Trinamool Congress leader Hakeem पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका संपण्याची चिन्हे नाहीत. आधी बंगालमध्ये बाबरीसारखी मशीद उभारु, असे वक्तव्य तृणमूलच्या आमदाराने केल्यानंतर, आता कोलकाताच्या महापौरांनी अल्लाच्या कृपेने भविष्यात आपण बहुसंख्याक होईल, अशा आशयाचे विधान केले. पण, यावर लांगूलचालनातून मतपेढीचे राजकारण करणार्या ममतादीदींनी सोयीस्कर मौन धारण केले आहे.
Read More
Hindu Shaurya Diwas महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलिसांनी शनिवारी ७ डिसेंबर २०२४ रोजी मीझान शेख, आयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू शौर्य दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राम जन्मभूमी आयोध्या येथे उभा असलेला बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे हिंदू शौर्य दिनानिमित्त इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करण्यात आली होती. त्यावेळी काही कट्टरपंथींनी संबंधित युवकावर हल्ला केला आहे.
बाबरीचे गाडलेले भूत जीवंत करण्याचा नसता खटाटोप कट्टरतावाद्यांकडून सुरु होतो. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी रामनामाच्या आसमंत दुमदुमून टाकणार्या जयघोषांत रामभक्तांनी बाबरी ढाँचा जमीनदोस्त केला. अधर्माचे आणि अन्यायाचे प्रतीक असलेल्या बाबरी ढाँचाला गाडून आता तब्बल ३२ वर्षे उलटली. याच वर्षी अयोध्येत जानेवारी महिन्यात श्रीरामजन्मभूमी स्थळी भव्यदिव्य राममंदिरही उभे राहिले आणि रामजन्मभूमी मुक्तीचा ५०० वर्षांहून अधिकचा लढाही सुफळसंपूर्ण झाला. पण, असे सगळे शुभमंगल घडल्यानंतरही कट्टतावाद्यांच्या मनातील बाबरीचे भूत काही के
Babri Masjid तृणमूल आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे नवीन बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली. कबीर म्हणाले की, मशीद बांधण्याचे काम हे ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होईल. त्यासाठी दोन एकर जागेवर ट्रस्ट स्थापन केला जाईल, ज्यात मदरशांचे अध्यक्ष आणि सचिव असतील, असा दावा हुमायूनने केला आहे. मशिदीसाठी उभारण्यात येणाऱ्या निधीची कसलीही कमतरता भासणार नाही, स्वत : एक कोटी रूपये देणार असल्याचेही कबीर म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लखीमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. सपा नेते राम गोपाल यादव यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, "ते राम मंदिराला निरुपयोगी म्हणतात. तुमच्याकडून थोडीही चूक झाली तर ते बाबरीच्या नावाने राम मंदिराला टाळे ठोकतील. शाह म्हणाले की, जेव्हा उत्तर प्रदेशात सपाचे सरकार होते. गुंडगिरी चालली होती. जमिनींवर अतिक्रमण झाले. होळी आणि दिवाळीच्या दिवशी वीज नव्हती आणि रमजानच्या काळात २४ तास वीज होती."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबरी मशीदीची एक वीट भेट म्हणून मिळाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी त्यांना ही अनोखी भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी राम मंदिराचीही विटही संग्रही ठेवायची असल्याचे म्हटले आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज ठाकरेंना बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. यावेळी ते भाविक झाले आणि ही प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची ओळख ही वाचाळवीर म्हणूनच कायम आहे. आता हा वारसा त्यांची कन्य सुरन्या चालवत आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सुरन्या अय्यर हिने उपवास केला. पण हा उपवास रामललासाठी नव्हता तर बाबराच्या पिलावळींसाठी होता.
अयोध्येत दि. २२ जानेवारी २०२४ सोमवारी रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. जगभरात या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, त्याचवेळी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात बाबरी ढाच्याच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तणाव वाढला आहे.
"आमच्या नेत्याने म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारण यांची सांगड घालू नका. आम्ही कोणत्याही मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, पण त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास आमचा पाठिंबा नाही. जिथे एक मशीद पाडण्यात आली." असे वादग्रस्त विधान स्टॅलिनपुत्र आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
या लेखाच्या कालच्या पहिल्या भागात मांडलेली बाबरीच्या पतनापूर्वी आणि पश्चात हिंदू मंदिरांसह मालमत्तांच्या नरसंहाराची दाहक आकडेवारी सर्वस्वी मन विषण्ण करणारी अशीच. आजच्या दुसर्या भागात बाबरी पतनानंतर हिंदूंवर झालेले जीवघेणे हल्ले आणि या एकूणच घटनाक्रमात इस्लामी ताकदींनी माध्यमांचा नॅरेटिव्ह सेटिंगसाठी केलेला यथायोग्य वापर, याचा केलेला हा पदार्फाश...
डिसेंबर १९९२च्या बाबरी ध्वस्तीकरणाच्या अगोदर व नंतर भारतासह पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंना नृशंस अत्याचाराला सामोरे जावे लागले. हजारोंच्या संख्येने मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदू बांधवांची घरे, दुकाने अशा मालमत्तांनाही धर्मांधांनी लक्ष्य केले. तेव्हा, दि. २२ जानेवारीच्या अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदूंवरील या अनन्वित अत्याचारांचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरावे.
कोठारी बंधूंच्या बलिदानाने देशभरातील हिंदू पेटुन उठले. त्यांच्या हौतात्म्य १९९० च्या दशकात मोठ्या संख्येने तरुणांना मंदिर चळवळीशी जोडण्यात एक प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरले होते. याच कोठारी बंधुंनी दोन दिवस आधी विवादीत ढाचावर चढुन भगवा फडकवला होता. कोण होते हे कोठारी बंधू आणि काय आहे त्यांच्या बलिदानाची गोष्ट हे सांगणारा हा लेख
"काँग्रेस नेत्यांचे बाबरीवरील प्रेम कमी होत नाही हे दुर्दैवी आहे. ते स्वतः रामभक्त नसून परकीय आक्रमक बाबरचे भक्त असल्याचे वेळोवेळी सांगतात. अयोध्येतील संत अशा लोकांना कोणत्याही मंदिरात जाऊ देणार नाहीत." असा इशारा हनुमानगडीचे महंत राजुदास यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
हरियाणाच्या मेवातमध्ये दि. ३१ जुलै रोजी शोभा यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ११६ हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांची रिमांडवर चौकशी करण्यात येणार आहे. या परिसरात जलद कृती दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी हिंसाचाराच्या वेळी मुस्लिम जमावाने केलेल्या क्रूरतेबद्दल सांगितले. तसेच, समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये अल्ला हू अकबर, नारा-ए-तकबीरचा नारा देत गर्दी रस्त्यावर फिरताना दिसली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं बाबरी मशिदीच्या संदर्भात असलेले नाव पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. "बाबरी पाडणारे आमचे शिवसैनिक होते." यावर बोलत असतांना बाळासाहेब ठाकरे बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते असेही म्हणत हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आता यावर डॉ. मिंधे बोलणार का? असा ही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता, असा दावा उध्दव ठाकरे वारंवार करत आहेत. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी, "बाबरी ढाचा पाडत असताना उध्दव ठाकरेंच नेमक योगदान काय? ढाचा पाडताना उध्दव ठाकरे कोणत्या बिळात लपुन बसले होते? असा सवाल केला आहे.
बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते.अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वीकारणारे बाळासाहेब मुळात बाबरीच्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचे समर्थन करणारे नव्हते.२००४ मध्ये बीबीसी रेडिओच्या हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते की, वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराऐवजी मंगल पांडे यांच्या नावाने राष्ट्रीय स्मारक बांधले पाहिजे जेणेकरून लोक तिथे येतील आणि त्यांनाही कळेल. इंग्रजांवर हल्ला करणार
मुंबई : ''हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कार्य, त्यांनी हिंदुत्व आणि बाबरी मशीद प्रकरणात दिलेले योगदान यासाठी आम्ही कायमच बाळासाहेबांचा आदर करत आलेलो आहोत आणि करत राहू. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठल्याही नेत्याने काय करावे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर ठाकरेंनी बोलू नये. चंद्रकांत दादांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करून उद्धव ठाकरे राजकारण करत असून केवळ इतरांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत धन्यता मानत आहेत.
अयोध्येत एकीकडे राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली आहे. बाबरी ढाँचा-रामजन्मभूमी निकालात सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन दिली होती, ज्यावर ’इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे मशीद, हॉस्पिटल, संशोधन संस्था, कम्युनिटी किचन आणि लायब्ररी बांधकाम करण्यात येणार आहे. जमिनीचा वापर बदलल्यामुळे विकास प्राधिकरणाकडे हा प्रश्न प्रलंबित होता.
अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या माहितीवरून एनआयएच्या पथकाने बिहारमधील मोतिहारी येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लिम कट्टरतावादी संघटनेच्या कट्टरतावाद्याचाही समावेश आहे.
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. अयोध्या हे त्याचे पहिले पाऊल होते.
