युनूस यांनी तूर्तास राजीनामा दिला नसला, तरी अर्थतज्ज्ञ असणार्या युनूस यांचा राजकीय हिशोब सपशेल चुकल्याचे प्रत्यंतर रोजच्या रोज येत आहे. त्यांच्या या चौफेर अपयशाची किंमत बांगलादेशला मोजावी लागेल, ही त्यातील शोकांतिका.
Read More
(Bangladesh's Interim Government Chief Muhammad Yunus Planning To Resign) बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार कधीही कोसळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पुणे शहराध्यक्षांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणूकांचा तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अलौकिक बुद्धिमत्तेचे वॉरेन बफे यांनी वयाच्या 93व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करत, संपूर्ण जगाला चकित केले. आर्थिक युगातील त्यांनीच लिहिलेल्या एका भल्यामोठ्या समृद्ध अध्यायाला त्यांनी यशस्वीपणे पूर्णविराम दिला. आर्थिक शिस्तीचे धडे संपूर्ण जगाने ज्यांच्याकडून घेतले, त्या बफे यांच्या जीवनातील अर्थचिंतन...
( Ram Naik resigns as chairman of Fisheries Development Policy Committee ) महाराष्ट्र राज्याचे ‘मत्स्योद्योग विकास धोरण’ निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सोमवारी माटुंगा यशवंत नाट्यसंकुल येथे झालेल्या नियामक मंडळीच्या बैठकीमध्ये कामाच्या तणावामुळे नाट्य परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मात्र बैठकीमध्ये हा राजीनामा नामंजुर झाल्याने त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. नाट्य परिषदेमधील वादामुळे हे राजीनामा नाट्य घडल्याची कुजबूज असली तरी दामले यांनी राजीनाम्यासाठी कोणतेही वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
माझी प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी मंगळवार, ४ मार्च रोजी दिली.बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
बीड हत्या प्रकरणानंतर सर्वत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
(Rajan Salvi) कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या म्हणजे १३ फेब्रुवारीला ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेण्याची काँग्रेसची प्रथा चुकीची आहे, असे मत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
Delhi Assembly election दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
मी राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जागतिक परिस्थितीमध्ये मोठ्या वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये अनेक बदल असले तरी लक्षणीय असलेले बदल म्हणजे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा होय! ट्रुडोंच्या बेताल वक्तव्याने भारताशी असलेले कॅनडाचे ( India-Canada Relations ) संबंध कमालीचे खालावले होते. ते आता सुधारतील अशी अपेक्षा आहे. ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर कॅनडात बदलणार्या संभाव्य राजकारणावर टाकलेला दृष्टिक्षेप...
(Nana Patole) "मला पदमुक्त करा", अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केल्याचे वृत्त समोर येत आहे. "प्रदेशाध्यक्ष पद नको, प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करा", असे नाना पटोलेंनी म्हटल्याचे बोलले जात आहे.
पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याआधीच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आतिषी सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांनी मंत्रिपदासह आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांनी जनतेला धोका दिला असून, शीशमहल घोटाळा केल्याचा आरोपही गहलोत यांनी केला आहे. मंत्री असूनही गहलोत यांनी पक्षासहित पदाला सोडचिठ्ठी दिल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे.गहलोत यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून, एकेकाळी त्यांना अरविंद केजरीवालांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांच्या प्रचारार्थ माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काढलेल्या प्रचार पदफेरीस कुंभारखान पाडा, नवापाडा, गरिबाचा वाडा परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. भाजपा आणि महायुतीचा जयजयकार करत शेकाडो महिला - पुरुष कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीत उपस्थिती लावली.
"प्रतिमा मलीनतेतून सावरण्यासाठी राजीनामा देणे ही केवळ स्टंटबाजी आहे," अशी टीका भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचारामुळेच केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झाली आहे. ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
49 Bangladeshi Hindu Resign बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा झाल्यानंतर युनूस खान यांचे सरकार स्थापन करण्यात आले. मात्र बांगलादेशी नवनिर्वाचित सरकार आणि जमात ए इस्लाम या कट्टरपंथी संस्थेने बांगलादेशी हिंदूंच्या सरकारी नोकऱदारांना हटवले आहे. सरकारी नोकऱ्यांवर गदा आणण्याचे काम बांगलादेशी सरकारने केले आहे. आतापर्यंत एकूण ४९ बांगलादेशी हिंदू शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले आहे.
Mamta Banerjee Resign आर जी कर महाविद्यालयात पीडितेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेच्या आईने प.बंगालच्या मुख्यमंत्रीं ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे. ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी आर्त मागणी पीडितेच्या आईने केली आहे.
Sheikh Hasina Resign बांगलादेशात ४ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना कट्टरवाद्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. असे असले तरीही बांगलादेशातील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. यासर्व प्रकरणानंतर शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशचा पाकिस्तान व्हायला पार वेळ लागणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना त्यांनी बांगलादेशातील अराजकतेसंदर्भात माहिती दिली आहे.
बांगलादेशच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशवासी शेख हसीना (Sheikh Haseena Resign) यांच्या पंतप्रधानपदच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अशातच आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ बांगलादेशच नाहीतर जागतिक पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेख हसीना आपल्या बहिणीसोबत बांगलादेश सोडून अज्ञातस्थळी रावाना होण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलदेशमध्ये बांगलादेशवासी शेख हसीना (Sheikh Haseena Resign) यांच्या पंतप्रधानपदच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अशातच आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना यांनी आपल्या बहिणीसोबत हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.
