जेष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना यंदाचा 'बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवार, ५ जून रोजी त्यांना पत्र लिहित त्यांचे अभिनंदन केले आहे.
Read More
भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( Mahakumbhabhishek ceremony at Astik Samaj Temple Matunga ) आस्तिक समाज, माटुंगा, मुंबई - १०२ वर्षांहून अधिक परंपरा आणि भक्तीने समृद्ध असलेल्या माटुंगा येथील आस्तिक समाज मंदिरात भगवान श्रीराम आणि भगवान श्रीहनुमान यांचा महाकुंभाभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दर १२ वर्षांनी एकदाच केला जाणारा हा पवित्र विधी मंदिरातील दैवी ऊर्जा आणि देवतांची शक्ती पुनर्जीवित करतो. यावर्षी हा सोहळा आमच्या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा साकारणार आहे.
पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
समाजवादी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते वाटेल ते आरोप करून समाजात संभ्रम कसा निर्माण होईल, असा कायमच प्रयत्न करीत असतात. असाच एक बिनबुडाचा दावा समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजीलाल सुमन यांनी नुकताच केला. मेवाडचे महाराणा संग्रामसिंह म्हणजेच राणा संग हे ‘देशद्रोही’ असल्याचा दावा या महाशयांनी केला आहे. गेल्या दि. २२ मार्च रोजी राज्यसभेत बोलताना खासदार सुमन यांनी हा दावा केला. “राणा संग यांनी इब्राहिम लोदी याचा पराभव करण्यासाठी बाबरास भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते,” असा दावा या समाजवादी पक्षाच्या खासद
sexually abused उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील भीमपूरा पोलीस ठाणे क्षेत्रात इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप सपा नेत्यावर आहे. सपा नेत्याचे नाव हे जनार्दन यादव असून ही घटना रविवारी रात्री घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित आरोपी सपा नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित युवती ही गाजीपुरातील करीमुद्दीनपुरमध्ये वास्तव्यास होती. बासमती सरजू उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या दहावी बोर्ड परिक्षेचे केंद्र हे खरऊपुर होते.
(Pradeep Majhi's Inter-caste Marriage Controversy) ओडिशातील नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी (Pradeep Majhi) यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्या भातरा समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी बहिष्कृत केले आहे. प्रदीप माझी यांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी गोव्यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील सुश्री संगीता साहू या ब्राह्मण समाजातील महिलेशी लग्न केले. यानंतर अखिल भारतीय आदिवासी भात्र समाजाच्या केंद्रीय समितीने धामनागुडा येथे बैठक घेऊन प्रदीप आणि त्याच्या क
बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन आपल्या पुतण्याला, आकाश आनंदला पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकतेच पदमुक्त केले. राजकारणाला घराणेशाही जशी नवीन नाही, तसेच राजकीय पक्षांनाही गृहकलहाचा तर पिढीजात शाप!त्याचीच प्रचिती मायावतींच्या या टोकाच्या निर्णयातून जगजाहीर झाली.
Holi Festival उत्तर प्रदेशात संभलमध्ये असणाऱ्या स्थानिक मुस्लिमांना एक दिवस म्हणजेच हिंदूंच्या होळी सणादिवशी बाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यावरून आता सपा नेत्याने उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेत आल्यानंतर सीओ चौधरीला तुरूंगात टाकणार असल्याचा दावा गुरूवारी ६ मार्च २०२५ रोजी केला आहे. १४ मार्च रोजी जुम्मा अदा करू नये असे आवाहन करण्यात आले आणि होळीदिवशी बाहेर न पडण्याचे पोलीस प्रशासनाने सांगितल्याने सपा नेते राम गोपाल यादव यांना मिरची लागल्याचे दिसून आले आहे.
