( Bengal Association to BCCI on Ban Harsha Bhogle ) भारतीय क्रिकेट समलोचक हर्षा भोगले यांच्यावर बंगल क्रिकेट असोसिएशने आयपीएल मॅच दरम्यान कॉमेंट्री करण्यास बंदी घातली आहे. बीसीसीआयला पत्र पाठवत बंगाल क्रिकेट असोसिएशने ही मागणी केली आहे.
Read More
Ashish Shelar राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतीक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार आणि कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांची आज एशियन क्रिकेट कौंसिलच्या (एसीसी) च्या डायरेक्टर बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एशियन क्रिकेट बोर्डात जाण्याचा महाराष्ट्राचे सुपुत्र शेलार यांना बहूमान मिळाला आहे.
Rohit Sharma भारतीय क्रिकेट बोर्डाने शनिवारी ११ जानेवारी २०२५ रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. ही बैठक मुंबईमध्ये झाली एका हॉटेलमध्ये झाली असून यासाठी बीसीसीआयचे अधिकारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि निवडकर्ते अजित आगरकर हे देखील उपस्थित होत. यावेळी टीम इंडियाच्या खेळावर आणि येणाऱ्या भवितव्यावर विशेष म्हणजे कर्णधारपदावर चर्चा सत्र झाले.
नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’चे (आयसीसी) अध्यक्षपद स्वीकारले आहे. ग्रेग बार्कले यांची जागा घेणारे ३५ वर्षीय जय शाह हे आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ( ICC Precident ) बनले आहेत. भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते पुत्र आहेत. २०२० साली पहिल्यांदा या पदावर नियुक्त झाल्यानंतर बार्कले यांनी तिसरी टर्म न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यानंतर या पदासाठी जय शहा यांची निवड झाली.
India Vs Pakistan मोठी बातमी ! पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफिसाठी टीम इंडिया खेळणार नाही
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर आघाडी घेतली असून १०७ धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर न्यूझीलंडने ४०२ धावा करत ३५६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.
दोन दिवसांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कानपूर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात २८५/९ वर आपला डाव घोषित केला असून ५२ धावांची आघाडी घेतली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रविवारी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. रात्री पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला, मात्र दुपारी दोनच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर सुर्यप्रकाश पडला. कानपूरमधील ग्रीन पार्क येथे दुसरी कसोटी सलग दुसऱ्या दिवशी एकही चेंडू न टाकता पुढे ढकलली.
भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशवर मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, चेन्नई येथील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने २८० धावांनी विजय मिळविला आहे. पहिल्या डावात आर. आश्विन तर दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतकी खेळी केली.
भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवनने टीम इंडियाकरिता सलामीवीर म्हणून प्रतिनिधित्व करताना ४४.११ च्या सरासरीने ६ हजार ७९३ धावा केल्या. तर दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २ हजार ३१५ धावा केल्या आहेत. शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली आहे.
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत तेथे दहशतवादी बुरहान वानीच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असल्याचे समोर आले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. दि. ०८ जुलै रोजी दहशतवाद्यांनी बदनौता गावावर हल्ला केला होता.
बांग्लादेशविरुध्द झालेल्या रोमहर्षक लढतीत अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवित नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. कप्तान राशिद खानच्या नेतृत्वात संघाने बांग्लादेशवर ०८ धावांनी विजय मिळविला. सामना संपल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राशिदने मोठा खुलासा केला आहे.
टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा मराठी खेळाडू केदार जाधव याने राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल", असे क्रिकेटपटू केदार जाधवने म्हटले आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने केदारचे वक्तव्य चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
युएसए व वेस्ट इंडिज संयुक्त यजमानपद टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ अंतर्गत टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुध्द होणार आहे. याआधीच टीम इंडियाचे वर्ल्डकपनंतर होणाऱ्या दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात आली. धरमशाला येथे या मालिकेतील अंतिम सामना भारताने एक डाव आणि ६४ धावांनी जिंकत ४-१ ने मालिका खिशात घातली. अंतिम सामना आर. आश्विनचा कसोटी कारर्किदीतील १००वा सामना होता. या सामन्यात आश्विनने ०९ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात त्याने ५ बळी घेतले आहेत.
भारत व इंग्लंड यांच्यात रांची येथे चौथा कसोटी सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी केली होती. तो सामनावीर देखील ठरला होता. दरम्यान, टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जुरेल हा हनुमान भक्त असल्याचे समोर आले आहे.
भारत व इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंड संघाने ७ बाद ३०२ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने संयमी खेळी करत शतक ठोकले. त्याने २२६ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांसह १०६ धावांवर खेळत आहे.
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून तिसरा सामना राजकोट येथे खेळविण्यात आला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात मिळालेल्या १२६ धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी व दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या रविंद्र जडेजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेत डावाला सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने द्विशतकी खेळी रचत विनोद कांबळी, सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे.
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शॉन मार्श याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने आस्ट्रेलियाकडून टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अटीतटीच्या सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण खेळी करत संघासाठी निर्णयात्मक विजय मिळवून दिला आहे.
आपण आपल्या वैयक्तिक जीवनात भिंतीवर जशी दिनदर्शिका अडकवतो, मासिक, वार्षिक प्लॅनर भरायला सुरुवात करत, त्यात दैनंदिन कार्यांची नोंद करुन ठेवतो, तद्वत क्रीडापटू, क्रीडा संघटनाही अशाच प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करत असतात. त्यानिमित्ताने २०२४ या वर्षीची भारतीय क्रीडापटूंच्या ‘बकेट लिस्ट’वर टाकलेली एक नजर...
क्रिकेट अकादमी सुरू करण्याच्या नावाखाली कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची १५ कोटींची रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फसवणूकप्रकरणी धोनीने त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध रांची न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँडस येथे खेळविण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात आफ्रिकेने फक्त ५५ धावा केल्या. भारतीय गोलंदाजीने आफ्रिकन फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली. मोहम्मद सिराजने निम्मा आफ्रिकन संघ पव्हेलियनमध्ये धाडला.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला नमवत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अवघ्या ७५ धावांचं लक्ष्य पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय मिळविला.
इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा हा शेवटचा आठवडा. या मावळत्या वर्षाकडे पाहता, क्रीडा क्षेत्रातील भारताची, भारतीय क्रीडापटूंची कामगिरीही तितकीच लक्षणीय आणि चमकदार ठरली. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील काही ठळक घडामोडींचे सिंहावलोकन करणारा, हा माहितीपूर्ण लेख...
आयपीएल २०२४ मोसमाकरिता खेळाडूंचा लिलाव दुबई येथे करण्यात येत आहे. या लिलावात दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोटींची बोली लागली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दरम्यान, मिचेल स्टार्क हा कोलकाता नाईट रायडर्सच्या तब्बल २४ कोटी रुपयांच्या बोलीसह विकत घेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
"तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते तुमच्याकडून पूर्ण झाले नाही तर तुम्हाला वाईट वाटते. खरंतर, हे सोपे नाही, पण आयुष्य पुढे जात असते अशा भावना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहित शर्मा मीडियापासून दूर गेला होता. पराभवाच्या धक्क्याविषयी त्याने भाष्य केले आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता मैदानात उतरेल. माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून पंड्याकडे संघाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत.
आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता बीसीसीआयकडून ११६६ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे. याआधी प्रत्येक संघाकडून आपल्याला खेळाडूला रिटेंशन करण्यात आले आहे. तर काही खेळाडूंना संघांकडून रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर आता एकूण ११६६ खेळाडूं लिलावाकरिता सज्ज झाले आहेत.
भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ करिता पाकिस्तानात खेळण्यास नाही आला तर आयसीसीने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे. दरम्यान, पाकिस्तानात २०२५ साली होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकरिता भारत न आल्यास भरपाई द्या.
आयपीएल २०२४ हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघाना त्यांच्या खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे संघ आता ठरविणार आहेत की, कुठल्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे आज ठरविले जाणार आहे. तसेच, खेळाडू रिटेन करण्याची आज शेवटची संधी संघांना मिळणार आहे. त्यामुळे कोण कुणाला संघातून डच्चू देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने X वर पोस्ट करत पत्रकार राजदीप सरदेसाई यांना टीकेचे लक्ष्य केले. कनेरियाने X वर पोस्ट केलेल्या व्हिडीओत पत्रकार राजदीप सरदेसाई हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मुलाखत घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी गाणी गुणगणण्याचा प्रयत्नदेखील केला.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. . भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत त्याने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावावर असताना मॅक्सवेलच्या बॉलिंगवर उंच फटका मारताना बाद झाला. रोहितच्या रुपात भारताला मोठा झटका बसला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा फलकावर लावू शकला.