Sheikh Hasina Resign बांगलादेशातील अराजकतेमुळे पंतप्रधान हसीना शेख यांना राजीनामा देऊन देशाबाहेर पळावे लागले आहे. सोमवार, ५ ऑगस्ट रोजी त्यांचे विमान गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर उतरले. हा भारतीय वायुसेनेचा हवाई अड्डा आहे. AJAX1431 कॉल चिन्हांकित C-130 एयरक्राफ्ट भारताच्या सीमेत दाखल झाले त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यावर लक्ष ठेवले होते. हे विमान पाटणाहून उत्तर प्रदेशात दाखल झाले. शेख हसीना नवी दिल्लीहून लंडनला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
उबाठा गटाच्या पूर्व विदर्भातील नेत्या शिल्पा बोडखे यांनी गुरुवारी पक्षाला रामराम ठोकला आहे. उबाठा गटातील नेत्या विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांच्यावर आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
काँग्रेसनंतर आता उबाठा गटातही राजीनामा सत्र सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. उबाठा गटाचे नेते बबनराव घोलप यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप हे शिवसेनेचे उपनेते आणि अनेकदा आमदार राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असून यातूनच त्यांनी आता राजीनामा दिला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 'एक्स' सोशल मीडिया हँडलवर लिहिले, "माननीय काँग्रेस अध्यक्ष श्री खरगे जी! आदरणीय सर, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे."
कांग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे आणखी पाच आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकताच काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये दुसरा मोठा भूकंप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतातील आघाडीची फिनटेक पेमेंट बँक पेटीएमच्या स्वतंत्र संचालकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे. कंपनीतर्फे नोंदणीतील माहितीनुसार मंजू अग्रवाल यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित पेटीएम घोट्यामुळे उद्योग विश्वात खळबळ माजली होती. आरबीआय, सीबीआय, ईडी तपासयंत्रणेच्या ससेमिरा चालू असल्याने गुंतवणूकदार व ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मिलिंद देवरानंतर आता माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
"जी काँग्रेस रामाची होऊ शकत नाही, ती आता कोणाचीही होऊ शकत नाही." अशी प्रतिक्रिया देत मध्य प्रदेशतील ग्वालियर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि तीनवेळा नगरसेवक आनंद शर्मा दि. १५ जानेवारी सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला.
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता त्यांनी आपल्या अटकेबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी १५ दिवस तुरुंगात राहिलो असून तुरुंगात जाण्यास घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
"टिकणारं आरक्षण दाखवा, मी राजीनामा देतो," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावर्षी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुक आयोगाकडून या निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, नुकतीच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु, ही यादी पुढे आल्यानंतर थोड्याच वेळात एका काँग्रेस नेत्याचा राजीनामा चांगलाच व्हायरल झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांचा हा राजीनामा आहे. त्यांच्या राजीनाम्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारले गेले. हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना आता जालना येथील घटनेवर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्याच्या राजकारणात प्रत्येकच पक्षात नेत्यांची ये-जा सुरुच असते. अशातच मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. मुंबई काँग्रेसमध्ये तीन माजी नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शिंटे गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या राजकारणाला एक मोठे वळण मिळाले आहे. सत्यजित तांबेंचे मामा आणि काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षात उफाळून येत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षात आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये थोरातांच्या राजीनाम्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार घुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ज्येष्ठ नेत्याने राजीनामा पत्रात राहुल गांधींना टोला लगावला आहे. गांधींवर जोरदार प्रहार करत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले. एका ज्वलंत राजीनामा पत्रात आझाद यांनी राहुल गांधींना फाडून दावा केला की पक्षातील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक घेतात.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी दि. 26 ऑगस्टला पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. याआधी गुलाम नबी आझाद यांनी
इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी गुरुवारी राजीनामा दिला आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. द्राघी यांना राष्ट्रपतींनी आत्तासाठी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून चालू ठेवण्यास सांगितले आहे, असे राज्याच्या कार्यालयाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे. अध्यक्ष मटारेला संसद विसर्जित करतील की लवकर निवडणुका बोलवतील हे लगेच स्पष्ट झाले नाही. तथापि, राजीनाम्याने युरोपियन देश राजकीय गोंधळात टाकला आहे.
“गेल्या महिन्याभरात पक्षाची जी अवस्था झाली आहे, ती पाहवत नाही. तर जे ५० वर्षांमध्ये उभे केले, ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही,” असे भावनिक वक्तव्य पक्षाची झालेली अवस्था सांगताना रामदास कदम यांनी केले.
प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रातील सत्ता गमावल्या नंतर ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनीही शिवसेनेपासून दुरावले आहेत. रामदास कदम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पाठवला आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम हे गुवाहाटीतच शिंदे छावणीत दाखल झाले होते.
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर आपल्याला कोणतीही कोणतीही किंमत राहिली नाही. माझा मुलगा व मला वेळोवेळी अपमानित करण्यात आल आहे. मीडिया समोर कधीच जाऊ नका अस सांगण्यात आलं. असे आरोप रामदास कदम यांनी पत्रातून केला आहे.