(MLA Abu Asim Azmi Suspended from the Maharashtra Assembly) “औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता”, असा फुत्कार काढत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानालाच आव्हान देणाऱ्या सपा आमदार अबू आझमी यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील लखनऊ पोलिसांनी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समाजमाध्यमाचे प्रभारी मनीष जगन अग्रवाल आहेत. त्यांना शांतता भंग होण्याच्या भितीने लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
‘अखंड भारत व्यासपीठ’ हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे या वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाचा अध्यक्ष म्हणून येणार्या कालावधीमध्ये आयोजित उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
Ram Janaki temple उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून (Ram Janaki temple) ३० कोटी रुपयांच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. चोरी झालेली मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी आता यश आले आहे. समाजवादी पक्षाच्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
Samajwadi Party उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गेल्या एका महिन्यात संभलमध्ये १४०० वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण १६ मशिदींचा समावेश असून आणि दोन मदरशांचा समावेश आहे. वीजचोरांकडून महावितरण विभागाने ११ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
बहुचर्चित ‘अखिल महाराष्ट्र भाट समाजा’चे दोन दिवसीय दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आणि वधु-वर परिचय मेळावा श्री क्षेत्र शेगाव, बुलढाणा येथे नुकतेच अतिशय थाटामाटात संपन्न झाले. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील ज्ञातीबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धर्माचा वारसा जगणार्या आणि जपणार्या भाट समाजाच्या या अधिवेशनाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
Indi alliance विशेष प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजधानीत दररोज राजकीय नाट्य घडत आहे. निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे.
Chicken उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये ९ जणांना पनीर असे सांगून चिकन खाऊ घातल्याची धक्कादायक घडली. जेवण करत असताना त्याला जेवणाची चव व्यवस्थित न लागल्याने त्याला जेवणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. अन्न चावत असताना पनीरच्या नावाने चिकन दिल्याचे उघडकीस आले आहे. रेस्टॉरंट हे सपा नेत्याच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
मुंबई : ‘मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशन’चे संचालक तथा अखिल भारतीय दैवज्ञ समाज युवाप्रमुख विशाल कडणे, ‘ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त शिरीष देवरुखकर, सिद्धेश कारेकर यांनी राज्याच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री माधुरी मिसाळ ( Madhuri misal ) यांची पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, राजेश सातघरे, स्वप्नील चोणकर, चिन्मय पितळे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. भेटीदरम्यान, नगरविकास, सामाजिक न्याय विभागासंबंधी विषयांवर चर्चा झाली.
नागपूर : विधानसभेत 'भाईचाऱ्या'वर भाषण देणाऱ्या आमदार अबू आझमी यांना मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी खडेबोल सुनावले. फतवे काढणाऱ्यांना वेळेत भाईचाऱ्याचे 'लेक्चर' दिले असते, तर अशी भाषणे देण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत मंत्री राणे यांनी आझमींची कानउघडणी केली.
Samajwadi Party संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावेळी बुर्के यांच्या कुटुंबीयांनी संबंदित पथकाला वीज मीटर तपासणीपासून विरोध केला. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी एफआरआय लागू करण्यात आलेल्याचे वृत्त आहे. मोठ्या संख्येने पोलीस रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पीएसी कर्मचारीही या पथकासोबत उपस्थित होती असे वृत्त आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला विरोध दर्शवत, सदर विधेयकाचा निषेध केला आहे. त्याच बरोबर काँग्रेस, त्रुणामूल काँग्रेस, समाजवादी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी एक देश एक विधेयक लोकसभेत सादर केले. सदर विधेयक संसदेसमोर आणल्या नंतर त्यावरील घटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे.
मुंबई : “देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन ( Jain ) समाजाने सातत्यपूर्ण योगदान दिलेले आहे. यापुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल,” असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलनावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
मुंबई : ‘उधारीची पोते, सव्वा हात रिते’ असे म्हणतात, महाविकास आघाडीत सध्या तशीच स्थिती आहे. सत्तेच्या हव्यासापोटी विचारधारा त्यागून एकत्र आलेल्या या आघाडीत मोठी फूट पडली आहे. उबाठाच्या ( UBT ) सेक्युलर हिंदुत्वाला कंटाळून मविआत न राहण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे. विधानसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत राहून भविष्यात हाती धुपाटणेच मिळणार, हे ध्यानात आल्यामुळे त्या त्या पक्षातील काठावरचे आमदारही अस्वस्थ असून ते लवकरच वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर संशय घेत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजस्थाच्या अजमेर शहा दर्गाच्या जागी मंदिर असल्यची याचिाक दाखल केल्यानंतर, आता समाजवादी पक्षाला चांगलीच पोटशूळ झाल्याचे दिसून आले आहे. सपाचे नेते राम गोपाल यादव यांनी म्हटले की " देशातल्या छोट्या छोट्या न्यायाधिशांना हा देश जाळायचा आहे." असे धक्कादायक विधान यादव यांनी केले आहे.
