नागपूरच्या अधिवेशनाकडे अनेकजण सहल म्हणून पाहतात. यंदाचे वर्ष त्याला अपवाद. पत्रकारांपासून सरकारी अधिकारी आणि चोपदारांपासून शिपायांपर्यंत सगळ्यांसाठीच गेले आठ दिवस धावपळीचे ठरले. 33 वर्षांनंतर नागपुरात झालेला मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, दुसर्या दिवसापासून न थांबता सुरू झालेले सभागृहाचे काम, खातेवाटपाचे गुर्हाळ आणि बीड-परभणीसारख्या घटनांचे पडसाद, अशा अनेक घटनांमुळे हिवाळी अधिवेशन गाजले. 237 हून अधिक आमदारांची फौज पाठिशी असलेल्या बलशाली सत्ताधार्यांसमोर विरोधकांनी अक्षरशः शरणागती पत्कारली. विधिमंडळ सभागृहात
Read More
नवी दिल्ली : दि. २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २०२४, शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले. या अधिवेशनात २६ दिवसांत लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या.
(Maharashtra Assembly) गेल्या सहा दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. दि. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
(CM Devendra Fadnavis) मुंबईत अवैधरित्या रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार (डी-पोर्ट) करणार, ही सरकारची भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी दिली.
(CM Devendra Fadnavis) "आमचे हे सरकार 'कंटिन्यूएशन' सरकार आहे. ज्या योजना सूरू केल्या, त्या पूर्णत्वास नेणारच. पलिकडच्या बाजूला असताना जे बोलत होतो, ते सर्व प्रत्यक्षात आणणार. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार. अडीच वर्षं तुमचे सरकार होते, २०-२० खेळावी लागेल, याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही जोरदार बॅटींग केली आणि विश्वचषकच जिंकला", असा टोला फडणवीस यांनी विरोधी पक्षांना लगावला.
नागपूर : तब्बल ६० वर्षे देशात आणि राज्यात सत्ता उपभोगणार्या काँग्रेसचा यंदाच्या विधानसभा ( Vidhansabha ) निवडणुकीत मतदारांनी सुपडा साफ केला. तरीही सत्तापदे उपभोगण्याची त्यांची मनीषा कमी होताना दिसत नाही. विधानसभेच्या गटनेतेपदावरून या पक्षात प्रचंड धुसफूस सुरू असून, हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातही काँग्रेस गटनेत्याची खुर्ची रिकामीच राहणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत असताना राज्यपालांचा अवमान केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत मंत्री अतुल सावे यांनी मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी विधानभवन येथील दालनात चर्चा केली. यावेळी भोई समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशीही मागणी करण्यात आली.
(Ustad Zakir Hussain) उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्याची क्षती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमवार, १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाडा : हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची खा. डॉ. हेमंत सवरा यांनी भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ ( Jal Jivan ) योजनेला पुरेसा निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील उर्वरित अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात यावा. यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी २ डिसेंबर रोजी संसद भवनच्या परिसराकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्यांतर्गत लाभ आणि नुकसानभरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनात सरकार काही प्रलंबित विधेयके मंजूर करण्याची तयारी करत आहे, तर काही नवीन विधेयकेही अजेंड्यावर आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session ) पूर्वसंध्येस २४ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
एकही बेकायदेशीर काम केलं असेल तर मी कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देतो, असे म्हणत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर मंत्री लोढांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
भाजप आमदार अमित साटम यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ड्रग्ज, गांजा, एमडी, ललित पाटील, दिशा सालियान हे सगळे मुद्दे उपस्थित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत वर्धा जिल्ह्यातील लव्ह जिहाद प्रकरणाला वाचा फोडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसून मुलीच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर कारवाई करण्याची मागणीही राज्य सरकारकडे केली.
यशोमतीताई आपण मंत्री असताना आपण काय केलं? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी केला काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांना केला आहे. बुधवारी सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या वेतवाढीबद्दल बोलत असताना गिरीष महाजन आणि यशोमती ठाकुर यांच्यात खडाजंगी झाली.
आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र आपण अंधारातच ठेवलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य कराताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
बुधवारी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना चांगलेच घेरले. जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नांच्या मुद्यावर ते बोलत होते.
महायुती सरकारच्या काळात ड्रग्स प्रकरणी २४ हजारांहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. बुधवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
गेल्या १४ दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच खासदार अमोल कोल्हे यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. निनावी पत्राच्या आधारे त्यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेतल्याबद्दल त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
मंगळवारी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. प्रणिती शिंदेंनी सभागृहात अश्वजित गायकवाड यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर नितेश राणे चांगलेच संतापले आणि हा मुद्दा रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली.
पॉस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारने विशेष सरकारी वकिलाची लवकर नेमणूक करणे आवश्यक आहे. न्याय प्रक्रियेमध्ये विशेष सरकारी वकिलामार्फत आपण हस्तक्षेप करायला हवा असे निर्देश विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. मंगळवारी विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या.
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, १८ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यासह, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मी माझ्या पुढच्या पिढीसाठी ते सोडून देतो, असे विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ६० वर्षात जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री करु शकले नाहीत, ते काम २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलं, असेही ते म्हणाले. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते सभागृहात बोलत होते.
