एकदा बोलण्या-चालण्यातलं चांगलं समजलं म्हणजे विवेक प्रत्ययास आला की, ते शुद्ध नियमितपणे आचरणात आणावे. यासाठी श्लोकाच्या शेवटच्या ओळीत स्वामी सांगताहेत की, लोकहो! शुद्ध आचरणाने वागणे तुम्ही सोडू नका. त्याची नियमितपणे अंमलबजावणी करा, त्यातच राहा. जानकीनायकाचा म्हणजे रामाचा विवेक तुम्ही अभ्यासला, तर शुद्ध नेमस्त वागण्याचा अर्थ उलगडेल.
Read More