"पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, यासाठी समन्वयाने काम करा. 'ब्लेम गेम' करीत बसू नका, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा", असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, दि. ३१ मे रोजी दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करून प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरून कामांची पाहणी केली.
Read More
जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.
राज्यभरात सध्या पावसाचे थैमान सुरु असून शेती आणि घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना नुकसान भरपाई द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
वावा! मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय, आता भाजप महायुतीविरोधात भाषणे करून मुंबईकरांना भडकवण्याची नामी संधी आहे. हो तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत ना? नेहमीप्रमाणे शहरात कमी अधिक भागांत पाणी भरले. काय करावे? काय म्हणता; जुलै 2005 साली मुंबईत महापूर आला, तेव्हा आजोबांना सोडून माझे बाबा उद्धव ठाकरे, आई आणि आम्ही मुलं हॉटेलला राहायला गेलो होतो. आताही तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत आम्ही उबाठा कुटुंबाने, हॉटेलमध्ये राहायला जावे? हं त्याची गरजच नाही. मातोश्री एकनंतर दोन काय उगाच बांधले आम्ही.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे. तसेच नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे.
राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबईत सोमवार सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच मुंबईतील लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली असून रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे.
यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो दि. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, मंगळवार, दि. 27 मे रोजीपासून मान्सूनच्या प्रवासाची वेग कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वे सेवेला जोरदार फटका बसला आहे. विशेषत: मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ खोळंबली असून लोकल रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. पावसामुळे तिन्ही लाईन्सवरील रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे ज्या भागात नुकसान झाले तिथे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मान्सूनच्या आगमनाला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईची ‘तुंबई’ झाली. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना फटका सहन करावा लागला.
भारतीय हवामान विभागाने (आयएमड) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारपासून शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसासोबत विजांचा कडकडाट आणि ५०–६० किमी/तास वेगाने सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे.
New railway line connecting religious places in Ahilyanagar Rahuri to Shanishinganapur रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
पश्चिम रेल्वेने भाईंदर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान आवश्यक देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार, २४ मे आणि रविवार, २५ मे रोजी पहाटे घेण्यात येईल. ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थिती सुधारण्यासाठी देखभाल महत्त्वाची असून ब्लॉकच्या वेळेत जलद गाड्या त्यांच्या नेहमीच्या ट्रॅकवरून धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
पावसाळा जवळ येत असताना मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील चालू पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केली आहे.
( Rain warning Heavy rain expected in Malvan including konkan ) महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज २१ मे रोजी कोकण आणि महाराष्ट्रातील काही जिल्हांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणासह पुणे, कोल्हापुर, सातारा, बीड, संभाजीनगर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशष पर्यटन रेल्वेची आयआरसीटीसीतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
(New railway bridge in Kurla) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या१७.५० किमी लांबीच्या प्रकल्पाचा अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान लक्षणीय प्रगती झाली आहे. कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाच्या (१०.१ किमी) संदर्भात, नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे उद्दिष्ट आहे.
(MP Naresh Mhaske instructions to thane railway officials) ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधीत होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून यामध्ये जे बाधीत होतील त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ७ मे रोजी दिले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी ५ मे २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यावर माहितीपूर्ण चर्चासत्र आयोजित केले होते.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दि. ३ मे व ४ मेच्या रात्री ४ तासाचा जंम्बो मेगा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ मे २०२५ पासून देशभरात काही बदल लागू होणार आहेत. ज्यांचा परिणाम नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ११ राज्यांमध्ये एक राज्य एक आरबीआय योजना लागू केली जाईल. या योजनेमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत बँकिंग सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि इतर पायाभूत सुविधांच्या माहितीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी बुधवार,दि.३० रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई यांच्यासह मध्य रेल्वे मुख्यालय इमारतीतील "चिंतन" कॉन्फरन्स रूममध्ये सर्व खासदारांची भेट घेतली.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी सर्व सुविधायुक्त अशी 'रनिंग रूम' (विश्रामगृह) बनविले आहे. त्याची माहिती देणारा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
छत्रपती शिवराय नसते तर तुम्ही आम्ही कुणीच इथे नसतो. म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
( Minister Amit Shah visit Maharashtra ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार, दि. ११ एप्रिल आणि शनिवार, दि. १२ एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगड किल्ल्यावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेणार आहेत.
weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब
(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
(Palghar Unseasonal Rain) पालघर जिल्ह्यामधील वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
( Union Home Minister Amit Shah at Raigad on April 12 ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडाला भेट देणार आहेत.
new Pamban railway bridge राष्ट्रसेवेचा प्रण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने नव्या भारताची पायाभरणी होत आहे. देश पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीत वेगवान प्रगती करत असून, भारतीय रेल्वेचादेखील यामध्ये मोलाचा वाटा. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर, आज श्रीरामनवमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला तामिळनाडूतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा पंबन रेल्वे पूल...