गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, आता यावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत न जाण्यासाठी पक्षनेतृत्वाला विनवणी केल्याचीही चर्चा आहे.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवत एक अटदेखील ठेवली आहे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त असल्याचे ते म्हणाले.
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. यातच आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल एक सूचक ट्विट केले आहे.
सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवार, १५ एप्रिल रोजी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभातील गंगा मातेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांना अनेक टीकांना सामोरे जावं लागत आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदूंनी गंगेत डुबकी लावली. त्यावर आता राज ठाकरे यांनी गंगेत मिसळलेल्या हाडांचे पाणी मी पिणार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये उपस्थितांना संबोधित करत म्हणाले आहेत.
Marathi Bhasha Gaurav Din मराठी विषयात एम.ए. करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम.ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक त
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली असून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही माझी वैयक्तिक भेट असून यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : राजकीय वर्तुळात कधीही एकत्र न येणारे दोन भाऊ भाचाच्या लग्नात शेजारी शेजारी उभे असलेली व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Thackeray ) व उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे राजकीय विरोधक असणारे चक्क एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले आणि संवादही साधल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न २२ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले. या लग्नात दोन्ही मामांनी पुढाकार घेऊन जबाबदारीही सांभाळली. या कौटुंबिक भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
(Avinash Jadhav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारलेला नाही. तसेच अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेत राजीनामा मागे घेतला आहे. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
Avinash Jadhav महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाच्या माहितीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे मनसे पक्षासाठी ही धक्कादायक घटना आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सच्चे साथीदार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई : दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ( Amit Thacheray ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो,” असे अमित यांनी म्हटले आहे.
वसई-विरार परिसरातील प्रस्थापित बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकुर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकुर यांचा दोन्ही जागांवर भाजपने पराभव ( Assembly result ) केला आहे.
Raj Thackeray Tweet महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन शब्दातच आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर ( Rajan Shirodkar ) यांचे मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर होते.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लीम मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. सर्व मुस्लीमांनी एकत्र यावे आणि मतदान करावे, अशी मागणी करत तुमच्या नाकावर टीच्चून व्हिडिओ काढत आहेत. जर मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत ना तर आज राज ठाकरे फतवे काढतो आहे.
ठाणे : ( MNS ) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी प्रचारासाठी दंड थोपटले असुन नेतेमंडळीनीही आता कंबर कसली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभेसाठी पहिली जाहिर प्रचार सभा सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वा. ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली असून मनसे नेते अभिजीत पानसे, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत.
Amit Thackeray महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. अमित ठाकरेविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानाच उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांआधी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आता प्राचारासाठी लोकांच्या घरोघरी जात प्
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
( MNS )सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या यादी जाहीर होताच नाराजीनाट्य, बंडखोरी अश्या गोष्टींना उधाण आले आहे. आणि याचा मोठा धक्का राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
( MNS )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.
राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना पाचही टोलनाक्यावर टोल माफी देण्यात येई अशी घोषणा केली. मुंबईत प्रवेश करताना आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड-एलबीएस टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका हे पाच टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरून हलक्या वाहनांना यापुढे टोलमधून सूट देण्यात येईल. आज रात्री १२ वाजेपासून हा निर्णय लागू करण्यात येईल.
(Ratan Tata) ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशाभरांतील सर्व स्तरांमधून त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
ठाकरे घराण्यातील आणखी एकजण निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी सोमवारी नेत्यांच्या बैठकीत आपली ईच्छा बोलून दाखवली.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने महाराष्ट्रभर नवनिर्माण यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा सध्या विदर्भात पोहोचली असून मनसेने गुरुवारी विदर्भातील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
पोलीसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्र सैनिकांनाही या प्रकरणात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?", असा सवाल त्यांनी उपस्थित क
राज ठाकरेंच्या ताफा अडवणारे कार्यकर्ते आमचे असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शुक्रवारी बीडमध्ये उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. तसेच त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्याही फेकण्यात आल्या होत्या. त्यामुळे उबाठा गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या सगळ्या प्रकारावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे माझी भेट घेणार ही त्यांची पळवाट होती. ते कधीही मला भेटायला येणार नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. यावर त्यांनी आपण मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
धाराशीवमधील आंदोलक हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक धाराशीवमध्ये ते मुक्कामी असलेल्या हॉटेलवर पोहोचले होते. यावर संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंवर टाडा लावून कारागृहात टाकले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीला आता जवळपास दोन महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यात ८ विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला आणि या हल्लानंतर दोन्ही पक्षांमध्ये पेटलेलं राजकारण. होय.. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला केला. एवढंच नाही तर या राड्यात एका मनसैनिकाचा जीवही गेला. पण हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय? अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये काय घडलं? आ
राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार गटाने पोलिसांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली याबद्दल भूमिका स्पष्ट करा, असा हल्लाबोल भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणा केल्यावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंनी शंकराचार्यांऐवजी राज ठाकरेंचीच पाद्यपूजा करायला हवी, अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य करत त्यांची पाद्यपूजा केली होती. यावरून आता प्रकाश महाजनांनी त्यांच्यावर टीका केली. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी महायूतीला दिलेल्या पाठिंब्यावर टीका केली होती. काही जणांनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रवींद्र वायकरांच्या विजयावर सध्या विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वायकरांनी आता विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयाकरिता राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सकस आहार, हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 'कॅलरी चार्ट' लावणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी' दिनानिमित्त 'जेन एक्सएल ओबेसिटी' या संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत घेण्यात आली.
राज ठाकरेंनी कोणत्या दिशेला जायचं ते आधी ठरवावं, अशी टीका उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे. राज ठाकरेंनी मुस्लिम मतांवरून केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यादा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तीन टप्प्यात मी बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक यांसारख्या महत्त्वकांशी निर्णयाचे स्वागत केले. राम मंदिर झाल्यानंतर शरयू नदीत फेकून दिलेल्या कारसेवकांच्या मृतात्म्याला शांती मिळाली. तिहेरी तलाक रद्द करत मुस्लीम भगिनींना न्याय दिला. याच प्रकारे कलम ३७० हटवून तो भाग मोदींनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे अधोरेख
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, मुंबईसह महानगर प्रदेशात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त सभा घेणार आहेत. शुक्रवार, दि. १६ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय आहे ते माहिती नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोवरही टीका केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.