(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे वितरण केले.
Read More
: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी करोडी येथील १५ एकर गायरान जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली.
'तीन तिघाडा काम बिघाडा' अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र 'खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग' असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी 'ऑल इज वेल' या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे.
राज्याच्या महसूल विभागाने हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता केवळ २०० रुपये शुल्कात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि युनायटेड किंग्डमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका (पीआयएल) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सोमवारी फेटाळली आहे.
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
( Devendra Fadnavis on action mode Instructions to all departments work details on the website by May 1 ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात ‘१०० दिवसांसाठीचा कृती आराखडा’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली. त्यामुळे या कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. येत्या दि. १ मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर संकल्पित केलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अश
( one-window scheme for sugarcane harvesting workers in all districts of the state: Deputy Speaker Neelam Gorhe ) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही का
राज्याचा अर्थसंकल्प २०२५ नुकताच पार पडला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुतीच्या सत्तेने जनतेला दिलेले हे एक मोठे गिफ्ट आहे. महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना सर्वाधिक राज्य सरकारने विकासाठी आर्थिक लाभ दिला आहे तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
Maharashtra Budget 2025 नुकताच पार पडला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुतीच्या सत्तेने जनतेला दिलेले हे एक मोठे गिफ्ट आहे. महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना सर्वाधिक राज्य सरकारने विकासाठी आर्थिक लाभ दिला आहे तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषय
Ranveer Allahabadia प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला (Ranveer Allahabadia) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याने मध्यंतरी एका इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात त्याने आई-वडील यांच्या संभोगाबाबत अश्लील वक्तव्य केले होते. त्यानंतर तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुखद धक्का मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयने त्याला आपले ' रणवीर शो' पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
(Allahabad High Court on Sambhal jama Masjid) संभळ येथील जामा मशिदीत रंगकाम करण्याची परवानगी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी नाकारली असून केवळ साफसफाईची परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा’स (एएसआय) संभळमधील जामा मशीद संकुल स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील जामा मशीद प्रकरणावरून न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मशीद कमिटीच्या एका याचिकेवर सुनावणी केली. त्यावर न्यायालयाने धार्मिक संरचनेच्या (जामा मशीद) आता कोणतेही रंगरंगोटीचे काम करता येणार नाही असा आदेश दिला आहे. आता फक्त मशीद समितीला मशिदीच्या संबंधित जागेची स्वच्छता करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त प्रकरणानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील निर्बंधांचा आणि स्वयंनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच अश्लीलतेचे नेमके निकष कोणते? अशा प्रकारांना कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीतून कसा आळा घालता येईल? आणि समाज म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? यांसारख्या मुद्द्यांचा प्रकर्षाने ऊहापोह करणारा हा लेख...
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा घाट घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी या संघर्षाची ठिणगी पडून, प. बंगालमध्ये राजकीय खेला रंगलेला दिसेल.
जगात काय पवित्र, काय अपवित्र याची व्याख्या करणे सोपे नाही. मात्र, पशू आणि माणूस यांतील महत्त्वाचा भेद आहे, तो म्हणजे अपवाद वगळता पशूला नात्यांची ओळख राहात नाही. त्यांच्यासाठी जन्म देणारे माता-पिता कालांतराने नर-मादीच असतात. पण, माणसाचे तसे नाही. नातेसंबंधांचे पावित्र्य आणि नीती तो जपतो.म्हणूनच तर तो माणूस आहे, पशू नाही. या परिक्षेपात रणवीर अलाहाबादिया याने मातापिता आणि लैंगिक संबंध यावरून विचारलेला छिछोर प्रश्न म्हणजे मानवी मूल्य, पावित्र्याची विटंबना करणाराच. त्याच्या विधानाचा अतिशय कठोरपणे समाचार घ्यायलाच
एकदा सृजनाची क्षमता संपली की, लैंगिकतेचे वावडे राहत नाही. सांस्कृतिक तुटलेपण आणि स्वैराचारातले पुरोगामित्त्व हे या अभद्र अभिव्यक्तीमागचे गुंतागुंतीचे मानसशास्त्र आहे.
रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!
Ranveer Allahabadiya प्रेयसी निक्की शर्मा यांच्यातील नात्याला ब्रेक मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लील विधानावर रान पेटलं होतं. त्यावरूनच आता त्याच्या प्रेयसीने त्याला सोशल मीडियावरून अनफोलो केलं असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे त्याच्या नात्याला आता फुलस्टॉप मिळाला असल्याच्या चर्चांना उधाण मिळालं. त्यांनी आपल्या नात्याला जगासमोर आणलं नाही. असे म्हटलं जातंय की, बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे.
