राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबईत सोमवार सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच मुंबईतील लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली असून रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे.
Read More
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आता पाण्याचा वापर वाढणार हे ओघानेच आले, मात्र दरवर्षी कुठे ना कुठे पाणीटंचाईच्या सावटात अनेकांना दिवस काढण्याची वेळ येतेच, हेदेखील एक ज्वलंत वास्तव. आपल्या राज्यात मुबलक पाऊस होऊनदेखील उन्हाळ्यात पाणीटंचाई का निर्माण होते, या प्रश्नाच्या उत्तरात ‘मुजोर नोकरशाही’ हे एक कारण अधोरेखित होते. परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीच्या कार्यक्रमात याच नोकरशहांवर बोलताना “आपल्या राज्यातील नोकरशहा, ते अन्य राज्यांच्या नोकरशहांपेक्षा चांगले आहेत, असा समज करून बसले आह
चेन्नई : बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले ‘फेंगल’ चक्रीवादळाचे ( Fengal Cyclone ) पुद्दुचेरीसह तामिळनाडूत रौद्र रूप धारण केले. पुद्दुचेरीत रविवार, दि. १ डिसेंबर रोजी गेल्या तीन दशकांतील विक्रमी पावसाची नोंद झाली. तसेच, शेजारच्या तामिळनाडूमधील विल्लुपुरमलाही अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले असून चेन्नईत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी ‘फेंगल’ चक्रीवादळ कुड्डालोरच्या उत्तरेस अंदाजे ३० किलोमीटर आणि विल्लुपुरमच्या पूर्वेला ४० किलोमीटर अंतरावर सहा तासांसाठी स
ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.
ठाण्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यात सरासरीच्या 123.2 टक्के पाऊस झाला असून पेरण्यादेखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण मंगळवार, दि. 23 जुलै रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात दि. 22 जुलैपर्यंत 545 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास 422 मिमी म्हणजेच सरासरीच्या 95.4 टक्के पाऊस झाला होता.
सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातल्या बऱ्याच भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसात विमानसेवादेखील विस्कळीत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले असून या ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. मात्र रेल्वे रुळावर उशीराने धावत होती. सायंकाळी देखील दोन्ही मार्गावरील वरील रेल्वे उशीराने धावत होती. त्याचा परिणाम कर्जत ते ठाणे, कसारा ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पाहता प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र
भारताने ऑस्ट्रेलियाच्या कृषी उत्पादनांना आयात शुल्कात सवलत दिल्यास, तो भारताला अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करेल, असा एक प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नुकताच भारताला दिला. तसेच साठवणूक करण्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञानही भारताला देण्याचे आश्वासनही ऑस्ट्रेलियाने दिले. कृषीहित विचारात घेऊन, त्यावर निर्णय झाल्यास दोन्ही देशांना त्याचा नक्कीच लाभ होईल.
यावर्षी पावसाने दांडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक तलाव तसेच धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तुलसी तलावा पाठोपाठ भातसा तलाव देखील भरले आहे. तसेच तानसा ९४.२७ टक्के तर विहार ९६.७५ टक्के भरल्याने लवकरच मुंबईकरांच्या डोक्यवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट निघून जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण ५५ टक्क्यांहुन अधिक पाणीसाठा आता असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. तसेच, नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे.बुधवारी सकाळपासुनच सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वृक्षांची पडझड होऊन वाहनांची वाताहत उडाली. शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने गुरुवारी शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
निसर्गात घडणार्या घडामोडींची पूर्वसूचना प्राणी-पक्ष्यांना मानवाच्या आधी मिळते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगातील तंत्रज्ञान जिथे अचूक माहिती देऊ शकत नाही, अशा ठिकाणीदेखील पशू-पक्ष्यांनी दिलेले संकेत तंतोतंत खरे ठरतात. पाऊस येणार असल्याचा संदेश घेऊन येणारा ‘पावशा’ पर्यावरण बदलामुळे रुसला की काय, असे सद्यःस्थितीवरून निदर्शनास येते. ‘पावशा’या पक्ष्याचे आणि पावसाचे घनिष्ट नाते. ’पाऊस आला’, ’पाऊस आला’ किंवा ’पेरते व्हा’, ’पेरते व्हा’ अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची वार्ता हा पक्षी देत असतो.
पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढावी, त्यांना विनासायास भक्ष्य मिळत राहावे, यासाठी चांदोली अभयारण्यात वाघांचे भक्ष्य चितळ प्रजनन केंद्र सुरु करण्याचा वनविभागाने घेतलेला निर्णय स्तुत्यच! चांदोली अभयारण्यातील झोळंबी परिसरात चितळ प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन नर आणि मादी चितळांच्या जोड्या सागरेश्वर अभयारण्यातून सोडण्यात आल्या. सध्या याठिकाणी ३२ चितळ आहेत. आता ते ३६ झाले आहेत.
येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान संस्थेने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २६ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खाते यांनी वेळे आधी येणाऱ्या मान्सूनचा अंदाज जवळजवळ रायगडात तरी फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे.
‘माय बीएमसी पॉटहोल ६८’ अॅपवर दीडशेहून अधिक तक्रारी दाखल!
केंद्र सरकारचे पथक आजपासून नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये पाहणी करणार
मुंबईत पावसाचा जोर कमी असून शहरात आता एकच अंकी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस कमी झाला आहे आणि पुढील २ ते ३ दिवसांतही अशीच परिस्थिती दिसून येईल.
येत्या २४ तासात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र - गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगसाठी गेलेले ३५ विद्यार्थी बेपत्ता झाले होते. हे विद्यार्थी आयआयटीचे असून ते सुरक्षित असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनालीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेथील परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराच्या वाहत्या पाण्यात चक्क एक बस आणि ट्रक वाहून गेले आहेत.
राज्यात सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास ७४८.९ मि.मी. म्हणजेच ७८.३ टक्के पाऊस झाला होता.
येत्या २४ तासांमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून तिन्ही राज्यांना सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याने दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे.
यंदाच्या मौसमामध्ये राज्यात पावसाने अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे आणि नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत.
शहरातील रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा या मंदावल्या आहेत.
राज्यात विविध भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या ४८ तासांमध्ये मुंबईसह पालघर, रायगड, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच येत्या दोन दिवसांमध्ये देशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याने वर्तवले आहे.
दरम्यान पावसामुळे अधिवेशन स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे विरोधकांकडून पुन्हा सरकारला यासाठी धारेवर धरले जात आहे.
गेल्या २४ तासांमध्ये संपूर्ण भारतामध्ये मेघालयातील चेरापुंजीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली असून आता नेहमीप्रमाणे मुंबई यावर्षी देखील तुंबापुरी झाली आहे.
दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, गार वारे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राकडे वेगाने वाहत आहेत. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत जळगावला वादळी वार्यांसह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वेधशाळेचा आहे, अशी माहिती भारतीय वेधशाळेचे शास्त्रज्ज्ञ एस. जी. कांबळे यांनी ‘तरूण भारत’ला दिली.