बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोध
Read More
“बेस्ट कर्मचार्यांची सरळ सेवा भरती, पदोन्नतीसह रखडलेल्या अन्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल,” अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी दिली. आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत नियम 97 अन्वये बेस्ट उपक्रम आणि बेस्टच्या कर्मचार्यांचे प्रश्न या अनुषंगाने अर्धा तास चर्चेची मागणी केली होती. यावेळी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघनेचे अध्यक्ष आमदार लाड यांनी बेस्ट कर्मचार्यांच्या हिताचे काही प्रश्न उपस्थित केले.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात (एसएससी) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता लवकरच अर्ज मागविण्यात येत असून दि. २४ नोव्हेंबरपासून अर्जस्वीकृतीस सुरूवात होणार आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून १० वी उत्तीर्णांना माहिती प्रसारण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीच्या माध्यमातून कर्मचारी कार चालक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.
'स्टाफ सिलेक्शन कमिशन' अंतर्गत विविध पदांसाठी केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एसएससीद्वारे 'स्टेनोग्राफर' या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदाच्या रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एसएससी अर्थात कर्मचारी निवड आयोगाच्या अंतर्गत स्टेनोग्राफर या पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरु असून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २ ऑगस्टपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसांनंतर अर्ज प्रक्रिया थांबविण्यात येणार आहे. म्हणजेच, उमेदवाराकरिता २३ ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे.
राज्य शासनाने कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता 'मिशन बिगीन' अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व सरकारी आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
कोरोनाचा उद्योगाला फटका; १४% कर्मचारी कपात
उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात