बहुतेकजण आयुष्यभराची कमाई घालून घर घेत असतात. या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने घरखरेदीदारांना कायदेशीररित्या सक्षम करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत. आता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार पुरेपूर काळजी घेतल्यास सुरक्षित व संरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
Read More
मुंबई : राज्यातील सोयाबीन ( Soybean ) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास दिनांक ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
गोदरेज प्रॉपर्टीजचे विक्री बुकिंग गेल्या आर्थिक वर्षात ८४ टक्क्यांनी वाढून विक्रमी रु. २२,५२७ कोटी झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रु. १२,२३२ कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षातील कोणत्याही सूचीबद्ध घटकाने नोंदवलेली ही सर्वाधिक विक्री आहे. पिरोजशा म्हणाले की, विशेषत: प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये गृहनिर्माण क्षेत्रात मागणी मजबूत राहील.
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथील धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश आ. संजय केळकर यांनी केला होता. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी अशा १४ जणांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे संपूर्ण राज्यभर पसरली असल्याने एसआयटी द्वारे चौकशीची मागणी आ.केळकर यांनी केली आहे.
नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून शहरातील सर्व रस्ते स्वच्छ दिसणार आहेत. ३३ कोटींचे चार यांत्रिक झाडू इटलीहून याच महिन्यात नाशिकनगरीत दाखल होत आहेत. स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा खालवत जाणारा क्रमांक उंचावण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने यांत्रिक झाडू खरेदीसाठी पुढाकार घेतला, तो निर्णय योग्यच.
राज्यात कांद्याच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेले असताना, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय दिला. 2410 रुपये प्रति टन दराने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेतली. केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करावं, राजकारण नको. असं शिंदे म्हणाले. तर, श्रेयवादापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार. असं पवारांनी म्हटलं आहे.
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ श्कोल्झ नुकतेच दोन दिवसीय भारत दौर्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा झाली. श्कोल्झ यांनी आपल्या दौर्यात भारतीय ‘आयटीयन्स’ना जर्मनीत नोकरीसाठी चक्क ‘रेड कॉर्पेट’च अंथरले. त्याविषयी...
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. यानंतर होणारं हे पहिलं विधिमंडळ अधिवेशन आहे.
आरे दुग्ध वसाहतीमधल्या रॉयल पाल्म्स या उच्चभृ गृहनिर्माण संस्थेला दिलेल्या जागेची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वन संरक्षकांना याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरेतील रॉयल पाल्म्स इस्टेट ही देखील झाडे तोडून बांधण्यात आली होती, तेव्हा पर्यावरण प्रेमी कुठे होते, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विचारला होता. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले होते. या पत्राची दाखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी
सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने भारताला ३५ हजार कोटींचा फायदा झाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियन क्रूडची सवलतीच्या दरात खरेदी सुरू केली होती. युक्रेन युद्धामुळे मोठ्या प्रमाणात तेल तेल खरेदी कमी झाली होती. रशियन तेल कंपन्यां नवीन खरेदीदारांना लक्षणीय सवलत देण्यास सुरुवात केली आहे. पाश्चात्य देशांच्या तीव्र दबावाला झुगारून भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
भारतातील विविध प्रकारच्या गृहकर्जांचा वापर नवीन घर, अपार्टमेंट किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी आणि जुनी मालमत्ता नूतनीकृत, विस्तारित आणि पुनर्स्थापित करण्यासाठी करणे शक्य आहे. त्यामुळे एखादे गृहकर्ज तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारे मदत करते याबद्दल माहिती देणारा हा लेख...
आज केरळमध्ये ‘पीएफआय’सारख्या इस्लामी कट्टरपंथी संघटना पुरेशा ताकदीने सक्रिय असून, त्या विचारधारेने प्रभावित कितीतरी मुस्लीम तरुण-तरुणी ‘इसिस’मध्येही दाखल झालेल्या आहेत. तशी परिस्थिती ‘देवभूमी’ उत्तराखंडमध्ये व्हायला नको, म्हणून भूमी कायद्याच्या माध्यमातून बाहेरील, स्थलांतरित, घुसखोर मुस्लिमांच्या घर-जमीन खरेदीवर बंदीची मागणी करण्यात येत आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आजचा विजयादशमीचा सण हा खरेदीसाठी शुभ मानला जातो. या मुहूर्तावर अनेकांचा वाहनखरेदीकडेही कल दिसतो. त्यातच कोरोना काळातील सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधांमुळे ‘सेकंड हॅण्ड’ का होईना, आपणही एखादे वाहन खरेदी करावे, असे वाटणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली आहे. तेव्हा त्यानिमित्ताने तुमचा किंवा तुमच्या परिजनांचा ‘सेकंड हॅण्ड’ वाहनखरेदीचा विचार असेल, त्याविषयी काही प्रश्न मनात असतील तर त्या सगळ्या शंका-कुशंकांची उत्तरे देणारा हा लेख...
भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांची माहिती
१८९८ साली ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाल्यापासून १२१वर्षांत प्रथमच ‘बाऊन्सर’ सुरक्षेसाठी ठेवण्याचा निर्णय ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या संग्रहालयाने भाड्याने घेतलेल्या ‘बाऊन्सर’ सुरक्षेबाबत सामान्य वाचक वर्ग तसेच सभासद आणि संग्रहालयाच्या विविध वास्तूत येणार्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. एकीकडे राज्य सरकार आणि पालिकेकडून अनुदानाची याचना केली जाते, तर दुसरीकडे ‘बाऊन्सर’वर लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे.
अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.सोमैय्या यांनी ही माहिती दिली.
भूखंड असो फ्लॅट अथवा बंगला, मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय हा निश्चितच प्रत्येकाच्या आयुष्याच्या जमापुंजीचा प्रश्न असतो. तेव्हा, हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनच घ्यायला हवा. तेव्हा, मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी नेमका कोणत्या बाबींचा विचार करावा, त्यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख....
सरकार नव्हे 'कार' चालवणारे मंत्री
आमदार बबनराव लोणीकर यांचा सरकारवर आघात
मंदीच्या सावटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारला आर्थिक मदत केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुवर्णसाठाही विक्रीला काढल्याच्या वृत्ताचा रविवारी बँकेने इन्कार केला. ‘आरबीआय’ने कोणत्याही प्रकाच्या सुवर्णसाठ्याची विक्री केली नसल्याचे रविवारी स्पष्टीकरण दिले.
रिअल इस्टेट क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणूक ही निश्चितच फायदेशीर ठरते. म्हणूनच, अनेक गुंतवणुकदारांचा कल हा घर खरेदी करुन, ते भाड्याने देण्याकडेही असतो. त्यामुळे घर भाड्याने देण्याच्या विचारात असाल, तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी माहिती देणारा हा लेख.....
जुन्या ४० लाख गाड्या २०१८-१९ यावर्षी विकल्या गेल्या. यापैकी १८ टक्के गाड्या संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. ३२ टक्के गाड्या ग्राहकांच्या थेट समोरासमोर विकल्या गेल्या. १६ टक्के गाड्या असंघटित क्षेत्रात विकल्या गेल्या, तर ३४ टक्के निम्म संघटित क्षेत्रात विकल्या गेल्या. संघटित डिलर्स शोरुममध्ये व्यवहार करतात. निम्मे संघटित डिलर्स प्रामुख्याने गॅरेजमध्ये व्यवहार करतात.