झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांवर कर आकारणी झाली म्हणजे ती मालमत्ता अधिकृत ठरत नाही, असे स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी देण्यात आले.
Read More
आम आदमी पक्षाचे ( AAP ) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील झोपडपट्टीवासीयांवरील गत दहा वर्षांतील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित करत, अन्यथा “मी निवडणूकच लढवणार नाही,” असे विधान केले आहे. निवडणूक जवळ आली की, नवे मुद्दे काढणे, स्वतःला पीडित दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नौटंकी करणे, हे केजरीवाल यांचे नेहमीचे राजकारण झाले आहे, त्यात नावीन्य असे काहीच नाही. केजरीवाल यांना आलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुळक्यामागचे राजकीय गणित समजून घेणेही गरजेचे आहे. दिल्लीमधील झोपडपट्टी हा एक मोठा मतपेटीचा
मुंबई : एकीकडे हिंदुंची मंदिरे ते अगदी सरकारी जमिनींवर दावा करून त्या जमिनी लाटणार्या अन्यायकारी ‘वक्फ बोर्डा’बद्दल ( Waqf Board ) हिंदू समाजातून असंतोष व्यक्त होत आहे. दुसरीकडे पुनर्विकासासाठी पाडलेल्या पुण्यातील एका वस्तीच्या जागेवरच ‘वक्फ बोर्डा’ने दावा केल्याने येथील बेघर कुटुंबांनी आता ‘वक्फ बोर्ड हटाव’चा नारा दिला आहे.
मुंबईतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात भूसख्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळापूर्वी नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत असून, त्याद्वारे लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे आज पालकमंत्री लोढा यांनी लोकार्पण केले. वांद्रे पश्चिम येथील नित्यानंद नगर येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रसंगी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये आरोग्य सेवा देणार्या रुग्णालयांंमध्ये सुविधा मिळण्यासाठी तारीखवर तारीख मिळते, ती सेवा तत्काळ मिळणार नाही, असे बरेच प्रश्न, समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यावर गोगलगायीच्या गतीने काम होत राहिले. मात्र, एकाच बाबतीत काम धनुष्यबाणातून सुटलेल्या बाणासारखे सुसाट चालले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच बोलताना “दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून आता वाढत्या लोकसंख्येला सुविधा अपुर्या पडू लागल्या आहेत,” असे विधान केले खरे. पण, जेव्हा प्रश्न रेल्वेरुळांलगतच्या झोपडपट्ट्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकारनेच त्यात खोडा घातला. त्यामुळे मुंबईतील सोयीसुविधा शाप की वरदान, असा प्रश्न मुंबई पालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणार्या ज्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आज पडला, त्यांनी जरा आलिशान चारचाकी सोडून लोकलमधून प्रवा
"मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे का हे राज्य सरकारचे आहे" असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केले. "या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पळून तसेच तसेच राज्यसरकारशी चर्चा केल्यानंतरच तोडगा काढला जाईल" असेही दानवे यांनी स्पष्ट केले
उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षा क्षेत्रात( सेफ्टी झोन ) मध्ये तब्बल ४ हजार ४९४ अनधिकृत झोपड्या आहेत. त्या झोपड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चूल, गॅस इ. ज्वलनशील पदार्थांमुळे रेल्वेला धोका उत्पन्न होऊ शकतो व भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते असे रेल्वेचे म्हणणे आहे
उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा दिशेने एक मोठ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शहरात अनेक वर्षांपासून लाखो लोक हे झोपडपट्टीत राहत असून त्या झोपडपट्टी वासियांचा आवाज आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचविणार आहोत, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.
पंधरा दिवसात कंटेन्मेंट झोनमधील बहुतांश नागरिकांनी स्थलांतर केले आहे.