प्रचंड संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे, समाजाच्या विकासासाठी सदैव झटणारेे शैलेंद्र क्षीरसागर याच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
मुंबई : ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ संचलित ‘श्रीशिवशंभू विचार मंच’ यांच्यावतीने शिवभक्त संमेलन परमपूज्य रामगिरी महाराज यांचे ’शिवरायांच्या ( Shree Shivaji Maharaj) आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज : काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वैद्य सभागृह, राजा शिवाजी शाळा संकुल, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित केले आहे. या व्याख्यानासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण प्रांत संयोजक अभय जगताप आणि महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात य
मुंबई : ( Manoj Jarange ) जरांगे केवळ आता मराठा समाजाचा चेहरा होऊ पाहत नाही. मराठा समाजाने त्यांना नाव, लौकिक, चेहरा दिला. परंतु त्यांच्यात राजकारणाचे वारं भिनलेय, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोडले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या भुमिका मराठा समाजासाठी ज्या पहिल्या होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. मराठा समाज ताकदीने महायुतीच्या मागे उभा राहील. निकालातून ते दिसून येईल, असा ठाम विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा सगळीकडे पसरला आहे. उमेदवारांची घोषणा, क्रमाक्रमाने पक्षाच्या येणाऱ्या याद्या, नाराजीनाट्य हे सगळीकडे बघायला मिळतो आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आणि मुख्यमंत्री पदावरून रंगणारी संगीतखुर्ची यामध्ये आता नवीनच प्रश्नाची भर पडली आहे. इतर राज्यांमध्ये गळ्यात गळे घालून मिरवणारे सपा-काँग्रेस महाराष्ट्रात वेगळे होण्याची चिन्हं दिसत आहेत.
Fahad Ahemed समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. ते मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या जागेवर अजित पवार गटाच्या सना मलिक यांच्या विरोधात लढणार आहेत.
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा संदेश आला होता. दरम्यान, आता धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
तिकडे उत्तर प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव इकडे महाराष्ट्रात घिरट्या घालायला नुकतेच आले होते. सपाचे आकाश तसेही मोकळेच आणि फक्त विशिष्ट समाजासाठी तर ते पुरते खुले असते. त्यामुळे अशाच विशिष्ट आंजारण्यात-गोंजारण्यात अखिलेशबाबू कसलीही कसर सोडत नाही. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला, परंतु या दौर्यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मविआचाही विचका केला. इकडे उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून ‘तू-तू मैं-मैं’
काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला. त्यांना समान वागणूक दिली नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. शनिवारी, पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पणही केले.
राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला 'संत भोजलिंग काका' यांचे नाव देण्यात आले आहे.
Mehaboob Ali समाजवादी पक्षाचा कट्टरपंथी नेता म्हणून ओळख असलेल्या मेहबूब अलीने (Mehaboob Ali) भडकाऊ विधान केले. त्यांनी आपल्या भाषणात संविधानाचा उल्लेख करत नाव न घेता भाजप आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली आहे. "आता मुस्लिमांच्या संख्येत वाढ होतेय, २०२७ मध्ये योगी राजवट जाणार" , असे वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणात केले. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी केलेल्या भाषणात भडकाऊ वक्तव्य केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अमरोह येथील बिजनौर
उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाचे नेते, वीरेंद्र बहादूर पाल यांच्या विरोधात, वकील महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Nawab Singh Rape Case अखिलेश यादवचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात फॉरेन्सीन कक्षाने ज्या पीडितेवर अन्याय झाला तिची वैद्यकीय तपासणी केली असता नवाबसिंहांचे रक्त आणि पीडितेचे रक्त एकत्र जुळले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
Yogi Adityanath समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील नेते मोईद खान यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आयोध्या जिल्हा प्रशासनाने गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी मोईद खानचे शॉपिंग मॉल बुलडोजरद्वारे पाडण्यात आले आहे. मोईद खानने अनधिकृत जागेत शॉपिंग सेंटर बांधले असल्याचा योगी सरकारचा दावा आहे. यामुळे योगी सरकारने मोठे पाऊल उचलले. यासोबतच कन्नौजमध्येही बुलडोझरद्वारे संबंधित अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.
