हिंद-प्रशांत भागातील चीनचे वाढते वर्चस्व आणि आक्रमकतेने या भागातील अनेक देश चिंतीत आहेत. चीनचा सामना करण्यासाठी हे देश आता एकत्र येतं आपसातील संबंध मजबूत करीत आहेत. २०२० साली गलवान खोर्यातील वादावरून भारत-चीन संबंधही तणावपूर्ण झाले. चीनला रोखण्यासाठी भारतदेखील येथील मित्रदेशांसोबत संरक्षणविषयक भागीदारी करू पाहत आहे. या यादीत व्हिएतनाम या देशाचाही समावेश. व्हिएतनामची भौगोलिक स्थिती महत्त्वाची असून, ती भारतासाठी फायदेशीर ठरणारी आहे.
Read More