प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी केले.
Read More
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरातील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वार्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या संस्मरणीय अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने अयोध्येसह देशभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुंबईतील लोअर परळ फिनिक्स मॉल येथे ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ ( 'Ramayana: The Legend of Prince Rama' ) या अॅनिमेशनपटाच्या विशेष चित्रीकरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानिमित्ताने
(Ramayana: The Legend of Prince Rama) रामजन्मभूमी अयोध्या येथील राममंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' या १९९३ साली भारतीय आणि जपानी कलाकारांनी मिळून तयार केलेल्या चित्रपटाचे २२ जानेवारी रोजी मुंबईतील लोअर परळ येथील फिनिक्स मॉल मध्ये पुनर्प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
आधुनिक भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय असा दिवस म्हणजे पौष. शु. द्वादशी (प्रतिष्ठा द्वादशी) दि. २२ जानेवारी २०२४. हिंदू समाजाची आराध्य देवता याच दिवशी त्यांच्या मंदिरातील गर्भगृहात प्रतिष्ठित झाली, असा ऐतिहासिक आनंदी दिवस. या गर्भगृहात नुकतेच दर्शनासाठी जाता आले, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप महिन्यांची इच्छा पूर्ण झाली आणि गर्भगृहातील बालक रामाचे दर्शन म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण होता. खरे तर गर्भगृहात त्या विग्रहाकडे सतत बघत राहावे, इतकी देखणी आणि नितांत सुंदर श्रीरामललाची मूर्ती आहे. सहा वर्
अयोध्येतील रामजन्मभूमीवरील ( Shree Ram ) भव्य राममंदिराच्या दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या मंगल उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘संत साहित्यातील रामदर्शन’ या साप्ताहिक लेखमालेतील हा ५१वा लेखांक आहे. आजवरच्या लेखात आपण मराठी संतसाहित्यातील रामदर्शन केले. आता आपण भारतातील विविध प्रांतांमध्ये, विविध भाषेतील रामायणाची माहिती पुढील लेखापासून घेणार आहोत आण
मुंबई : "राम मंदिर बांधणीसाठी मोदी कुठेच नव्हते," असे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा आपली बेताल वक्तव्याचा सूर कायम ठेवल्याचे दिसून आले. राम मंदिराच्या ( Ram Mandir ) बांधकामात काँग्रेस नेत्यांचाही हात असल्याचे राऊतांनी सांगितले. "नरसिंहराव, डॉ. शंकरदास शर्मा यांसारखे लोक केंद्रात नसते तर मंदिर बनलेच नसते," असा पोकळ दावादेखील राऊतांनी केला आहे.
राम मंदिरच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या लोकांना बोल लावणाऱ्या काँग्रेसचे 'सेक्युलर' धोरण उघडे पडले आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, मजारींवर माथा टेकवण्यात धन्यता मानू लागले आहे की काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. प्रियांका गांधी यांचा वायनाड पोटनिवडणूकीत विजय झाल्यानंतर, त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा यांनी हाजी अली दर्गयावर माथा टेकवला. त्याच वेळेस मशिदींमध्ये सध्या सुरू असलेले सर्वेक्षण कसे अयोग्य आहे यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले.
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात आज यंदा तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्यदिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रीराम मंदिरासह शरयु घाटावर तब्बल २५ लक्ष दिवे लावण्याचे संकल्प हिंदू समाजाने केला आहे.
राज्यातील महायुती सरकारने अयोध्येत नवा अध्याय लिहिला आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्तनिवास बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मंदिर परिसरात सरकारने जूनमध्ये जमीन घेतली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ०८ ऑक्टोबर रोजी अयोध्येत या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे खोटारड्यांचे सरदार असून हिंदू धर्माची बदनामी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, असा घणाघात विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शनिवारी केला आहे.
( Shri Ram Mandir ) अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रस्ट कटीबद्ध असून संपूर्ण मंदिर संकुलाचे बांधकाम ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
प्रत्येक गोष्टीत स्वत:चा फायदा करून घेण्याची सवय असलेली माणसे, या फायद्यासाठी ते प्रसंगी अपप्रचार करून मानवी भावना देखील त्यासाठी पणाला लावतात. अशाच काही घटना देशाच्या बाबतीत घडत आहेत. गेल्या दोन- तीन महिन्यात देशातील जनतेच्या डोळ्यात अनेकवेळा धूळफेक करण्यात आली त्याचा घेतलेला हा आढावा...
मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
रामाच्या नावावर खोटेबाजीचा पतंग उडवणं आता सोडा, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. राम मंदिरात गळती होत असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवण्यात आली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या न
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला. ज्या दिवसाकडे देशातील नागरिकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते तो ४ जूनचा दिवस नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारा होता. दरम्यान, अयोध्येत अनपेक्षित अपयश मिळाल्यामुळे सरकारसह काही कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मिडिया पोस्ट करत, “सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात”, असे म्हटले आहे.
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून, काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीलाही पराभवाची पुरती चाहूल लागलेली दिसते. तरीही निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांत जादूची कांडी फिरेल, या आशेने प्रियंका आणि राहुल गांधींनी जाती-धर्माच्या मुद्द्यावरुन मतदारांमध्ये संभ्रमनिर्मितीचे प्रयत्न सुरुच ठेवलेले दिसतात. पण, मतदार या षड्यंत्राला कदापि भुलणार नाही, हे निश्चित!
पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेनंतर उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ मे रोजी नालासोपाऱ्यात येत असल्याची माहिती भाजपा वसई विरार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.
शेवटी देवेंद्र फडणवीसांना मला वाघ म्हणावे लागले की नाही? मी आहेच वाघ! काय म्हणता, खरा वाघ नाही, कागदी वाघ म्हणाले. असू देत. कोण आहे रे तिकडे खबर द्या, राज्यात ‘मशाली’चे काय सुरू आहे? काय? जिथे मराठी भाषिक जास्त, तिथे मराठी विरुद्ध गुजराती, विरुद्ध उत्तर भारतीय आणि जिथे गुजराती आहेत तिथे ‘केम छो वरली’ पॅटर्न. वाहवा वाहवा! हं, तर उगीच नाही आम्ही अडीच वर्षे कुठेही न जाता महाराष्ट्रावर सत्ता गाजवली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लखीमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. सपा नेते राम गोपाल यादव यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, "ते राम मंदिराला निरुपयोगी म्हणतात. तुमच्याकडून थोडीही चूक झाली तर ते बाबरीच्या नावाने राम मंदिराला टाळे ठोकतील. शाह म्हणाले की, जेव्हा उत्तर प्रदेशात सपाचे सरकार होते. गुंडगिरी चालली होती. जमिनींवर अतिक्रमण झाले. होळी आणि दिवाळीच्या दिवशी वीज नव्हती आणि रमजानच्या काळात २४ तास वीज होती."
काँग्रेस नेत्यांचा हिंदूद्वेष विशेषत: राम मंदिरावरचा राग नवा नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राम मंदिर आणि रोजगाराचा संबंध जोडून प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसमध्ये राहून डाव्या विचारसरणीचा चष्मा लावलेल्या थरूर यांना मोदी सरकारने मागच्या एक दशकात केलेल्या लोककल्याणकारी कामांमुळे जी संतुष्टी मिळालेली आहे, ती कशी दिसणार?
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक आदर्श जोडपं म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया (Ritesh Genelia At Ayodhya) देशमुख यांची ओळख आहे. जितकी चर्चा रितेश-जिनिलायाची असते तितकीच चर्चा त्यांच्या दोन्ही मुलांची असते. रितेशची मुलं कायम मिडियाला पाहून हात जोडून नमस्कार करतात आणि त्यांच्या या कृतीचे कायमच कौतुक केले जाते. आता महाराष्ट्राचं हे लाडकं कपल मुलांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या (Ritesh Genelia At Ayodhya) दर्शनासाठी गेले होते.
अयोध्येतील राममंदिरामध्ये दलित-वंचितांना प्रवेश नसल्याचा धादांत अपप्रचार विरोधक करताना दिसतात. त्यांच्या या दाव्यामध्ये तसूभरही तथ्य नाहीच. कारण, प्रभू श्रीरामांनी कधीही जातीभेद, वर्णभेदाला थारा दिला नाही. शबरीची उष्टी बोरे खाण्यापासून ते केवट राजाला मिठी मारण्यापर्यंत अशा कित्येक प्रसंगांतून श्रीरामांच्या जीवनातील समरसता प्रतिबिंबित होते. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या ‘समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम’ या विषयावरील भाषणाचे शब्दबद्ध केलेले हे विचार...
राम नवमीच्या निमित्ताने जनमनाचा वेध घेताना प्रभू रामचंद्र आणि शीख संप्रदाय यांचे अतूट नाते समोर आले. शीख संप्रदायासाठी प्रभू रामचंद्र हे सतगुरू स्थानी असल्याने, परमपूजनीय आहेत. या लेखातून या नात्यांचा वेध घेऊया...
