मुसळधार पावसाने ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असुन आजपासुन तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.
Read More
डोंबिवली ‘एमआयडीसी’ भागात अनियमितपणे होणार्या पाणी पुरवठ्याविरोधात आणि ‘शटडाऊन’ काळात जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा बंद ठेवल्याविरोधात नागरिकांनी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर सोमवारी धडक देत अधिकार्यांना जाब विचारला.