Nawab Singh उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पीडित युवतीने समाजवादी नेता नवाब हिंस यादवच्या महाविद्यालयात नोकरीची मागणी केली होती. यावेळी नवाब सिंहने पीडित युवतीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितीची आत्या त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी पीडितेच्या आत्याने याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. ही घटना कनौज येथील कोतवाली नगर येथील समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंग यादव यांच्या महाव
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे
"आदिवासी समाज आजही विकासाच्या दृष्टीने विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मागे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या प्रभावशाली लोकांनी यामध्ये पुढे येऊन सहकार्य करावे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
ठाण्याच्या हाजुरी भागात विशिष्ट समाजाकडून धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने कारस्थाने सुरु आहेत. कायद्याचे भय नसलेल्या समाजाकडून मंदिरांचीही विटंबना केली जात आहे.
उत्तर प्रदेशच्या सहारनपुर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांच्या विजयानंतर मसूदच्या समर्थकांनी रस्त्यांवर हुल्लडबाजी करत महिलांना अश्लील इशारे केले. त्यांचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, मसूदचे समर्थक बाईकस्वारी करत हुलडबाजी करत होते. एका-एका बाईकवर चार-चार लोक बसले होते. यात चारचाकी वाहनांचा ही समावेश होता.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या वादात राधेश्याम पाठक नावाच्या वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. शंभू चौधरी आणि त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा आरोप आहे. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मृताच्या कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी एकूण चार आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना शुक्रवार, दि. १० मे २०२४ घडली.
मुंबईच्या पूनम क्षीरसागर या तरूणीची हत्या निजामउद्दीनने केली. ‘लव्ह जिहाद’च्या या घटनेने मातंग समाजात प्रचंड आक्रोश आहे. समाजाने ‘मातंग विकास परिषद’ अंतर्गत दि. 2 मे रोजी अण्णाभाऊ साठे नगर, मानुखर्द येथे या घटनेविरोधात निषेध रॅली आणि सभेचेही आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ता म्हणून रॅली-सभा नियोजन आणि कार्यवाहीमध्ये सहभागी होते. पूनमच्या हत्येचे समाजात काय पडसाद उमटले? तसेच या सभेचे अंतरंग काय? निष्पन्न काय? याबाबत या लेखातून घेतलेला हा सविस्तर आढावा...
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येच्या तप्त उकाड्यातही भाविकांनी रांगेत उभं राहून रामललाचं दर्शन घेतलं. मात्र, काही राजकीय पक्षांना रामभक्तांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची सवयच जणू आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. राम मंदिरावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. पूजा-पाठ हे पाखंडी करतात, फक्त राम मंदिर अयोध्येतच नाही तर देशात हजारो राम मंदिरं आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा रामभक्तांनी ट्विटरवर
२०२४ लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटप अखिलेश यादव यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. एक, दोन नव्हे तर सपाने अनेक जागांवर उमेदवार बदलले आहेत. काही जागांवर तर ३-३ वेळा उमेदवार बदलण्याची वेळ सपावर आली आहे. हा गोंधळ नेमंका काय आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा, याची चिंता सतावत आहे. ही समस्या केवळ एकाच ठिकाणी दिसली नाही, तर अखिलेश यादव यांना लोकसभेच्या अनेक जागांवर अशा समस्यांना तोंड द्यावे लागले.