राज्यात सध्या दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच प्रस्तावच नसल्याने विरोधाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.
Read More
संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून ठाकरे बंधू एकत्र येण्यास त्यांचा सर्वात मोठा विरोध आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचा विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता.
(World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला.
सार्वजनिक स्वच्छता, त्याविषयीची जनजागृती याविषयी व्यापक मोहिमा राबवून पर्यावरणाच्या शाश्वततेचे व्रत घेतलेल्या पुण्यातील सत्या नटराजन यांच्याविषयी...
मुंबईतील एका माजी मंत्र्याची आणि त्याच्या वडिलांची अवस्था सध्या ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशीच झालेली दिसते. मुंबई पालिकेत एक लाख कोटींची लूट करून ती पचवल्याच्या आनंदात असताना, एका प्रकरणाने त्यांच्या आनंदावर विरजण घातली. मिठी नदी स्वच्छता घोटाळा! तब्बल १ हजार, २०० कोटींच्या या घोटाळ्यात या पिता-पुत्राचा उघड सहभाग आजवर कुठेच सापडत नव्हता. ना कोणत्या कागदावर सही, ना मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली शिफारसपत्रे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्ष आपल्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या
मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवार, दि. २८ मे रोजी केला. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, त्याची आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य यांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.
'अर्जुन रेड्डी' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभाससोबतच्या 'स्पिरिट' या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक तीव्र आणि अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत, एका अभिनेत्रीच्या 'डर्टी पीआर' (खराब प्रसिद्धी मोहिमेवर) जोरदार टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांनंतर ही प्रतिक्रिया आल्याने लक्ष वेधले आहे.
मुंबई पालिका निवडणुकीत ‘मनसे’सोबत युती करण्यासाठी ‘उबाठा’ गट गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना, मनसेने मात्र त्यांना केराची टोपली दाखवली आहे. “याआधी दोनवेळा फसलो, आता तिसऱ्यांदा फसणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
"सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला तर राष्ट्र टिकेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपली दुसरी परीक्षा आहे. त्यासाठी जोमाने तयारीला लागा, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे रणशिंग फुंकले. शुक्रवार, २३ मे रोजी सांगली येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यातआला होता. यावेळी ते बोलत होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)तर्फे कायदेशीर तरतुदींनुसार मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) कायदा, २००२च्या अध्याय ७मधील 'भाडे निर्धारण' अंतर्गत असलेल्या कलम ३३ आणि ३४ (१) अंतर्गत भाडे निर्धारण समिती (एफएफसी) स्थापन करण्यासाठी राज्य सरकाराला प्रस्ताव देण्यात आला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन २ए आणि ७ या मार्गिकांशी हे पाऊल संबंधित आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच हा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठविण्यात येईल.
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्थानिक राजकारण आणू नका, अशा शब्दात शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारले आहे. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत कोणत्या कारणासाठी तुरुंगात गेले हे त्यांनी एकदा त्यांच्या सामनाच्या रोखठोक या सदरात लिहावे, असे आवाहन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. रविवार, १८ मे रोजी जालना येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
" भाषेच्या विकासासाठी, आपल्याला प्रथम भाषाविचाराला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. भाषेचा विकास कसा होतो, त्याच्या विचारविश्वाची व्याप्ती काय हे समजून घेणे गरजेचे आहे " असे मत भाषा अभ्यासक तथा बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या " मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती" या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष मधुकर वर्तक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे उपस्थित होते.
संजय राऊत हे पाकिस्तानसारखेच आहेत, गुन्हे करायचे आणि व्हिक्टीम कार्ड खेळायचं, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच या पुस्तकावरून राजकारण तापले आहे.
संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे नाव बदलून 'नरकातला राऊत' असे ठेवायला हवे, असा खोचक सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. लवकरच संजय राऊतांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्याआधीच यावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे.
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या दाव्याला मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख करत त्यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक म्हणजे पिक्चरची स्क्रिप्ट असल्याच्या प्रकार आहे, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. लवकरच संजय राऊतांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मात्र, त्याआधीच यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
ज्यांनी मदत केली त्यांनी बोलले तर त्याला आगळेवेगळे महत्व आहे. पण तुम्ही ही दलाली कशाला करता? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना केला आहे. संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकामुळे सध्या राजकारण तापले आहे. यावरूनच आता शिरसाटांनी राऊतांना हा सवाल केला.
गटारातील अर्क अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांचे नाव न घेता केली आहे. संजय राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता चित्रा वाघ यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर टीका केली.
बाल वाङमय वाचण्याचं माझं वय नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावर लगावला आहे. शुक्रवार, १६ मे रोजी त्यांनी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांनी अर्धवट पुस्तक लिहिले असावे. पूर्ण पुस्तक काढले तर उद्धव ठाकरेच राऊतांना नरकात पोहोचवण्याचे काम करतील, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावरून त्यांनी निशाणा साधला.
