प्रणिती शिंदेंचे आरोप गंभीर नाहीत तर ते मनस्तापातून झालेल्या वेदना आहेत, असे प्रत्युत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. सोमवार, १६ जून रोजी मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवार, १६ जून रोजी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी सध्
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवार, ९ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच चंद्रहार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाठविलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.
कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जीवनदान देणारा ठरला आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकीवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, ६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
महापालिका निवडणुकांसाठी पुणे महानगरात आता सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झालेली दिसते.
समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. गुरुवार, ५ जून रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते.
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा. असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला.
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ' दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता '' धोरण अवलंबिले
ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा हक्क
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे. तसेच नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, दि. २३ मे रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात जनतेच्या तक्रार निवारणासाठी 'जनता दरबाराचे'तसेच विश्वेश्वरैया अभियंता वास्तु विशारद कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प बाधित सदनिका धारकांना चाव्या, वारस पत्र, पती पत्रीच्या संयुक्त नावाची नोंद असलेल्या परिशिष्ट दोनच्या प्रमाणित प्रती जनतेला वितरित करण्यात आल्या.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी भारतातील खासदारांची विशेष टीम परदेशात जाणार आहे. यासाठी विविध पक्षांच्या खासदारांची एक टीम गठित करण्यात आली असून ते जगासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काही खासदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवार, १४ मे रोजी शिवसेनेच्या वतीने ठाणे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली.
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
(Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena) मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उबाठाला 'जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे आणि तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून, त्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत आहे. याबाबत पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि उद्योग विभागांनी दखल घ्यावी आणि यासंदर्भातील संशोधन संस्थांच्या मदतीने विषयतज्ज्ञांचा समावेश असलेली अभ्यास समिती सात दिवसांच्या आत स्थापन करुन एक महिन्यात अहवाल द्यावा, जेणेकरुन हे प्रदूषण रोखता येईल, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवार, दि
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उबाठा गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
डोंबिवली“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी आणि या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबीयांकडून ऐकताना अंगावर शहारे आले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह
घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे’
सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये म्हणजेच प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न तिप्पट म्हणजेच जवळपास १२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे.
मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिले. विधानसभा निवडणुकीत कोकणवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तानची मस्ती उतरवली जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधीली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
BJP mandal adhyksha in dombivali भाजपने एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात मंडल अध्यक्षांची निवड केली. पक्षाने केलेल्या नवीन रचनेनुसार आता मंडलाची संख्या वाढली आहे. ‘100 बूथसाठी एक मंडल, एक अध्यक्ष,’ अशी निवड केली आहे. भाजपचे ध्येय ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हे आहे. नवीन रचनेनुसार भाजपचे बूथ आणखीन मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला होणार आहे. एकूणच भाजपमधील हे परिवर्तन पाहता महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवार, १५ एप्रिल रोजी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना मुंबईकरांची आठवण येते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी मुंबईतील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार मंच’
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज बनली असून आधुनिकतेच्या युगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर डिजिटल शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PMMY) १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. १० वर्षे स्वावलंबनाची आणि १० वर्षे आत्मनिर्भरतेची अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.