केंद्र सरकारच्या कायद्याला हिरवा कंदील
Read More
उत्तरेमध्ये मुख्यतः बिहार, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. याउलट मध्यप्रदेशपासून खाली या बंदला कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.
केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज याविषयी माहिती दिली असून सरकार याविषयी योग्य तेच मत न्यायालयासमोर मांडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दलित संघटना आणि भारत बंद आंदोलनाला पाठींबा देण्याच्या नावावर देशातील विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकार हे दलित विरोधी असल्याचे चित्र विरोधी पक्षांकडून रंगवले जात आहे.