जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवार, १९ जून रोजी सांगितले. महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासाठी उर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
Read More
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि अवधचा काही भाग महाराष्ट्राशी जोडतील. या प्रकल्पांची माहितीती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना दिली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी २२ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर देशद्रोह आणि यूएपीए अंतर्गत खटला सुरू होता. तो सध्या महाराष्ट्रातील भुसावळ येथील शाळेत उर्दू शिकवत होते. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.
नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात मराठी नाटकांना २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने घेतला आहे. गेल्या महिन्यांत सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाट्यगृहांच्या अव्वाच्या सव्वा भाडेवाढीवरुन तक्रार केली होती. दामले यांनी मराठी नाट्यसृष्टी टिकवण्यासाठी परवडणारे दर असावे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी शासनाच्या सांस्कृतिक विभागाला त्यानुसार सूचना केल्या. त्यामुळे नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी नाटकांना
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सध्या टाटा रुग्णालयाच्या वाराणसी येथील शाखेत ‘रेडिओलॉजी’ विभागात साहाय्यक वैज्ञानिक अधिकारी ‘ग्रेड ब’ या पदावर काम करणार्या एकता अरूण गावंडे एक प्रकारे रुग्णसेवा करीत आहे. पण ‘करिअर’चा हा टप्पा गाठताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या खडतर जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
रेल्वेच्या भुसावळ विभागातील पहिल्या महिला हमाल इंदुताई एकनाथ वाघ. त्यांच्या आयुष्याची कहाणी कथन करणारा हा लेख...
आज ‘गिफ्टबड्स’कडे भेटवस्तूंचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत ४० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट गिफ्ट्स अश्विनीच्या कंपनीने पुरवल्या आहेत, तर शेकडो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. काही लाख रुपयांची उलाढाल ‘गिफ्टबड्स’ सध्या करत आहे.
तापी नदीच्या खोऱ्यात वास्तव्य. भारतातील उत्तर आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या गवती वटवट्याचे दुर्मीळ दर्शन महाराष्ट्रात घडले आहे. पक्षीतज्ज्ञांच्या मते, 'गवती वटवट्या' पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद
भुसावळ मतदार संघात पारंपारिक राजकीय नेते राखीव मतदार संघ केल्यामुळे बाजूला पडले आणि उमेदवार म्हणून नवीन चेहरे पुढे येऊ लागले. यंदा डॉ. मधु राजेश मानवतकर यांच्या माध्यमातून भुसावळकरांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळाला आहे. तेथील भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांना अपक्षांचे आव्हान उभे आहे.
भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना भुसावळमध्ये घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून हत्याकांडातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
खेड्यापाड्यातील, वेश्यावस्तीतील मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि इतरही समाजशील उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या प्रा. जयेंद्र लेकुरवाळे या मातीतील शिक्षकाविषयी...
सीएम चषकातील क्रिकेट स्पर्धेला रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरवात झाली. या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल 52 संघांनी सहभाग नोंदवला आहे. आमदार संजय सावकारे यांनी फलंदाजी करुन या स्पर्धांना सुरवात केली.
रेल्वे प्रशासनाने गत काही दिवसांपूर्वी चांदमारी चाळ, आगवाली चाळ, १५ बंगला यासह विविध भागांचे अतिक्रमण काढले. परंतु, झोपडपट्टीधारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, यासाठी शासनाने आवश्यक निधीची तरतूद करणेकामी व पाठपुरावा करण्याबाबत विचारविनिमय करण्यात यावा.
रेल्वे मंत्रालयाद्वारे क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान भुसावळ येथे 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान अखिल रेल्वे हिंदी नाट्योत्सव 2018 आयोजित करण्यात आला होता. 20 रोजी मध्य रेल्वेचे अपर महाप्रबंध विशाल अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यात मुंबई विभागाचे ‘दृष्टी’ हे नाटक प्रथम आले.
शिवसैनिकांनी शहरात अभिनव श्रमदान करत सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वात जीवघेण्या राष्ट्रीय महामार्ग सहाची खड्डे बुजवित शिवसैनिकांनी गांधीगिरी केली.
खा. रक्षाताई खडसे आणि आ. संजय सावकारे यांनी गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेकडे दुर्लक्ष केले. या भागातील विस्थापित झालेल्या नागरिकांचे होणारे हाल त्यांनी येऊन बघायला पाहिजे होते.
