महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात लवकरच लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या बस आगामी काळात नाशिक किंवा मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ५ डिझेल बसेसचे एलएनजी बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिक आणि मुंबईतील पुरवठादारांकडून कोटेशन मागवण्यात आले आहे.
Read More
(ST Corporation)‘राज्य परिवहन महामंडळा’कडून दरवर्षी दिवाळीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी ‘एसटी महामंडळा’कडून दिवाळीच्या कालावधीत दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा दिवाळीनिमित्त ‘एसटी महामंडळा’कडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने दि. ९ ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर बुधवार, दि. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली.
गर्दीच्या काळात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑनलाईन आरक्षण सुविधा सुरु केली आहे. या अदयावत आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. ही प्रणाली सुरू झाल्यापासून पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची ऑनलाईन विक्री झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील बसेसचे एलएनजीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. एलएनजीमध्ये रुपांतरित केलेली एसटी महामंडळ ही देशभरातील पहिलीच बससेवा ठरली आहे. या एलएनजीच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील पर्यावरणासह हातभार लागणार आहे. तसेच, इंधनावरील खर्चदेखील कमी होणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येऊन दरदिवशी रामललाचे दर्शन घेत आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई ते अयोध्या रेल्वे सेवा असली तरी भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना अयोध्या प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्याहून थेट अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पहिली बस धुळ्याहून अय
जागतिक तापमान वाढीचे वसुंधरेच्या पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम हा वैश्विक चिंतेचा विषय. या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी केल्या जाणार्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर. त्यामुळे भारतातही अलीकडच्या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी वाढलेली दिसते. त्यासंबंधीचा आढावा घेणारा हा लेख...
बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत असतानाच, आता ट्रीपल सीट फिरणार्यांची दुचाकी थेट पोलीस ठाण्यात जमा केली जाणार आहे. या बाबतची अंमलबजावणी आयुक्तालयाच्या विचाराधीन असून, यामुळे कारवाईचे स्वरूप अधिक कठोर करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(पीएमपीएल)ने बसेसची संख्या वाढवली आहे. आता पीएमपीएमएलने बसेसमध्ये पुणेकरांना सवलत मिळणार आहे. तसेच, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) ताफ्यात पाच हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. वाढता इंधन खर्च लक्षात घेता एस टी महामंडळाचा इलेक्ट्रिक बसेस सुरु करण्याचा हा निर्णय महत्वाचा आहे. नवीन दाखल होणाऱ्या या गाड्यांचे प्रवास दर सर्व सामान्यांना परवडणारे असणार आहे.
स्वतः सकट हजारो लोकांच्या आयुष्यात शिक्षणाचा आणि सर्वच सकारात्मक प्रगतीचा दीप प्रज्ज्वलित करणारे पुण्याचे डॉ. दशरथ भोसले यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
कोरोनापासून खबरदारी म्हणून जिल्हाअंतर्गत एसटी सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे. याचा फटका आता कर्मचाऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी झालेल्या महसुलामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याची माहिती उघड झाली आहे. अशाच एका एसटी कर्मचाऱ्याने दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
इंटकची राज्य सरकारकडे मागणी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीने महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावरून सुमारे १३०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. दि. ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हि जादा वाहतूक करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी आता एसटी महामंडळ पुढे आले आहे. कोकणवासी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देत एसटी महामंडळ भाविकांच्या सोयीसाठी आपल्या ताफ्यात नवीन ४०० शिवशाही दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते.
महाराष्ट्राच्या सन्माननीय आजी-माजी विधिमंडळ (विधान सभा/परिषद आमदार) सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकार्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत आहे.
एसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
ठाणे खोपट एसटी स्थानकातून कोकणातील गणेशोत्सवासाठी पहिली एसटी रवाना झाली आहे.