भारतीयांचा श्वास असणार्या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
"त्यांचे शरीर कैदेत आहे, पण आत्मा स्वतंत्र आहे. डोळे बंद करा आणि त्या आत्म्याची अनुभूती घ्या,” इति सुनीता केजरीवाल. केजरीवालांचा आत्मा मुक्त आहे आणि डोळे बंद करून तो भेटू शकतो असे म्हणणार्या सुनीता मात्र शरीररूपी अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात जातात. तिथे जाण्यापेक्षा सुनीताच मग डोळे मिटून त्यांना भेटूच शकत होत्या की? काय म्हणावे, भारतीय जनता त्यातही दिल्लीकरांना मूर्ख समजणारे हे केजरीवाल दाम्पत्य आणि आप पक्ष!
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते पिजूष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जातीयवादी टिप्पणी केली आहे. तेली जातीचे असलेले मोदी अयोध्येतील राम मंदिरात रामाचा अभिषेक कसा करू शकतात, असे पांडा यांनी म्हटले आहे. पांडाने पंतप्रधान मोदींच्या बालपणात चहा विकण्याबाबतही अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी संकुलात जवानाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएसी प्लाटून कमांडरला गोळी लागली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्लाटून कमांडरला लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले असून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुलगी मालती आणि नवरा निक सोबत नुकतीच अयोध्येत गेली होती. तिच्यापाठोपाठ आता अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील अयोध्येत (Ayodhya) जाऊन प्रभू श्रीरामाचे (Ayodhya) दर्शन घेतेल आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या जेएनयु (JNU) या चित्रपटाची घोषणा झाली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नायिका प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अमेरिकेहून भारतात आली आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी नुकतीच तिने हजेरी देखील लावली होती. यानंतर ती थेट अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) लेक मालती आणि नवरा निक जोनस सोबत गेली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात जाऊन तिने (Priyanka Chopra) दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत मालती आणि निक दोघेही पारंपारिक पेहरावात दिसले.
अयोध्येत श्रीरामललाच्या दर्शननासाठी दररोज सरासरी एक ते दीड लाख भाविक मंदिराला भेट देत आहेत. सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्याची मुभा आहे. मात्र पहाटे ४ वा. होणारी मंगला आरती, सकाळी ६.१५ वा. होणारी श्रृंगार आरती आणि रात्री १० वा. होणारी शयन आरतीचा लाभ भाविकांना घेता येत नव्हता. आता हा लाभ घेता येणार असून यासाठी विशेष प्रवेशपत्राची व्सवस्था मंदिर न्यासकडून करण्यात आली आहे. (Ramlala Aarti Entry Pass)
काँग्रेसचे बहिष्कृत नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आचार्य म्हणाले, राहुला गांधी जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत काँग्रेसला कुणीही वाचवू शकत नाही. तसेच, काँग्रेसच्या दुर्दशेसाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती व्यक्ती म्हणजे राहुल गांधी, असेही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले.
मागे नाही का, जड मनाने मुख्यमंत्रिपद सोडल्यावर, मी बंगल्यातून मोठी काळी पेटी बाहेर काढली होती. त्या काळ्या पेटीत काय असेल, असे अनेकांना वाटले होते. काय म्हणता, माझ्या लाल रंगाच्या त्या पर्सबाबत लोकांना उत्सुकता आहे? त्यात काय असेल, असा सगळ्यांना प्रश्न पडलाय? जाऊ दे, मी काय म्हणतोय?
"प्रत्येक व्यक्तीच्या अंतरात्म्यात श्रीरामाची मूल्ये पुन्हा प्रस्थापित करून विहिंप एक सुसंस्कृत, समर्पित आणि सुरक्षित हिंदू समाज निर्माण करेल." असे विश्व हिंदू परिषदे नवनिर्वाचित केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी म्हटले. (VHP Press Conference)
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे शुभकार्य संपन्न झाले होते. याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित त्यात, “तुम्ही ५०० वर्षांचा इतिहास बदलला असून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकार केले आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
सुरतहून अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. नंदुरबार परिसरात घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अशा अनेक घटना सध्या होत असल्याने प्रवाशांमध्ये दरम्यान गोंधळ उडाला होता. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सदर घटनेसंदर्भात तपास सुरु असून त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. (Astha Express Nandurbar)
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येऊन दरदिवशी रामललाचे दर्शन घेत आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई ते अयोध्या रेल्वे सेवा असली तरी भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना अयोध्या प्रवास करता यावा यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्याहून थेट अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पहिली बस धुळ्याहून अय
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून त्यात एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. भाजपने लोकसभा आणि राज्यसभेच्या आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला असून त्यामध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभेत राममंदिरावर चर्चा सुरू झाली असून राममंदिरावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल सिंह यांनी श्री राम मंदिर उभारणी आणि श्री रामललाच्या अभिषेक संदर्भात चर्चेला सुरुवात केली.