Sanjay raut comments on bjp's tricolour rally जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानला ‘सळो की पळो’ करून सोडले. ‘भारत को कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे,’ हे यानिमित्ताने आपण संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले. भारतीय सैन्यदलांनी आपल्या दुर्दम्य ताकदीचाही परिचय करून दिला. त्यामुळे भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्या शूर जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी काल भाजपकडून देशभरात तिरंगा रॅली काढण्य
राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर स्तुसीसुमनेही उधळली. बुधवारस १४ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारकडून कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी देण्यात आली असून यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होणार आहे. मंगळवार, १३ मे रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Lord Gautam Buddha Principles Sanatana Dharma and Islamic Invasion तथागत बुद्धांच्या विचारांची मोहिनी संपूर्ण जगावर आहे. अनेक देश तर त्यांच्या विचारांमुळेच आज प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. मात्र, याच बुद्धविचारांनाही इस्लामी आक्रमणाच्या जाचातून जावे लागले. त्यामुळे तथागत बुद्धांच्या विचारांचे महत्त्व आणि त्यांची आजच्या काळात असलेली गरज यांचा बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतलेला आढावा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
वक्फ सुधारणा कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी होणार नाही असे सोमवार,दि. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढवण्याचा दिशेने सर्वोच्च न्यायालयाने, सोमवार दि. ५ मे रोजी न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली
“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील नोटकांडाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्थापन केलेल्या अंतर्गत समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या संघरूपी महासागरात खारीचा वाटा म्हणता येईल, असे संघसमर्पित गृहस्थी कार्यकर्ते म्हणून सहभाग असलेले नाशिकच्या देवळाली कॅम्प (भगूर नगर) येथील, हसानंद ओचीराम निहलानी यांचे वयाच्या 76व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण तथा शब्दसुमनांजली अर्पण करणारा हा लेख...
आमच्या सरकारमध्ये कोण काय करते हे डोकावून पाहण्याची सवय संजय राऊतांनी सोडून द्यावी, असा खोचक सल्ला मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना दिला आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विक्रोळी परिसरात विक्रोळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डवर दि. १ जानेवारी हीच जन्मतारीख नमूद करण्यात आली असून पत्ता साहेबगंज, झारखंडचा दर्शवण्यात आला आहे. विक्रोळी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी मार्केटमध्ये रविवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी, त्यांना डझनभर संशयित फेरीवाले आढळले. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
डोंबिवली“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी आणि या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबीयांकडून ऐकताना अंगावर शहारे आले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह
घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे’
म्हाडाचे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे 'म्हाडा'शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे 'म्हाडा' पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
दहशतवाद्यांना मदत करणारे हात भारतातमध्ये आहेत. तेच भारत क्रिकेट हरल्यावर किंवा पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके वाजवत असतात. मात्र, आता हे पाकिस्तानप्रेम चालणार नाही. पहलगाममध्ये भारतीयांना हिंदू असल्याने ठार मारले. दहशतवादी आपल्या दारात आहेत, तेव्हा घरात घुसतील, याचा नेम नाही. त्यामुळे एकसंघ राहा. पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणार्यांना थारा देऊ नका,” असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक लोकांनी जम्मू काश्मीरची तिकीटे रद्द केली आहेत. अशावेळी मनसेने दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली.
मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना घराच्या बदल्यात थेट घर मिळणार आहे. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता त्यांचे थेट पुनर्वसन करण्यात येणार आहे.
काँग्रेसमध्ये चापलूसीचे राजकारण आहे. जो चापलूसी करेल तोच मोठा होतो, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मंगळवारी काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
स्वामी नरेंद्राचार्य संस्थान वसई येथे ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले
गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला आहे
Jallianwala Bagh हत्याकांडाच्या विरोधात British सरकारशी दोन हात करणाऱ्या C. Sankaran Nair यांची खरी Story!
( MHADA CEO Sanjeev Jaiswal ) “मुंबईत जमिनीची उपलब्धता कायमस्वरूपी आव्हान आहे. म्हाडाला रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास सक्षम बनवणार्या कलम ९१ अ मध्ये अलिकडेच सुधारणा करण्यात आली. सेस बिल्डिंग पुनर्विकासात दीर्घकाळ अडथळा असलेल्या जमीन मालकांना भरपाई देण्याचे काम आता कलम७९ अ अंतर्गत न्याय्य तरतुदींसह केले जात आहे. पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन इमारती बांधण्याबद्दल नाही तर व्यवहार्यता, पारदर्शकता आणि वेळेवर वितरण करणे ही यात अध्याहृत आहे. यातील भाडेकरूंचे हक्क आणि प्रकल्प व्यवहार्यता दोन्ही सुरक्षित करण्यासाठी