली. पतंगे यांच्याशी साधलेल्या मुक्तसंवादाला या मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीलाही राहुल गांधींनी गरळ ओकली. याविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांचा समाचार घेतला आहे. "राहुल गांधी काय बोलतात, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यांच्या भाषणातले मुद्दे काय असतात, तेही कळत नाही. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, हे मलाही कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार," असा प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.