अयोध्या राम मंदिराच्या निर्णयाबद्दल एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींचं हे भाषण ऐका.... हे महाशय म्हणतायत, एक मशिद तुम्ही आमच्यापासून हिसकावून घेतली तर दुसरी हिसकावू देणार नाही. लांगूलचालनाची आणि विशिष्ट समाजाच्या ध्रुवीकरणाची हद्द ओवेसींनी केव्हाच सोडली आहे. मात्र, ही नवी गरळ ओवेसींनी सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी ढाँच्याच्या निमित्ताने ओकली आहे
"काल कौरवांची सभा झाली आज पांडवांची सभा होतेय" अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला वादळी प्रत्युत्तर दिले
"सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत; त्यांना ना कधी संघर्ष करावा लागलाय, ना कधी त्यांनी संघर्ष पाहिलाय.", असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. बुधवारी (दि. ४ मे) नागपूर येथे एका कार्यक्रमाला जाण्यापूर्वी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी बाबरी ढाँचा पाडल्याच्या गमजा मारणे सोडून घरातच बसून राहावे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीला गेलेल्यांना त्याहून निराळे काही करता येणार नाही. कारण, या दोन्ही पक्षांनी नख्या काढून दात, पाडून शिवसेनेला शोभेचा वाघ केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या डरकाळीने तेच सांगितले अन् नकली वाघ धाराशायी झाले.
बाबरी मशीद पाडली असा दावा करणाऱ्या शिवसेनेचा खोटेपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला असतानाच, भाजप आमदार नितेश राणे यांनी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा संजय राऊत यांनी कशी त्यावर टीका केली होती हे लोकसत्ताच्या लोकप्रभा अंकातील राऊत यांचा लेख दाखवून संजय राऊत यांचे पितळ उघडे पाडले
"बाबरीवर चढलेले मराठी लोक हे रामभक्त होते, शिवसैनिक नाहीत आणि हेच अडवाणींनी सांगितले होते" असे सांगत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेला दावा खोडून काढला आहे
माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे सोमवारी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
मुंबईत आयोजित एका जाहीर सभेत, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीदला शहीद म्हणून पुकारले. १९९२ मध्ये तिच्या विध्वंसासाठी जबाबदार असलेल्या लोकांचे संरक्षण केल्याबद्दल सपा, बसपा आणि काँग्रेसवर टीका केली.ओवेसी यांनी मुस्लीम समुदयाला आवाहन केले की तुम्ही लग्न करा आणीन शक्य असेल तितके आपत्य जन्माला घाला. ओवेसी म्हणाले, “माझी मशीद (बाबरी) शहीद झाली. त्यावेळेस सपा, बसपा किंवा काँग्रेसमधील कोणी काही बोलले का? माझी मशीद ढासळत असताना त्यांनी डोळेझाक केली.
७ आणि ८ डिसेंबर १९९२ रोजी पाकिस्तानात एकाच वेळी ३० मंदिरांवर हल्ले झाले नाहीत, तर मुस्लिम जमावाने ही मंदिरे अंशतः किंवा पूर्णतः उद्ध्वस्त केले.
ओवेसी आणि रिझवी हे दोघेही मुस्लीम समाजाचेच. पण, दोघांची विचार करण्याची पद्धती किती एकदम टोकाची! मुघल शासनकर्त्यांनी केलेल्या अन्याय, अत्याचाराची जाणीव रिझवी यांना झाल्यानेच त्यांनी मुस्लीम समाजाचे लांगुलचालन करणारा ‘१९९१ चा कायदा’ रद्द करण्याची मागणी केली आहे.
अयोद्धेत राम मंदिर निर्माणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिथेच आता वादग्रस्त ढाचा पाडण्या प्रकरणी निकाल बुधवारी लागणार आहे. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी वादग्रस्त ढांचा पाडला. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४८ जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींच्या पुढील कारवाईवर आज निकाल येऊ शकतो.
न्यायालयाचे निकाल वाचन सुरू बाबरी वादग्रस्त ढाँचा प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयापूर्वी साध्वी ऋतंभरा यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे. आम्ही कुठलेही अपराधाचे षड्यंत्र रचले नाही आम्ही मंत्र रचतो,
अयोध्येतील बाबरीच्या वादग्रस्त ढाँचा प्रकरणी आज ऐतिहासिक निर्णय आला आहे. न्यायालयाने यातून सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे षडयंत्र नसल्याचा किंवा पूर्वनियोजित कट नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. विध्वंस प्रकरणात साक्षीदार ठोस नाहीत, असा लखनऊ विशेष न्यायलयाने निकाल दिला आहे.त्यामुळे या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलेल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे
बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. देशभरातून भाजप नेत्यांच्या यात प्रतिक्रीया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सत्याचा विजय झाल्याचे मत व्यक्त केले आहे. "बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. सत्याचा आणि जनभावनेचा विजय आहे. राम जन्मभूमीवरचं शेवटचं वादळही आज शांत झालं. सर्वधर्मीय आदराने हा निकाल स्वीकारतील. तसेच कार्यकर्तें ही विनम्र आणि शांतपणे या निकालाचे स्वागत करतील.", असे प्रवीण दरेकर म्हणाले.