केंद्र सरकारच्या कायद्याच्या धर्तीवर सुधारणा करणारे लोकायुक्त विधेयक शुक्रवारी विधानपरिषदेत एकमताने मंजुर करण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी आता लोकायुक्त कायद्यांतर्गत आणल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात १० हजार नवीन घरकूल उभे राहणार, अशी घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
भाजप आ. नितेश राणे यांनी अधिवेशनात केलेल्या गौप्यस्फोटावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आ. भरत गोगावले यांनी अखेर मौन सोडले आहे. ते म्हणाले, सदर व्हिडिओ क्लिपमध्ये जे दिसत आहे ती वस्तुस्थिती असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जर हयात असते तर त्यांच्या XXXवर लाथ मारुन बाहेर काढले असते, असे आ. गोगावले यावेळी म्हणाले. तसेच, उबाठा गटाच्या नेत्यांनादेखील ते आता कळले असून त्यांनीदेखील निर्णय घ्यावा, असा टोलाही भरत गोगावले यांनी यावेळी लगावला.
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्च्यानंतर झालेल्या हिंसाचाराची विशेष पोलीस पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. यासाठी दोन दिवसांत विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून गुरुवारी विधानपरिषदेत धर्मांतरीत आदिवासींच्या प्रश्नावर चर्चा पार पडली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुळ आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ऑनलाईन गेमिंग ॲपवर चर्चा पार पडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली. यावेळी ऑनलाईन गेमिंग प्रकरणी स्वतंत्र कायदा तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून घातलेल्या गोंधळाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळातही उमटले. महाराष्ट्र विधिमंडळात गॅलरी पास बंद करण्यात आले असून, आमदारांना केवळ दोनच पास वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापना कपडे, सौंदर्य प्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे फार मोठे आक्रमण आहे. त्यामुळे मांस-मटण वगळता महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
रोहित पवार यांची ‘युवा संघर्ष यात्रा’ नुकतीच समाप्त झाली. या यात्रेत रोहित पवार यांनी ‘संघर्ष’ तर केला; पण त्याची व्याप्ती मात्र जगावेगळी होती. कधी ते पावसात भिजले, शेतकर्यांच्या बांधावर गेले, तर कधी धरणात उडी मारून पोहण्याचा आनंद लुटताना दिसले.
विधान परिषदेचे उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहीली. महाराष्ट्र विधान सभेचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे. त्यावेळी १२ डिसेंबरला विधान परिषदेच्या सकाळच्या सत्रात ते बोलत होते.
जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मंगळवारी विधानभवनावर लाखों कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीचा मोर्चा घेऊन गेले. आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी ४० जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते कोणत्याही विचाराचे असोत, पण हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहीला पाहिजे. त्यासाठी कठोर कार्यवाही करावी, अशी आक्रमक मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. व्यापारी आणि निवासी तसेच औद्योगिक अस्थापना सर्वाधिक आहेत. मात्र, आगीची दुर्घटना घडल्यास जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी शहरात बर्न हॉस्पिटल उभारावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवार गटाला दणका दिला आहे. सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना आमदार अपात्रता यांचिकांवर मॅरेथॉन सुनावणी सुरू असताना, यातील अपात्र ठरणाऱ्या आमदारांना पुढील कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी राहणार नाही, असे सूतोवाच विधिमंडळातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना नागपूर येथे केले.
विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी अभिनेते प्रसाद खांडेकर यांचा मुद्दा चांगलाच गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. त्याच्या सिनेमाला चित्रपटगृह मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
माजी मंत्री नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित झाले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्याने विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.
धारावीच्या टेंडरवरून ठाकरे गट अदानींच्या घरावर मोर्चा काढणार आहे. पण या टेंडरमध्ये जे काही बदल झाले, ते सगळे उद्धव ठाकरे सरकारने केले आहेत. त्यामुळे त्यांचा मोर्चा निरर्थक आहे. याउलट आम्ही धारावीच्या टेंडरप्रक्रियेत पारदर्शक आणली. टीडीआरचा सेल बुकवर व करता, तो ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करता येईल, असा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याऐवजी यातून शिकवण घ्यावी, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनाच्या आधी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षांनी तीन राज्यांमध्ये त्यांच्या झालेल्या पराभवाचा राग हिवाळी अधिवेशनावर काढू नये. त्यांनी आत्मपरिक्षण करून आता तरी नकारात्मक राजकारण सोडावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना दिला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ०४ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे २१ विधेयके मांडली जाणार आहे. त्याचप्रमाणे पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारण्याच्या आरोपी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीचाही फैसला होणार असल्याने हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात कर्नाटकशी सुरू असलेल्या सीमाप्रश्नाचा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर आता कर्नाटकच्या मंत्र्यांचा तीळपापड झाला, आहे. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळात याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई केंद्रशासित करा, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी केले. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत २० टक्के कन्नडीग असल्याचा जावईशोध कर्नाटकच्या मंत्र्यांनी लावला असून याच मुद्द्यावर त्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागण