कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरुन दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात राहतो. तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४ लाख १७ हजार ३६० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
Read More
१५ दिवसांच्या कालावधीत सुरु राहणार मोहीम पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवासी सुरक्षा उपक्रमात लोकप्रिय कार्टून पात्र 'छोटा भीम' च्या सहकार्याने एक नवीन सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली आहे. यामोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे या धोक्यांबद्दल जागरूक करणे आहे. ही मोहीम मुंबई सेंट्रल आणि रतलाम विभागांतर्गत चर्चगेट आणि इंदूर स्थानकांवर अनुक्रमे सुरू करण्यात आली. ही मोहीम १५ दिवसांच्या कालावधीत अंधेरी, बोरिवली, उज्जैन आणि रतलाम स्थानकांवर देखील राबवली जाईल.
कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाचे मूळ रेखन रद्द करून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे स्थानकांची जागा बदलण्याचा एमएमआरडीएचा डाव उघड करत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला.
खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
भारतीय रेल्वेच्या इंजिन बिहारच्या मारहौडा जिल्ह्यातून थेट आफ्रिकन देश असलेल्या गिनीपर्यंत प्रवास करणार आहे. तब्बल दीडशे ‘मेड इन इंडिया’ रेल्वे इंजिनांची मागणी या देशाकडून झाली होती. लवकरच टप्प्याटप्प्यांत लोकोमोटिव्ह इंजिनचा पुरवठा या आफ्रिकेतील गिनी या देशाला केला जाणार आहे.
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. पण, आज आयात करणारे रेल्वे मंत्रालय, आता निर्यातदार म्हणून नावारुपास येत आहे, हे बाब सुखावणारी अशीच!
दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले.
(BSF Jawans Train Controversy) जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेदरम्यान त्रिपुराहून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना तैनात करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील खराब ट्रेन पाठवल्याप्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ११ जूनला चार रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
विठूराच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले आता पंढरपूरच्या दिशेने वळली आहेत. अशावेळी आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील वारकऱ्यांसाठी विशेष ८० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजे खर्च ६ हजार ४०५ कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे १०८ लाख मनुष्य दिवसांचा थेट रोजगार निर्माण होणार आहे.
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता आहेत कोण?
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थांनकांजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे प्रवासी एकमेकांना घासलेगेल्यांने ही घटना घडली आहे. गेल्या २० वर्षांत मृत्यू झालेल्यांचा ही रेकॉर्ड आहे.
रविवार, ८ जून रोजी मुंबईतील रेल्वेसेवा मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे. पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वे मार्गांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ वचनबद्धतेने साजरा केला. याप्रसंगी, 'गो ग्रीन' उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ, शपथविधी आणि वृक्षारोपण मोहिमेसह अनेक हरित उपक्रम हाती घेण्यात आले.
कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली आहे.गर्दीच्या तासात झालेल्या या प्रकारामुळे लोकल डब्यात गोंधळ उडाला. बोकड मोकळा फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवेउभारणी कामे प्रगतिपथावर आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
"पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, यासाठी समन्वयाने काम करा. 'ब्लेम गेम' करीत बसू नका, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा", असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, दि. ३१ मे रोजी दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करून प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरून कामांची पाहणी केली.
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.
मान्सूनच्या आगमनाला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईची ‘तुंबई’ झाली. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना फटका सहन करावा लागला.
New railway line connecting religious places in Ahilyanagar Rahuri to Shanishinganapur रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
पश्चिम रेल्वेने भाईंदर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान आवश्यक देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार, २४ मे आणि रविवार, २५ मे रोजी पहाटे घेण्यात येईल. ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थिती सुधारण्यासाठी देखभाल महत्त्वाची असून ब्लॉकच्या वेळेत जलद गाड्या त्यांच्या नेहमीच्या ट्रॅकवरून धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशष पर्यटन रेल्वेची आयआरसीटीसीतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
(New railway bridge in Kurla) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या१७.५० किमी लांबीच्या प्रकल्पाचा अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान लक्षणीय प्रगती झाली आहे. कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाच्या (१०.१ किमी) संदर्भात, नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे उद्दिष्ट आहे.
(MP Naresh Mhaske instructions to thane railway officials) ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधीत होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून यामध्ये जे बाधीत होतील त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ७ मे रोजी दिले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी ५ मे २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यावर माहितीपूर्ण चर्चासत्र आयोजित केले होते.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दि. ३ मे व ४ मेच्या रात्री ४ तासाचा जंम्बो मेगा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ मे २०२५ पासून देशभरात काही बदल लागू होणार आहेत. ज्यांचा परिणाम नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ११ राज्यांमध्ये एक राज्य एक आरबीआय योजना लागू केली जाईल. या योजनेमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत बँकिंग सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि इतर पायाभूत सुविधांच्या माहितीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी बुधवार,दि.३० रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई यांच्यासह मध्य रेल्वे मुख्यालय इमारतीतील "चिंतन" कॉन्फरन्स रूममध्ये सर्व खासदारांची भेट घेतली.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी सर्व सुविधायुक्त अशी 'रनिंग रूम' (विश्रामगृह) बनविले आहे. त्याची माहिती देणारा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
new Pamban railway bridge राष्ट्रसेवेचा प्रण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने नव्या भारताची पायाभरणी होत आहे. देश पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीत वेगवान प्रगती करत असून, भारतीय रेल्वेचादेखील यामध्ये मोलाचा वाटा. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर, आज श्रीरामनवमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला तामिळनाडूतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा पंबन रेल्वे पूल...
( Who installed 103 out of 306 hoardings on railway land ) मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) घेतलेल्या चौकशीतून समोर आली आह
( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Vande Bharat Railway भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वे पाठवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने शनिवार, २२ मार्च रोजी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, रविवारी दुसऱ्या दिवशीही ही वाहतूक ४ ते ५ तास विलंबाने सुरु असल्याची माहिती आहे.
पुणे महाराष्ट्रातील महत्वाचे शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राला देशाच्या इतर भागांशी जोडणारे अनेक महत्वाची रेल्वे स्थानक आहे. पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेले उरुळी स्टेशन टर्मिनस म्हणून विकसित केलं जातंय. तर हडपसर आणि शिवाजीनगर सारखी स्थानके देखील सॅटेलाइट टर्मिनस स्टेशन म्हणून विकसित केली जात आहेत. यामुळे पुणे स्टेशनची क्षमता वाढेल आणि पुण्याहून येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्या वाढतील.