अहमदाबादमध्ये गांधींजींचा वारसा जपणार्या साबरमती आश्रमाला वळसा घातला की पुढे वीस मिनिटांच्या अंतरावर नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम लागते. जगातील सर्वाधिक अत्याधुनिक अशा या स्टेडियममध्ये भारताचे अकरा शिलेदार या वर्ल्डकपमधील आपला अकरावा आणि फायनलचा मुकाबला खेळायला मैदनात उतरले तेव्हा सव्वा लाख क्षमतेचे हे स्टेडियम उत्साहाने भारून गेल होते.
सलग नऊ विजयांनंतर ‘विश्वचषका’च्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयाने भारतीय क्रिकेट संघाला हुलकावणी दिली असली, तरी संघाची आजवरची ‘विश्वचषका’तील सातत्यपूर्ण कामगिरी ही सर्वस्वी कौतुकास्पदच. तेव्हा त्याचे श्रेय संपूर्ण संघाचे असले, तरी संघाचा कर्णधार म्हणून ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे नेतृत्व अव्वल ठरावे. त्यानिमित्ताने कुशल कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख...
पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अकरमने सिकंदर बख्तच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून तो म्हणाला, नाणेफेक करताना कोणतेही विशिष्ट नियम नाहीत त्यामुळे बख्तच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे अकरमने यावेळी म्हटले आहे. तसेच, वसीम अकरमने पुढे स्पष्ट केले की, तेथे ठेवलेली मॅट केवळ प्रायोजकत्वासाठी आहे, त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांनी सिकंदर बख्त यांनी लाज काढल्याचे अकरम यावेळी म्हणाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्यास काय होणार, कोणत्या नियमांनुसार निकाल लागणार हे याबद्दल जाणून घेऊया.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या फायनल मॅचपूर्वी स्टेडियमवर अनेक कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
यंदाचा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवर जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
विश्वचषकातील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाकडून विशेष एअर शो देखील होणार आहे. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर गोल्डन बॉल आणि बॅट कोणत्या खेळाडूला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
अहमदाबाद येथे रविवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी मध्य रेल्वेने क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका प्रसिध्द पत्रकाराच्या सासऱ्याने न्यूझीलंडविरुद्ध १८ चौकार मारून शतक झळकावले होते, त्यांची पत्रकार सून भारतावर आरोप करत असून तिने म्हटले आहे की, उपांत्य फेरीसाठी भारताने खराब खेळपट्टी तयार केली आहे, असा गंभीर आरोप महिला पत्रकाराने केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या उपांत्य सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण वानखेडेवरील खेळपट्टी ही संथ असून फलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, भारताने टॉस जिंकत भारताने म्हणूनच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, दुसऱ्या इंनिगमध्ये गोलंदाजी करताना ड्यू फॅक्टर असू शकेल परंतु, वाऱ्याच्या साथीमुळे चेंडू स्विंग होण्यास थोडीफार मदत मिळू शकते.
न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात नवा इतिहास रचत सर्वाधिक वनडे शतकवीराचा बहुमान पटकाविला आहे.
न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात नवा इतिहास रचत सर्वाधिक वनडे शतकवीराचा बहुमान पटकाविला आहे. त्याने ११३ चेंडूत ११७ धावा केल्या. यात २ षटकारांसह ९ चौकारांचा समावेश आहे.
झीलंडविरुध्दच्या सामन्यात श्रेयस अय्यरने वादळी खेळी करत शतक झळकावले. श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत ८ षटकारांसह ३ चौकारच्या मदतीने वादळी शतक ठोकले. त्याने किवींच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढल्याचे पाहायला मिळाले, विराट कोहलीला उत्तम साथ देतानाच अय्यरने विराटच्या सोबत १६३ धावांची विक्रमी भागीदारीदेखील केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. भारताने नाणेफेक जिंकत किवींना गोलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी किवींची फलंदाज फळी मैदानात उतरेल. किवी संघ यात यशस्वी ठरतो की, भारतीय माऱ्यासमोर किवींचा संघ ढेपाळतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.