Sevak Foundation

मंदिरांकडे पाठ,दर्ग्यांवर चादर! काँग्रेसचे दुटप्पीधोरण जगजाहीर

राम मंदिरच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या लोकांना बोल लावणाऱ्या काँग्रेसचे 'सेक्युलर' धोरण उघडे पडले आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, मजारींवर माथा टेकवण्यात धन्यता मानू लागले आहे की काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. प्रियांका गांधी यांचा वायनाड पोटनिवडणूकीत विजय झाल्यानंतर, त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा यांनी हाजी अली दर्गयावर माथा टेकवला. त्याच वेळेस मशिदींमध्ये सध्या सुरू असलेले सर्वेक्षण कसे अयोग्य आहे यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले.

Read More

“अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला”, ‘रामायणा’तील लक्ष्मणाची नाराजी

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या न

Read More

'राममंदिर' केवळ दगडांतून तयार झालेले मंदिर नव्हे! : साध्वी ऋतंभरा

"अयोध्येतील श्रीराम मंदिराचे शिखर रामसेवकांची तपस्या आहे, तिथला कलश रामसेवकांचे श्रम आहे, तिथल्या भिंती आपल्या धर्माचा अभिमान आहे, तिथला मंडप आपली तितिक्षा आहे तर मंदिरातील गर्भगृह म्हणजे ५०० वर्ष पाहिलेली प्रतिक्षा आहे. ते मंदिर केवळ दगडाचे मंदिर नसून कारसेवकांच्या बलिदानातून तयार झालेले मंदिर आहे."; असे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी केले. गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथे सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवात त्या बोलत होत्या. दरम्यान बुधवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी झालेल

Read More

"हे राजकारण नाही, पण...", राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रजनीकांत यांचं मोठं विधान

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी थाटामाटात संपन्न झाला. ५०० वर्षांचा वनवास संपवून अखेर रामललला आपल्या जन्मभूमीत स्थिरावले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले होते. दरम्याव, राम मंदिरांच्या या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईला परतल्यानंतर माध्यमांना महत्वपुर्ण प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला खूप चांगलं दर्शन मिळालं. राम मंदिर प्राणप्रत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121