येथील सीमा भारंबे लिखील '' भारतीयांच्या हृदयातले सरदार'' या पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन 31 रोजी रेल्वेच्या एमओएच शेड, सरदार पटेल जयंती समितीने केले होते. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एमओएच विभागाचे वरिष्ठ डि.ई.ई. , टि.आर.एस. सतीश चव्हाण, श्रीमती चव्हाण, टि.ई.ई. निखील सिंग, ए.डि.ई.ई. मोहन चौधरी, ए.डी.ई.ई. संदिपकुमार , डॉ.विनायक महाजन, म्युनिसिपल हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे, द.शि.विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी.राणे, मध्यरेल्वे युनियनचे पदाधिकरी यांच्याहस्ते सीमा भारंबे लिखीत
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील नगरपरिषदेच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर ऐन दिवाळी सणामध्ये भारतीय मजदूर संघप्रणीत नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्याने शहरातील नागरिकांची कामे या आंदोलनामुळे खोळंबणार आहे.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात विशेष वाहतुक, पॉवर, आणि एस अॅण्ड टि ब्लॅाक 23, 24 , 25 व 26 ऑक्टोबर रोजी घेण्यात येत आहे. यामुळे रेल्वे वाहतुक प्रभावीत झाली असून काही गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या श्री बालाजी महाराजांच्या ब्रम्होत्सवाची रथोत्सवाने सांगता होणार आहे. या वहनोत्सव व रथोत्सवाला सुमारे साडे पाचशे वर्षांची मोठी परंपरा आहे. श्री बालाजींचा रथ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकांत भाविकांच्या दर्शनार्थ मुक्कामी राहणार आहे.
शहरातील भुसावळ रोडवरील साईनगर भागात सोमवारी सकाळी वीट भट्टा मालक सुनील ओंकार चौधरी (वय ५०, रा.शिवाजीनगर, वरणगाव) यांचा खून करुन मृतदेह घराच्या पाठीमागे निर्जनस्थळी आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञान व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनामागे नेमका कोणाचा हात आहे? खून कोणी आणि कशाकरीता केला? यामागचे गुढ उकळण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे
भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शनिवार ६ रोजी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आ.चौधरी यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.परंतु शिवसेनेत त्यांचे मन काही लागत नसल्याने ते सेनेत शेवटपर्यंत सक्रीय झालेच नाही शनिवाररोजी पुन्हा मुंबईत राष्ट्रवादीत स्वगृही परतल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
मध्य रेल्वच्या कसारा - उंबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायर दुरुस्ती व्हॅन रुळावरुन घसरल्याने कसारा - आसनगाव वाहतुक विस्कळीत झाली आहे. 14 रोजी या मार्गावरील 5 रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत तर 7 गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 5 गाडयांचे अंतर कमी करण्यात आले आणि 3 गाडया उशिराने धावणार आहेत.
जळगावातील टी.व्ही.टॉवरसमोर दुचाकी अचानक समोर आल्याने पोलीस व्हॅनवर आदळली. प्रसंगी पोलीस व्हॅनने दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन पटली घेवून बाजूला कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दुचाकीस्वार ठार झाले असून पोलीसही गंभीर जखमी झाले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावरील यार्डाचे पुर्नमुद्रण तसेच तिस-या रेल्वे लाईनचे कामा निमित्त 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 रेल्वे गाडया रद्द तर 8 गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधी मंडळ सचिवालय, मुंबईतील लोकलेखा समिती इंग्लड, नेदरलॅण्डसह फ्रान्स दौर्यावर 4 रोजी रात्री रवाना होत आहे. 14 सदस्यांच्या या समितीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचाही समावेश आहे. समितीतील तीनही देशातील सभागृहांची पाहणी करतील शिवाय अध्यक्षांसह सदस्यांशी चर्चा करून कामकाजाची माहिती जाणून घेणार आहेत.
येथील सर्व राजकिय पक्षांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामिण रूग्णालयाच्या तिसर्या टप्प्यातील आंतर रुग्ण विभागाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. त्यामुळे रुग्णाना याठिकाणी दाखल करता येत नसून जळगाव येथे सामान्य रुग्णालयात रवाना करावे लागत आहे. वैद्यकीय अधिक्षक देवर्षी घोषाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र पुढिल कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, आरोग्याची काळजी घेताना आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होऊन आपण घरात किंवा बाहेर तेलकट खाद्यपदार्थ खाण्यास पसंती देतो. परंतु, यामुळे आपल्या आरोग्याचा खेळखंडोबा होत असून आपले दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, आपण खात असलेले तेल हे शुद्ध आहे की अशुद्ध याबद्दल आता शंका निर्माण होत आहे.
वरणगावात वृक्षतोडीचा कहर झाला असून पक्षी जीवन धोक्यात आले आहे. वृक्षतोडीमुळे बगळे आणि पानकावळयांच्या शेकडो पिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्याने पक्षीप्रेमीकडून संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान राबविले होते. या अभियानात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. यात बडनेरा रेल्वे स्थानक 26 व्या क्रमांवर आले असून भुसावळ विभागात प्रथम तर खंडवा रेल्वे स्थानक भुसावळ विभागात शेवटच्या क्रमांकावर आले आहे.
