भारत आणि चीनमधील संबंधांना नवीन पालवी फुटत असली, तरी त्याला ‘वसंताची नांदी’ म्हणता येणार नाही. दोन्ही देश आपली जोखीम कमी करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहेत. भारताच्या शेजारी देशांमध्ये स्वतःचे बस्तान निर्माण करताना चीन तेथील दलदलीत अडकल्यामुळे चीनसोबत चार पाऊले पुढे टाकणे भारतासाठी शक्य होणार आहे.
Read More
२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहा ट्रिलियन डॉलरची झालेली असेल. तसेच, दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून चार हजार डॉलर इतके झालेले असेल, असा अंदाज नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला. सध्या भारतीय अर्थव्यवस्था ३.५ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. तथापि, २०३० पर्यंत ती जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असेल, असेही हा अहवाल सांगतो.
जागतिक व्यापारात भारतीय रुपयाच वर्चस्व वाढत आहे. आता आणखी एका देशाने भारतीय रुपयांत व्यापार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारच्या वाणिज्य मंत्री आंग नैंग ऊ यांनी जून अखेरपर्यंत दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार स्थानिक चलनात होण्याची व्यवस्था पुर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत बदलला असून, या भारताने जगाच्या अर्थव्यवस्थेतील आपले स्थान बळकट केले आहे. पाश्चात्य देश मंदीच्या सावटाखाली असताना, हा बदललेला, नवा भारत विकासाची नवनवी क्षितिजे पादाक्रांत करत आहे. संपूर्ण जगावर मंदीचे संकट आलेले असताना, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला आधार देणारी ठरत आहे, असे ‘मॉर्गन स्टेनली’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.