(Anil Deshmukh) “राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केले,” असा गौप्यस्फोट माजी न्या. के. यू. चांदिवाल यांनी केला आहे. अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये न्या. चांदिवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले. त्यात अनिल देशमुखांना आयोगाने ‘क्लिनचीट’ दिली नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
Read More
Justice Chandival यांच्याकडून Anil Deshmukh यांची पोलखोल!
सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असा खुलासा निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला होता. परंतू, या आयोगाचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या अहवालाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
( MahaVikas Aghadi ) एखाद्या राज्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी जसा मुख्यमंत्री सक्षम लागतो, तसाच गृहमंत्रीही. देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील अशी काही नावे त्यात घेता येतील. महाविकास आघाडीचा सत्ताकाळ मात्र या महत्त्वाच्या पदांना गालबोट लावणारा ठरला. या सरकारचा गृहमंत्री पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचे ‘टार्गेट’ देतो आणि मुख्यमंत्री मान डोलावतात, यापेक्षा वाईट अनुभव महाराष्ट्राने कधी घेतला नाही. या प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही निष्पापतेची टिमकी मिरवण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे मत
अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
निवडणूकीतील पराभवाच्या भीतीने भाजपकडून सचिन वाझेचा वापर करण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माध्यमांमध्ये या बातम्या पाहिल्या असून गेले दोन दिवस नागपूरमध्ये असल्याने मला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून, मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे”, असा खळबळजनक गौप्यस्फोट निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे याने शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजी केला. १०० कोटींचे खंडणी प्रकरण, २०२१ मधील अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेला परत पोलिसात घेतले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझेला पुन्हा नोकरीत कुणी घेतलं, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर किती दिवस राहायचा? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना केला आहे. नवनिर्वाचित खासदार कंगणा राणावत यांच्या महाराष्ट्र सदनातील मुक्कामावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
खासदार संजय राऊत विचारतात नव्या संसद भवनाची देशाला गरज होती का? मग मी विचारतो एक मातोश्री असताना महापालिकेत भ्रष्टाचार करून बांधलेल्या दुसऱ्या मातोश्रीची काय गरज होती? असा सवाल आ. नितेश राणेंनी केला आहे. राऊतांच्या प्रश्नावर राणेनी खरपुस समाचार घेतला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत होणार वाढ
राज्यसरकारमध्ये सचिन वाझे यांच्यासारखे आणखी किती अधिकारी दडले आहेत?" असा सवाल भाजपा प्रदेशउपाध्यक्ष माधव भंडारी यांनी उपस्थित केला. परमवीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो, भंडारी यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केलेल्या वाझेचा पाय आणखी खोलात
अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय अन्वेषण पथकाला(एनआयए) सचिन वाझेची एक गुप्त डायरी हाती लागली आहे
हिंदू श्रद्धास्थानांची खिल्ली उडविण्याचा खेळ केतकरांनी पुन्हा सुरू केला आहे
सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचं तोंड काळं झालं आहे, त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सचिन वाझे प्रकरणावर अखेर दिल्लीमध्ये पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. एनआयएच्या अटकेनंतर सोमवारी वाझेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अँटिलिया प्रकरणी वाझेंची याआधीच एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास केला जात आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्काॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदर येथे आढळून आला होता.त्यानंतर त्याचाही तपास एटीएसकडून करण्यात येत असून त्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा जबाब आज नोंदवण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिन वाझे हे व्यवसायाच्या निमित्ताने ओळखीचे असल्याचे सांगितले आहे. माझ्या पतीचा खून झाला असावा आणि तो सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणातील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर भूमिका संशयास्पद मानली जात आहे. याबद्दल मनसेचे नेते संदीप देशपांडेही वक्तव्य केले आहे. 'शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात ?', असे टि्व्ट त्यांनी केले आहे.