जैन बांधवांचा चतुर्मास सुरू असून भुसावळात त्यानिमित्त लोकसभा आधारित नाट्याचे ११ रोजी सादरीकरण करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे भरधाव चारचाकीने शालेय विद्याथ्र्यांसह दुचाकीस्वारास धडक दिल्याने 7 जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
सुरत रेल्वे स्थानकातून निघालेली गाडी क्र. ५९०१३ सुरत-भुसावळ ही गाडी १७ जुलै रोजीसुध्दा भुसावळ स्थानकात न पोहचल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
सुरत स्थानकाहुन सुटलेली गाडी क्र. 59013 ही भुसावळ स्थानका पर्यंत न जाता जळगाव स्थानकावरच थांबल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पुर्व सुचना न देता ही गाडी थंाबविल्याने प्रवाशांमध्ये संताप दिसून आला.
खान्देशातुन तसेच विदर्भातुन पंढरपूरला आषाढी एकादशीला जाणाया भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती- पंढरपूर व खामगाव – पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे गाडयांचे नियोजन केले आहे.
रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ, भादली आणि जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने शनिवारी 5 तासांचा मेगाब्लॉग घेतला.या मेगाब्लॉग मुळे 7 रोजी कोल्हापूर येथुन सुटणारी गाडी क्र. 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ १० रोजी रात्री २ वाजेला गाडी क्र. १२८०९ मुंबई-हावडा मेल व्हाया नागपूर या गाडीचे तीन डबे रुळावरुन घसरले.सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. त्यामुळे या मार्गावरुन धावणार्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. सकाळी ६ वाजेला रेल्वे मार्ग सुरळीत झाला.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ येथिल शासकिय गोदामाची पाहणी गुरुवारी केली.त्यांच्या सोबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार संजय तायडे, निवडणुक तहसिलदा सुरेश थोरात आदी उपस्थित होते.
अवैधरित्या रेल्वेचे ई-तिकिट विकणार्या दोघांना रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने सुरक्षा आयुक्तअजय दुबे यांच्या र्मादर्शनाखाली अमरावती येथे छापा टाकून अटक केली आहे.त्यांच्याकडून २८ हजार ७५० रुपयांचे १३ ई-तिकिटे तसेच दोन संगणक, २ प्रिंटर्स व रोख १९ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने माहे एप्रिल ते मे या कालावधीत विनातिकिट आणि अनाधिकृत प्रवास करणार्या प्रवाशांकडून ४२ कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.
पर्यावरणदिना निमित्त ५ रोजी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेकडील बुकिंग कार्यालय येथून पर्यावरण रॅली काढण्यात आली. या रॅलीस अपर विभागीय रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरवात झाली.
पुणे विद्यापीठापासून उत्तर महाराष्ट् विद्यापीठ वेगळे झाल्यानंतर ‘ उमवि ’मध्ये सुरु झालेल्या बीएस्सी संगणक पदवी अभ्यासक्रमास आजवर अनुदान नव्हते. अनुदान मिळण्याबाबत सतत मागणी होत होती. आ.संजय सावकारे यांनी ६ वर्षे त्यासाठी पाठपुरावा केला.त्याला आता आले असून अखेर या अभ्यास क्रमालाही अनुदान मंजूर झाले
भुसावळ तालुक्यासाठी विविध सोयीसुविधांच्या अनुषंगाने डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रिव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्यासाठी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सकारात्मकता दर्शविल्याने गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या सुरु असलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विभागातील दोन स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी तेथील रेल्वे विभागाने उदयापासुन २८ पासून मेगाब्लॉक घेतल्याने२ जुन पर्यंत भुसावळ विभागातुन धावणार्या चार रेल्वे गाड्यांच्या अप-डाऊन फेर्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविणे तसेच ओबीसी जातींच्या ३२० घटकांचा समावेश करुन घेण्यासंबंधी मार्गदर्शन राष्ट्वादी कॉंग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तालुका पदाधिकार्यांना केले.
भोसरी प्रकरणात माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यावर भूखंड खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र पुणे एसीबीने त्याचा अहवाल न्यायालयामध्ये सादर केला.
काळानुरुप बदल स्वीकारले तरच स्पर्धेत टिकता येते हा विश्वाचा नियम आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने बदल स्वीकारत व्यवसायीकतेकडे पाऊल टाकले आहे.खाजगी उद्योजकांच्या प्रदर्शनीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने स्टॉल लावून तसे संकेतच दिले आहे.