Siliguri corridor पश्चिम बंगाल येथे पोलिसांनी बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना अन्सार-उल-इस्लाम बांगलादेशाच्या आठ संशयित सदस्यांना अटक करण्यात आली आहे. प. बंगाल येथील गुडी आणि ईशान्येकडील सात राज्यांना जोडणाऱ्या सिलीगुडी कॉरिडोर (चिकन नेक') भागात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण करण्याचा मोठा उद्देश होता. याप्रकरणी आता पोलिसांनी दिलेल्या एकूण माहितीनुसार, संबंधित दहशतवादी संघटना भारताच्या ईशान्य भागातील संपर्क असलेले एकूण राज्य एकमेकांपासून तोडण्याची योजना आखली गेली जात होती.
Read More
(West Bengal) बांगलादेशात इस्लामिक कट्टरवाद्यांकडून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. याचदरम्यान पश्चिम बंगालमधील डॉक्टर्स बांगलादेशींच्या विरोधात उघडपणे मैदानात उतरले आहेत. सिलीगुडीतील एका डॉक्टरांनी आपल्या खासगी दवाखान्यात तिरंगा फडकवत स्पष्ट लिहिले आहे की, जर तुम्हाला त्यांच्याकडून उपचार करुन घ्यायचे असतील तर तुम्हाला तिरंग्याला सलाम करावा लागेल.
Mamta Banerjee केंद्रीय मंत्री आणि प. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर कोलकाता येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प. बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्याचवेळी पं.बंगालचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौमित्र खान म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०२६ पर्यंत सिलीगुडी असलेला पूर्वोत्तर भारत वेगळा करण्याचा ममतांचा कट असून त्या सत्तेसाठी काहीही करतील असे सौमित्र खान म्हणाले आहेत, यामुळे एकच खळबळ माजली आहे.
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा पश्चिम बंगाल दार्जिलिंग हिल्समधील पाणिघट्टा येथील रहिवासी आणि कांचनजंगा उद्धार केंद्र, सिलीगुडीच्या संस्थापक असलेल्या प्रिन्स उर्फ रंगूजी सौरिया- यांना जाहीर झाला आहे. महिला, अल्पवयीन मुली व मुले यांना लैंगिक शोषणातून मुक्त करण्याच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या या सामाजिक कार्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील २८व्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने माजी खासदार, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता डॉ. नितीश भारद्वाज यांच्या हस्ते आज
‘सित्वे’ बंदरामुळे सिक्कीम-पश्चिम बंगालमधील सिलिगुडी कॉरिडॉरवरील निर्भरता कमी झाली आहे. सिलिगुडी कॉरिडॉर ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा चिंचोळा पट्टा असून चीनबरोबर संघर्षात हा मार्ग बंद झाल्यास भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी ‘सित्वे’च्या माध्यमातून पर्यायी मार्ग मिळेल. ईशान्य भारतातून सिलिगुडी कॉरिडॉरचा वापर न करता कोलकात्यापर्यंत पोहोचता येईल.
युद्धकाळात 'सिलिगुडी कॉरिडोर' बंद पडला तर आपल्याला बांगलादेशमधून येणाऱ्या नद्यांचा आणि रस्त्यांचा वापर करता येईल. ईशान्य भारतात प्रवेश करण्यासाठी भारताकरिता अनेक मार्ग खुले होत आहेत. बांगलादेशातील नद्यांचा वापर करून आपण ईशान्य भारतात एक आर्थिक क्रांतीच करत आहोत.