यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
Read More
Hindus बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या अंतरिम सरकारने बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायावर चादर टाकली आहे. मात्र याउलट अल्पसंख्याकांवर विशेषत: हिंदूंविरोधात जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा वास्तववाद आपल्याला स्वीकारावा लागत आहे. बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशात ७९ दिवसांत हिंदूंविरुद्ध ८८ घटना घडल्याची माहिती बांगालदेशने मंगळवारी १० डिसेंबर २०२४ रोजी सांगितली.
काही वर्षांपूर्वी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार झाले, म्हणून मुंबईच्या रस्त्यावर रझा अकादमीने नंगानाच केला. पुढे याच रोहिंग्या घुसखोरांनी बांगलादेशसह भारतात घुसखोरी केली. भारतात काही राजकीय पक्षांनी मतपेढीच्या स्वार्थासाठी रोहिंग्यांना अभयही दिले. पण, आता म्यानमारमध्ये उरल्यासुरल्या रोहिंग्यांनी हिंदू आणि बौद्धांची पाच हजार घरे पेटवली. यावर भारतातील रोहिंग्यांच्या रक्षकांचे आणि पुरोगाम्यांचे मौन त्यांच्या दांभिकतेचे दर्शन घडविणारेच!
देशभरात जातीय सलोखा टिकून राहावा, दलितांवरील अत्याचार कमी व्हावे, म्हणून काँग्रेस पक्ष देशव्यापी उपवास करणार आहे.