Ranveer Allahabadia इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरल्याने युट्यूबर रणवीर इलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट टॅलेंटच्या आयोजकांविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली. शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर करत क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेसी युवराज राहुल गांधी, ठाकरे आणि पवार कंपनीने एकत्र येत, पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’ तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली. यापूर्वी या तिघांनी वैयक्तिकपणे हेच आरोप वारंवार केले होते आणि कोणीही दखल न घेतल्याने, एकत्र येत त्यांनी ते पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पाढा वाचला. पण, म्हणतात ना तेरड्याचा रंग तीन दिवस, त्याप्रमाणे मविआच्या असल्या उथळ आरोपांनाही आता जनता गांभीर्याने घेणे नाहीच!
live in relationship एका अहिंदू युवतीने एका हिंदू युवकासोबत प्रेमसंबंध ठेवत विवाह केला. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांना अपत्या जन्माला आले. काही काळानंतर विवाहबद्ध महिलेने आपल्याच हिंदू पतीवर बलात्काराचा आरोप लावला होता. याप्रकरणामध्ये एकूण ५ लाख रूपये रक्कम द्यावे लागतील अशी अट घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसल्याचे बघायाला मिळतं आहे. अशातच आता निवडणुकीच्या प्रचारामुळे एकतेचा बनाव करणाऱ्या इंडी आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासहीत विविध पक्षांनी काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे असा प्रस्ताव घटक पक्षातील नेत्यांच्या समोर ठेवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की राहुल गांधी हे काँग्रेस वाचवण्यासाठी लढत आहेत, पण मी दिल्ली वाचवण्यासाठी लढतो
जागावाटपात घालवलेला वेळ हेदेखील महाविकास आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. परंतू, हा वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का? असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडले.
Jama Masjid case अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभलच्या जामा मशिदीवर (Jama Masjid case) कनिष्ठ न्यायालयामध्ये दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला स्थिगीती दिली आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याविरोधात मशिदीच्या समितीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.
अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
दाक्षिणात्य सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यानंतर चित्रपटाने अवघ्या कमी कालावधीत १००० कोटींचा पल्ला बॉक्स ऑफिसवर पार करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
काँग्रेसी दहा वर्षांच्या तुलनेत भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात पाचपट अधिक रोजगारनिर्मिती झाली, असे भारताच्या मध्यवर्ती बँकेने नमूद केले आहे. त्यामुळे मोदी सरकारवर बेरोजगारी वाढविण्याचे बेछूट आरोप करणार्या विरोधकांना एक सणसणीत चपराक लगावली आहे.
(NDA) जनता दल युनायटेड (जदयु) राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच (रालोआ) आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव रंजन उपाख्य ललन सिंह यांनी गुरूवारी दिले आहे.
'786', 'Allah' उत्तर प्रदेशातील बरेली या शहरातील बिहारीपूरमध्ये असलेल्या आला हजरत दर्ग्याजवळ असलेल्या प्राचीन दुर्गा मंदिरा़च्या भिंतीवर काही समाजकंटकांनी 786 असा मुस्लिम धर्मासाठी लकी असलेला क्रमांक लिहिला. तसेच त्या भिंतीवर अल्लाह असेही नाव लिहिले. गुरूवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जातीय तणाव निर्माण झाला असल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinmay Krishna Das Prabhu बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. काही दिवसांआधी बांगलादेशातील सरकारने इस्कॉन टेंपलचे साधू चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना चितगाव येथील न्यायालयाने जामीन नाकारला. चिन्मय कृष्ण दास प्रभू हे चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.
Allahabad High Court पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरका परिधान करणे आणि लोकांसोबत मैत्री करणे याला आता पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत तलाकपद्धतीचाही आधार घेता येणार नाही, अशी घोषणा अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २३ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहणार असल्याच्या जोडप्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यावर बाष्य केले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडी आघाडी मधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत काँग्रेसनेते अजय मकेन यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाला इंडी आघाडीतून काढून टाकण्याचा प्रस्ताव इंडी आघाडीच्या घटक पक्षांकडे करण्यात येईल असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
(NDA) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी बुधवारी दुपारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटकपक्षांची बैठक पार पडली.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे ( Mahayuti ) खाते वाटप जाहीर झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, तर अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.
'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते स ला ना ते' या आगामी ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला विरोध दर्शवत, सदर विधेयकाचा निषेध केला आहे. त्याच बरोबर काँग्रेस, त्रुणामूल काँग्रेस, समाजवादी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी एक देश एक विधेयक लोकसभेत सादर केले. सदर विधेयक संसदेसमोर आणल्या नंतर त्यावरील घटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे.
(One Nation One Election Bill) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीनेही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच एक देश, एक निवडणूक विधेयकाला अखेर 'जेपीसी'कडे (संसदेची संयुक्त समिती) पाठवले जाणार आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला असून त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येतो आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी देश आणि जगभरात प्रदर्शित झालेल्या पुष्पा २ चित्रपटाने १२ दिवसांमध्ये जगभरात १४०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
(Justice Shekhar Kumar Yadav) कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील संसद सदस्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या विरोधात त्यांच्या वादग्रस्त टिप्पणीसाठी महाभियोग प्रस्ताव सादर केल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रस्तावाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर : "हिवाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला उब आणि ऊर्जा मिळेल असा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात ६ राज्यमंत्री आहेत. आजपासून आम्ही आमचा गतिशील कारभार सुरु केलेला आहे. येत्या दोन दिवसांत खातेवाटप आम्ही पुर्ण करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. रविवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Zakir Hussain passes away उस्ताद अल्लाह राखा खान यांचे पुत्र झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री अमेरिकेत १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले आहे. तबलापटू झाकीर हुसेन यांचे मोठे नाव होते. झाकीर यांचा तीन ग्रॅमी पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. संगीत विश्वामध्ये तबला वादनाची एक ओळख आहे. झाकीर हुसेन यांच्यामुळे तबलावादन क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आले होते. सॅन फ्रान्सिस्को येथून रविवारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) जे स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेत ते स्वतः मुंबईतील प्रत्येक वॉर्डात जातीनं लक्ष घालत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कुठल्याही मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीत. नेमकी रणनिती कशी आखली जात आहे?