अयोध्येतील दि. २२ जानेवारीचा रामललाचा भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवणारे सर्वस्वी भाग्यवानच! अशाच भाग्यवान भारतीयांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त). अयोध्येतील त्या अनुपम आणि कालातीत अनुभवाचे हे शब्दचित्रण...
"अयोध्येतील श्रीराम मंदिराचे शिखर रामसेवकांची तपस्या आहे, तिथला कलश रामसेवकांचे श्रम आहे, तिथल्या भिंती आपल्या धर्माचा अभिमान आहे, तिथला मंडप आपली तितिक्षा आहे तर मंदिरातील गर्भगृह म्हणजे ५०० वर्ष पाहिलेली प्रतिक्षा आहे. ते मंदिर केवळ दगडाचे मंदिर नसून कारसेवकांच्या बलिदानातून तयार झालेले मंदिर आहे."; असे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी केले. गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथे सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवात त्या बोलत होत्या. दरम्यान बुधवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी झालेल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबरी मशीदीची एक वीट भेट म्हणून मिळाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी त्यांना ही अनोखी भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी राम मंदिराचीही विटही संग्रही ठेवायची असल्याचे म्हटले आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज ठाकरेंना बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. यावेळी ते भाविक झाले आणि ही प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे. आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.
तमिळनाडूतील तिरुपूरमध्ये बनवलेले कपडे आजूबाजूच्या जिल्ह्यांनाच नव्हे, तर देशाच्या इतर भागातही पुरवले जातात. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळमधून येथे मोठ्या प्रमाणात मजूर येतात. स्थानिक मजुरांची कमतरता असल्याने, काहींनी बिहार आणि ओडिशामधून मजुरांना कामावर ठेवण्यासाठी एजन्सी उघडल्या. पंरतू, आता तिरुपूरचा वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे.
एकेकाळी हिंदूंना संघटित करणे, गुलामगिरीची मानसिकता संपवणे आणि ‘स्व’वर आधारित राष्ट्रीय चेतना जागृत करणे केवळ अशक्यप्राय वाटत होते. मात्र, रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेने परिस्थिती प्रतिकूल असताना देखील तसे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४० वर्षांपूर्वी सर्व संत समाज आणि अनेक संस्था आणि संघटनांना एकत्र आणले आणि रामजन्मभूमी चळवळ सुरू केली. एका ठिणगीची गरज होती आणि भगवान श्रीराम ही ती ठिणगी होती, जी हिंदू समाजाची ऊर्जा जागृत करण्यासाठी साहाय्यक ठरली.
अयोध्येचा प्रश्न सुटल्यानंतर आता काशी आणि मथुरा येथील हिंदूंच्या तीर्थस्थळांना मुक्त करण्यासाठी, जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. राम मंदिराच्या निर्माणाने उसळलेल्या ‘रामलहरी’त काँग्रेसची नाव बुडून जाईल, याचा अंदाज आल्यामुळेच, सोनिया गांधी यांनी कदाचित राज्यसभेचा पर्याय निवडला असावा.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी निमंत्रितांमध्ये संतगणांसह इतर धर्माचे धर्मगुरुही उपस्थित होते. मात्र ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (एआयआयओ) चे मुख्य इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आल्याचे समोर येत आहे. तसेच भारतातील इतर मौलवींनाही इमाम इलियासी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आवाहन फतव्याद्वारे केले आहे. (Fatwa issued against Imam Ilyasi)
अयोध्या येथे श्री रामलल्ला मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने विधानसभा प्रमुख अनुप भैय्या अग्रवाल यांनीदेखील धुळे जिल्ह्यात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करून धुळेकरांसाठी दर्शन सोहळा घडवून आणला. या सोहळ्यात किमान एक लाख भाविक सहभागी झाले होते.
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून भक्तीचा महापूर आला असून, रामललाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अशा स्थितीत रामललाच्या जन्मस्थानी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि तेथे राहणाऱ्या लोकांना कोणतीही सुविधा मिळण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (NHAI) ६८ किलोमीटर बायपासची योजना बनवली आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी थाटामाटात संपन्न झाला. ५०० वर्षांचा वनवास संपवून अखेर रामललला आपल्या जन्मभूमीत स्थिरावले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले होते. दरम्याव, राम मंदिरांच्या या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईला परतल्यानंतर माध्यमांना महत्वपुर्ण प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला खूप चांगलं दर्शन मिळालं. राम मंदिर प्राणप्रत