राम मंदिराकडे जाण्यापूर्वी दर्शन घेतल्या जाणाऱ्या हनुमान गढीवर बुधवारी राम भक्तांचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान दर्शनासाठी पहाटेपासूनच दररोज इथे भक्तांची रीघ लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचेही पालन केले जात आहे. मात्र, आज बाबरी खटल्याचा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर मंदिरात एकच जल्लोष सुरू झाला.
प्रभू राम चंद्रांच्या चरणाशी दयेचा सागर आहे. त्यांना शरण येणाऱ्याचा प्रत्येक अपराध पायाखाली घेतला जातो, अशा आशयाच्या ओळी तुलसी रचित आहेत. आज बाबरी वादग्रस्त ढाँचा प्रकरणात ऐतिहासिक निकाल आल्यानंतर असेच काहीसे दिसते. बाबरी वादग्रस्त ढाँचा पाडल्यानंतर २६५ दिवसांच्या नंतर प्रकरण सीबीआयकडे गेले.
श्रीरामजन्मभूमीमुक्ती रथयात्रेमुळे स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांच्या मुस्लीम लांगुलचालनामुळे कित्येक वर्षे दाबलेल्या हिंदू मनाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली, हे निश्चित आणि 6 डिसेंबर, 1992 रोजी जे झाले ती हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आज त्या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने हिंदू समाजाच्या त्या उत्स्फूर्ततेवरच शिक्कामोर्तब झाले.
बाबरी ढाँचा जमीनदोस्त झाल्याच्या घटनेला आजवर कायद्याच्या एकाच दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे. रामजन्मभूमीवरील जैसे-थे परिस्थिती कायम ठेवावी, असे न्यायालयाचे निर्देश असूनही ढाँचा पडला हा संपूर्ण घटनेचा एक पैलू. परंतु, तो गुन्हा ठरतो का? या प्रश्नाच्या कायदेशीर चिकित्सेला आजही वाव आहे.
मुघलांच्या वंशजाने मात्र, राम मंदिर बांधण्यासाठी एक किलो सोन्याची विट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुघलांच्या वंशजाने राम मंदिराचे वास्तव मान्य केले, पण ओवेसीची तडफड काही थांबत नाही. ‘मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नहीं बतायेंगे’ म्हणणारे लोकही आज सैरभैर झाले आहेत. कारण, आज मंदिर पण तिथेच होणार आहे आणि तारीखही जाहीर आहे.
हिंदू, हिंदुत्वाला लाथाडायचे आणि गठ्ठा मतांसाठी मुस्लिमांना जवळ करायचे धोरण शरद पवारांनी नेहमीच अवलंबले. 'अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट तर मशिदीसाठी का नाही,' या विधानातूनही शरद पवारांनी तेच केले आणि 'बारामती ते बाबरमती' असे आपले प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाल्याचे दाखवून दिले.
बाबरी मशीद कृती समितीने मोडकळीस आलेल्या बाबरी मशिदीचे अवशेष कृती समितीला सोपवण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यामधील वादग्रस्त बाबरीच्या ढाच्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
हा निर्णय आमच्याबाजूने समाधानकारक नाही, असे मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फच्या वकिलांनी म्हटले आहे.
न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्स अथॉरिटीने (एनबीएसए) टीव्ही वृत्तवाहिन्यांमधील अयोध्या प्रकरणाची चर्चा पाहता 'खबरदारी' घेण्याचा सल्ला दिला आहे.
'सुन्नी वक्फ बोर्डा'ने हिंदू-मुस्लीम बंधुभावाप्रीत्यर्थ अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील आपला दावा सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त बुधवारपासूनच माध्यमांनी दाखवण्यास सुरुवात केली. प्रथम आपण 'सुन्नी वक्फ बोर्डा'च्या निर्णयाचे स्वागत करायला हवे, पण 'सुन्नी वक्फ बोर्डा'ने नेमके हे पाऊल आताच का उचलले?
२३ दिवसांत सर्वोच्च न्यायालय देणार ऐतिहासिक निर्णय
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेवरील मालकी हक्काच्या वादावर मागील सलग ३७ दिवसांपासून सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. सोमवापासून या सुनावणीचा निर्णायक टप्पा सुरू होणार आहे. दरम्यान, अयोद्ध्या आणि परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
राम मंदिर बनणार का ?