भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या समाजमाध्यमांवरील प्रोफाईल तपासणीचा ट्रम्प सरकारचा निर्णय हा अमेरिकेच्या दादागिरीची मक्तेदारीच सिद्ध करणारा म्हणावा लागेल.
Read More
(Who is Madam N )पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रावर कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात सहज प्रवेश मिळवून देणाऱ्या आणि 'आयएसआय'च्या सहाय्याने गुप्त नेटवर्क तयार करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. नोशाबा शहजाद असं तिचं नाव असून ती ‘जय्याना ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या ट्रॅव्हल एजन्सीची मालक आहे आणि पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक मानली जाते.
‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन...
Minor girl raped एका नऊ वर्षीय मुलाने अवघ्या तीन वर्षीय मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यातील कोंढवा परिसर रविवारी हादरुन गेला. पण, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य केल्याची त्या इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलाने दिलेली कबुली! यानिमित्ताने मुलांकडून होणारा सोशल मीडियाचा गैरवापर आणि कठोर निर्बंधांची आवश्यकता पुनश्च अधोरेखित झाली आहे.
Bangladesh Attack बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेनंतर दुसरी लढाई सोशल मीडियावर सुरू झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंविरोधात अमानुषपणे अत्याचार केल्याच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. कधी दुकानांची तोडफोड तर कधी घरात घुसण्याचा प्रयत्न, कट्टरपंथींनी कुणाच्या घरात मुली आहेत का याचा ठावठिकाणा शोधत असल्याच्याही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सोबत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही प्रकाशित केले आहेत. मात्र, भारतातील अल्ट न्यूजचा फाउंडर जो स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवून घेतो त्याने केलेला कारना
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर कायमच चर्चेचा भाग असतात. याशिवाय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ते सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. पण आता त्यांची सोशल मिडियावर व्यक्त होण्याची पंचायत झाली असून त्यांचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. मुळात जावेद यांनी स्वत:च त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.
गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चा
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होताच, नेटकर्यांनी समर्थन आणि नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ अगदी खरा असल्याचे सर्वांनाच वाटत असताना तो ‘मॉर्फ’ (फेरफार) करून तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
वर्तमानकाळ हा अतिशय आव्हानात्मक आणि संधी उपलब्ध करून देणारा काळ. अर्थात, आधी अशी स्थिती नव्हती, अशातला भाग नाही. पण, आज प्रत्येक गोष्ट जगजाहीर होत असल्याने, आव्हाने आणि संधी यांचा उलगडा सहज होत असतो. त्या ज्ञानाचा प्रचारदेखील तितकाच वेगाने होत असल्याने याचा सकारात्मक विचार केला, तर नव्या पिढीला जशी भुरळ पडली, तशी जुनी पिढीदेखील आपल्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यास तयार होताना दिसते, ही मोठी आश्वासक बाब आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात दहशतवादी संघटनांनीही दहशतवादाच्या विषपेरणीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेले दिसते. सोशल मीडियाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर हा त्यापैकीच एक चिंताजनक प्रकार. अलीकडच्या दहशतवादविरोधी कारवायांतून यासंबंधीचे ठोस पुरावे समोेर आले आहेत. त्यानिमित्ताने कशाप्रकारे दहशतवादी कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो आणि नेटकर्यांनी यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला हवी, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
'दादर अभिमान गीता'च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून समाज माध्यमावरुन लोकप्रियता मिळवणारी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
समाजमाध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपा सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना अजित पवार यांचा शासकीय बंगला देवगिरी बंद असल्याचे वृत्त समोर आले आहे. शासकीय देवगिरी बंगल्यात, सकाळपासून अगदीच सामसूम आहे. आलेल्या अभ्यागतानाही ११ वाजता, विधिमंडळ कार्यालयात भेटतील हे सांगून रवाना केलं जातंय. कायम खुला असलेला, अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्याचा दरवाजा बंद असल्यानं राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत वेगळे सांगणे नकोच. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या देशात दोनवेळचे जगणेही मुश्किल. या देशाशी सध्या भारताचा व्यापारही नाही आणि परराष्ट्र संबंधही फिस्कटलेले. त्यामुळे सरकारी पातळीवर संवादाचा सेतू असा हा पूर्णत: कोलमडलेलाच. पण, अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधला डिजिटल संवाद मात्र वाढलेला दिसतो. हा संवाद सरकारी पातळीवर, अधिकारी स्तरावर नाही की कुठल्या परिषदा नाहीत, हा थेट संवाद आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा...
तंत्रज्ञानाच्या वाढत्या गैरवापरास आळा घालण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘डिजीटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक, २०२२’ संसदेत सादर केले जाणार आहे. याअंतर्गत माहितीचा गैरवापर केल्यास तसे करणाऱ्यास ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन यांनी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत अशी माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे
भारत सरकारविरोधात चिनी अॅपसाठी न्यायालयात उभा राहणार नाही, असे स्पष्टपणे सांगत वकीलपत्र नाकारले
मिलिंद सोमण रा स्व संघ परिवारातले समजताच डाव्यांना पोटशूळ
‘टिक-टॉक' या मोबाईल अँपवर भारतात मजकूर नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून वारंवार टीका करण्यात आली. सोशल मीडियावर तरुण तरुणींमध्ये फेमस असणाऱ्या या अँपवरून २८ जुलैनंतरचे तब्बल ६० लाख व्हिडिओ डिलिट केल्याचे ‘टिक-टॉक इंडियाच्या सेल्स एन्ड पार्टनरशीप’ विभागाचे संचालक सचिन शर्मा यांनी सांगितले.
’इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेड’ असा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक दिग्गज व्यक्ती, राजकारणातील महत्वाचे व्यक्ती असू देत नाही तर सिनेसृष्टीतील लोक सर्वच आता ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम आदीवर उपस्थित आहे, असे असताना माजी उपपंतप्रधान हामिद अंसारी यांचे समाज माध्यमांवर वास्तव्य दिसून येत नाही. याविषयी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता "समाज माध्यमांवर येण्याची आता तरी माझी इच्छा नाही." असे वक्तव्य केले आहे.
जागतिक पातळीवर अगदी सरकारी यंत्रणेद्वारे देखील सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग केला जाताना आपण पाहतो. अशा पार्श्वभूमीवर व्यवसायासाठी त्याला किती वाव आहे हे चाचपडून बघितले पाहिजे.
इंटरनेटवर आधारित जी माध्यमे आहेत, त्यांसाठी ‘सोशल मीडिया’ किंवा ‘समाज माध्यमे’ हा शब्द वापरला जातो. फेसबुक, ट्विटर, युट्युब अशा अनेक माध्यमांचा सोशल मीडियात समावेश होतो. या माध्यमांत खरचं किती सामाजिकता आहे, की हे आभासी जग आहे, हा एक गहन प्रश्न आहे. समाज माध्यमांची ताकद लोकांना दरवेळी सत्ता हस्तगत करायची असते किंवा सत्तेच्या समीप राहायचे असते. यासाठी समाज जसजसा विकसित होत गेला, तसं तशी साधने विकसित होत गेली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.